चंद्रपूर शहराचा स्वच्छतेमध्ये देशात क्रमांक लागला. त्यामुळे महापालिकेचा सत्कारही झाला. मात्र, ज्यांच्यामुळे सत्कार झाला, त्या कर्मचाऱ्यांना वेतनवाढ न मिळाल्याने त्यांनी आता आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. जोपर्यंत वेतनवाढ मिळणार नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार या कामगारांनी घेतला आहे. त्यामुळे दररोज सकाळी घटांगाडीद्वारे घराघरांतून संकलित होणारा कचरा घरातच तुंबला आहे. शहरातील घराघरांतून आणि झंडेच्या ठिकाणाहून कचरा संकलन करून तो कचरा डेपोपर्यंत नेण्याचे काम सेंटर फाॅर डेव्हलपमेंट ॲन्ड कन्युनिकेशन ही एजन्सी मागील सात वर्षांपासून करीत आहे. २४ फेब्रुवारी २०१५ रोजी राज्य शासनाने नवीन जीआर काढून कचरा संकलनाचे काम करीत असलेल्या कामगारांना वनीन वेतनश्रेणीनुसार पगारवाढ देण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, महापालिका आणि कंत्राटदार एजन्सीकडून कामगारांना नवीन वेतश्रेनीचा लाभ अद्यापही मिळला नसल्याने कामगारांनी आंदोलनाचा मार्च पत्करला आहे.
घंटागाड्यांचे कर्मचारी आंदोलनावर, घराघरांत तुंबला कचरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:29 IST