शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
2
निवडणूक आयोगाने देशात SIR ची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
3
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
4
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
5
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
6
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
7
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
8
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी
9
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
10
IND vs AUS: भारत की ऑस्ट्रेलिया, टी२० मध्ये कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड!
11
VIDEO: 'तारेवरची कसरत'! मांजर विजेच्या तारेवरून चालत होती, अचानक लागली आग अन् पुढे...
12
"या हॉटेलवर डॉक्टर तरुणीला का बोलावलं होतं?"; सुषमा अंधारे रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे नाव घेत काय म्हणाल्या?
13
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
14
Orkla India IPO च्या जीएमपीमध्ये मोठी तेजी; 'या' तारखेपासून लावू शकणार बोली, केव्हा होणार लिस्टिंग?
15
वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू झाकीर नाईकसाठी बांगलादेशात 'पायघड्या'; भारतात आहे MOST WANTED
16
ढासू परतावा...! ₹100 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, 5 वर्षांती दिला 6455% परतावा; आता रेल्वेकडून मिळाली मोठी ऑर्डर
17
Mumbai Pune Mumbai 4: स्वप्नील-मुक्ताची जोडी पुन्हा एकत्र, 'मुंबई पुणे मुंबई ४'ची घोषणा, बघा व्हिडीओ
18
श्रेयस अय्यरला झालेली दुखापत किती गंभीर, आता कशी आहे प्रकृती? बीसीसीआयने दिली महत्त्वाची माहिती
19
युक्रेनचा रशियावर मोठा ड्रोन हल्ला! १९३ ड्रोनमधून गोळीबार, मॉस्कोतील दोन विमानतळ बंद
20
Mid-Size SUV: २० लाखांपेक्षा कमी बजेटमध्ये घरी आणा 'या' ५ जबरदस्त मिड- साइज एसयूव्ही कार!

पेट्या असतानाही कचरा रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 06:00 IST

सर्वत्र स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत आहे. सदर अभियान यशस्वी करण्यासाठी शासनकाकडून मोठ्या प्रमाणात योजनाही राबविण्यात येत आहेत. दररोज प्रत्येक घरोघरी कचरा संकलित करण्यासाठी कचरा गाडी जात आहे. परंतु, शहरातील बºयाच वॉर्डांमध्ये प्लास्टिक कचरा पसरलेला दिसतो. यामुळे प्रशासनाप्रती रोष व्यक्त होणे स्वाभाविक आहे.

ठळक मुद्देनागरिकांना जबाबदारीचा विसर : कचरा फेकणाऱ्यांवर कारवाई करावी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहरात महानगरपालिकेद्वारे प्रत्येक चौक व वॉर्डात कचराकुंड्या ठेवून नागरिकांना कचरा टाकण्याची सुविधा तयार करून दिली. तसेच नियमीत घंटागाडीसुद्धा फिरत असते. मात्र नगीनाबाग परिसरात गुरांच्या दवाखान्याजवळ, चोर खिडकीजवळ, तसेच जुन्या आरटीओ आॅफीसच्या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. नागरिकांच्या अनास्थेमुळे स्वच्छ सुंदर योजनेला हरताड फासल्या जात असल्याचे दिसून येत आहे.सर्वत्र स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत आहे. सदर अभियान यशस्वी करण्यासाठी शासनकाकडून मोठ्या प्रमाणात योजनाही राबविण्यात येत आहेत. दररोज प्रत्येक घरोघरी कचरा संकलित करण्यासाठी कचरा गाडी जात आहे. परंतु, शहरातील बºयाच वॉर्डांमध्ये प्लास्टिक कचरा पसरलेला दिसतो. यामुळे प्रशासनाप्रती रोष व्यक्त होणे स्वाभाविक आहे. पंरतु, काही नागरिकच शहरात कचºयाचे उकिरडे तयार करताना दिसतात. पेट्या असताना रस्त्याच्या कडेला कचरा टाकून जबाबदारी टाळतात. शहरातील बहुतेक ठिकाणी कचरा पेट्या आहेत. त्याकडे लक्ष न दिल्याने सभोवताल कचरा दिसून येतो.यामध्ये सुमारे ४० टक्के कचरा प्लास्टिकचा असतो. काही वॉर्डात कचरा टाकण्याची सुविधा नाही. यामुळे त्या भागातील नागरिक आम्ही कचरा टाकावा कुठे, असा प्रश्न उपस्थित करतात. जेथे अनेक दिवसांपासून कचरा टाकण्याची सोय आहे तेथे पेटीत न टाकता बाहेर टाकला जात आहे. यातून दुर्गंधी पसरते आणि परिसराला अवकळा येते. महानगरपालिकेद्वारे पेट्यातून कचरा काढून त्याची विल्हेवाट लावली जाते. कचरा टाकण्याची सुविधा असताना काही नागरिक योग्य त्या जागी टाकत नसल्याने दंड आकारण्याची मागणी केली जात आहे.कचरा पेट्यांच्या सभोवतालचा भाग दुर्गंधीयुक्त झाल्याचे शहरातीत अनेक वॉर्डांत पाहावयाला मिळत आहे. नागरिकांनी कचरा नियोजित जागेतच टाकण्याची सवय पाडणे गरजेचे आहे. मनपा प्रशासनाने शहर स्वच्छतेची मोहीम प्रभावीपणे राबवत असताना सामाजिक दायित्व न पाळणाऱ्यांवर कारवाई करण्याची आज गरज निर्माण झाली आहे.प्लास्टिकमुळे धोकाशहरात कचराकुंड्याजवळ प्लास्टिकचा कचरा पाहून मोकाट जनावरे अन्नाच्या शोधात उकिरड्यावर उच्छाद मांडतात. मोकाट जनावरांच्या पोटात घातक प्लास्टिक जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. प्लास्टिक पोटात गेल्याने काही जनावरांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देत स्वच्छतेकडे काटेकोरपणे लक्ष देणे गरजेचे आहे. नागरिकांनी पेट्यांबाहेर कचरा टाकू नये. शहरातील विविध वॉर्डात ठेवलेल्या कचराकुंड्यांची निगा राखून इतरांनाही त्यात कचरा टाकण्यास प्रोत्साहन द्यावे.डासांचा प्रादुर्भावशहरात अनेक ठिकाणी कचरा साचत असल्याने दुर्गंधी पसरली आहे. यातून डासांचे प्रमाण वाढले. नागरिकांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे. रस्त्यावरच टाकलेले प्लास्टिक उडून इतरत्र पसरतात. त्यातील काही नाल्यांमध्येही जातात. यामुळे सांडपाण्याचा प्रवाह अवरुद्ध होतो. परिणामी, डासांचा प्रादुर्भाव वाढून गंभीर आजारांचा प्रसार होत असल्याचे दिसते. काही नाल्यांवर झाकणे बसविण्यात आले नाही.