शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतीने साकारला जलशुद्धीकरण प्लान्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 02:28 IST

पाणी म्हणजे जीवन. सर्व जिवांची तहान भागविणारे जीवनामृत. मात्र ते शुद्ध असेल तर गावकºयांचे आरोग्य चांगले राहील.

ठळक मुद्देगोवरी ग्रामपंचायत: शुद्ध पाण्यामुळे गावकºयांचे आरोग्य सुदृढ

प्रकाश काळे ।लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : पाणी म्हणजे जीवन. सर्व जिवांची तहान भागविणारे जीवनामृत. मात्र ते शुद्ध असेल तर गावकºयांचे आरोग्य चांगले राहील. अन्यथा परिस्थिती विपरित होणार. त्यामुळे गोवरी ग्रामपंचायतीने नागरिकांसाठी जलशुद्धीकरण प्लॉन्टची निर्मिती केली. या जलशुद्धीकरण प्लॉन्टचे गावकºयांनी स्वागत केले असून पाच रुपयात नागरिकांना कॅनभर पाणी मिळत असल्याने गावकºयांचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होणार आहे.राजुरा तालुक्यातील गोवरी हे चार हजार लोकसंख्येचे गाव वेकोलिच्या कुशीत वसले आहे. गावात पाण्याचे मुबलक साठे आहेत. परंतु गावकºयांना मिळणारे पाणी हे शुद्ध असावे, या हेतूने ग्रामपंचायतीने १४ व्या वित्त आयोगाच्या मिळणाºया निधीतून नागरिकांसाठी गावातच जलशुद्धीकरण प्लॉन्ट उभारला. आरओ प्लान्ट सुरू झाल्याने पाच रुपयात २० लिटर शुद्ध पाणी गावकºयांना मिळू लागले. आरओ मशिनच्या शुद्ध पाण्याच्या टाकीची धारण क्षमता दीड हजार लिटर आहे. या आरओ मशिनचे खास वैशिष्ट्य म्हणजे आपण एटीएम मशिनमधून पैसे काढतो, त्याचप्रमाणे नागरिकांनी आरओ मशिनला कार्ड दाखविल्यास एक कॅनभर म्हणजेच २० लिटर पाणी नागरिकांना मिळत आहे. जलशुद्धीकरणाकरिता ग्रामपंचायतीला जेमतेम साडेपाच लाख रुपयांपर्यंत खर्च आला आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने गावात साथीचे आजार पसरण्याची भीती असते. बहुतांश आजार हे दूषित पाण्यातून होत असतात. त्यामुळे शुद्ध पाणी गावकºयांना मिळावे, यासाठी ग्रामपंचायतीने जलशुद्धीकरण प्लॉन्टची निर्मिती केली आहे. या आरओ प्लान्टला गावकºयांचे चांगलेच सहकार्य मिळत आहे. दूषित पाणी पिल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येवू शकते. त्यामुळे नागरिकांनी शुद्ध पाण्याचा पुरेपुर लाभ घ्यावा.जलशुद्धीकरण गावकºयांसाठी लाभदायीगावातील प्रत्येकच नागरिक शुद्ध पाण्याची मशिन बसवू शकत नाही. त्यामुळे हे जलशुध्दीकरण संयंत्र गावकºयांसाठी लाभदायी ठरत आहे. गोवरी ग्रामपंचायतीचा हा उपक्रम इतरही ग्रामपंचायतीने राबविला तर गावाचे आरोग्य सुदृढ राखण्यास मदत होऊ शकते.प्रत्येकजण आरओ मशीन घेऊ शकत नाही. गावातील प्रत्येक नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे , यासाठी जलशुद्धीकरण प्लान्टची निर्मिती करण्यात आली आहे. निरोगी आरोग्य राहण्यासाठी गावकºयांनी शुद्ध पाण्याचा लाभ घेणे आवश्यक आहे.- सुनील उरकुडे, जि.प. सदस्य