शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
2
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
3
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
4
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
5
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
6
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
7
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
8
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
9
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
10
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
11
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
12
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
13
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
14
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
15
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका
16
नवऱ्यापासून सुटका झाली, पण घटस्फोटानंतर थायरॉइड कॅन्सरने जखडलं; अभिनेत्रीने सांगितला कठीण काळ
17
पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली, पण...
18
मध्यरात्री प्रियकरासोबत गुपचूप पळून चालली होती पत्नी, आवाज झाला अन् पती उठला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण... 
19
शिवसेना कुणाची? अखेर तारीख ठरली; सुप्रीम कोर्टात 'या' दिवशी होणार अंतिम सुनावणी
20
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय

पेट्या असतानाही कचरा रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 06:00 IST

सर्वत्र स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत आहे. सदर अभियान यशस्वी करण्यासाठी शासनकाकडून मोठ्या प्रमाणात योजनाही राबविण्यात येत आहेत. दररोज प्रत्येक घरोघरी कचरा संकलित करण्यासाठी कचरा गाडी जात आहे. परंतु, शहरातील बºयाच वॉर्डांमध्ये प्लास्टिक कचरा पसरलेला दिसतो. यामुळे प्रशासनाप्रती रोष व्यक्त होणे स्वाभाविक आहे.

ठळक मुद्देनागरिकांना जबाबदारीचा विसर : कचरा फेकणाऱ्यांवर कारवाई करावी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहरात महानगरपालिकेद्वारे प्रत्येक चौक व वॉर्डात कचराकुंड्या ठेवून नागरिकांना कचरा टाकण्याची सुविधा तयार करून दिली. तसेच नियमीत घंटागाडीसुद्धा फिरत असते. मात्र नगीनाबाग परिसरात गुरांच्या दवाखान्याजवळ, चोर खिडकीजवळ, तसेच जुन्या आरटीओ आॅफीसच्या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. नागरिकांच्या अनास्थेमुळे स्वच्छ सुंदर योजनेला हरताड फासल्या जात असल्याचे दिसून येत आहे.सर्वत्र स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत आहे. सदर अभियान यशस्वी करण्यासाठी शासनकाकडून मोठ्या प्रमाणात योजनाही राबविण्यात येत आहेत. दररोज प्रत्येक घरोघरी कचरा संकलित करण्यासाठी कचरा गाडी जात आहे. परंतु, शहरातील बºयाच वॉर्डांमध्ये प्लास्टिक कचरा पसरलेला दिसतो. यामुळे प्रशासनाप्रती रोष व्यक्त होणे स्वाभाविक आहे. पंरतु, काही नागरिकच शहरात कचºयाचे उकिरडे तयार करताना दिसतात. पेट्या असताना रस्त्याच्या कडेला कचरा टाकून जबाबदारी टाळतात. शहरातील बहुतेक ठिकाणी कचरा पेट्या आहेत. त्याकडे लक्ष न दिल्याने सभोवताल कचरा दिसून येतो.यामध्ये सुमारे ४० टक्के कचरा प्लास्टिकचा असतो. काही वॉर्डात कचरा टाकण्याची सुविधा नाही. यामुळे त्या भागातील नागरिक आम्ही कचरा टाकावा कुठे, असा प्रश्न उपस्थित करतात. जेथे अनेक दिवसांपासून कचरा टाकण्याची सोय आहे तेथे पेटीत न टाकता बाहेर टाकला जात आहे. यातून दुर्गंधी पसरते आणि परिसराला अवकळा येते. महानगरपालिकेद्वारे पेट्यातून कचरा काढून त्याची विल्हेवाट लावली जाते. कचरा टाकण्याची सुविधा असताना काही नागरिक योग्य त्या जागी टाकत नसल्याने दंड आकारण्याची मागणी केली जात आहे.कचरा पेट्यांच्या सभोवतालचा भाग दुर्गंधीयुक्त झाल्याचे शहरातीत अनेक वॉर्डांत पाहावयाला मिळत आहे. नागरिकांनी कचरा नियोजित जागेतच टाकण्याची सवय पाडणे गरजेचे आहे. मनपा प्रशासनाने शहर स्वच्छतेची मोहीम प्रभावीपणे राबवत असताना सामाजिक दायित्व न पाळणाऱ्यांवर कारवाई करण्याची आज गरज निर्माण झाली आहे.प्लास्टिकमुळे धोकाशहरात कचराकुंड्याजवळ प्लास्टिकचा कचरा पाहून मोकाट जनावरे अन्नाच्या शोधात उकिरड्यावर उच्छाद मांडतात. मोकाट जनावरांच्या पोटात घातक प्लास्टिक जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. प्लास्टिक पोटात गेल्याने काही जनावरांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देत स्वच्छतेकडे काटेकोरपणे लक्ष देणे गरजेचे आहे. नागरिकांनी पेट्यांबाहेर कचरा टाकू नये. शहरातील विविध वॉर्डात ठेवलेल्या कचराकुंड्यांची निगा राखून इतरांनाही त्यात कचरा टाकण्यास प्रोत्साहन द्यावे.डासांचा प्रादुर्भावशहरात अनेक ठिकाणी कचरा साचत असल्याने दुर्गंधी पसरली आहे. यातून डासांचे प्रमाण वाढले. नागरिकांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे. रस्त्यावरच टाकलेले प्लास्टिक उडून इतरत्र पसरतात. त्यातील काही नाल्यांमध्येही जातात. यामुळे सांडपाण्याचा प्रवाह अवरुद्ध होतो. परिणामी, डासांचा प्रादुर्भाव वाढून गंभीर आजारांचा प्रसार होत असल्याचे दिसते. काही नाल्यांवर झाकणे बसविण्यात आले नाही.