शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

ग्रामपंचायतीने साकारला जलशुद्धीकरण प्लान्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 02:28 IST

पाणी म्हणजे जीवन. सर्व जिवांची तहान भागविणारे जीवनामृत. मात्र ते शुद्ध असेल तर गावकºयांचे आरोग्य चांगले राहील.

ठळक मुद्देगोवरी ग्रामपंचायत: शुद्ध पाण्यामुळे गावकºयांचे आरोग्य सुदृढ

प्रकाश काळे ।लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : पाणी म्हणजे जीवन. सर्व जिवांची तहान भागविणारे जीवनामृत. मात्र ते शुद्ध असेल तर गावकºयांचे आरोग्य चांगले राहील. अन्यथा परिस्थिती विपरित होणार. त्यामुळे गोवरी ग्रामपंचायतीने नागरिकांसाठी जलशुद्धीकरण प्लॉन्टची निर्मिती केली. या जलशुद्धीकरण प्लॉन्टचे गावकºयांनी स्वागत केले असून पाच रुपयात नागरिकांना कॅनभर पाणी मिळत असल्याने गावकºयांचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होणार आहे.राजुरा तालुक्यातील गोवरी हे चार हजार लोकसंख्येचे गाव वेकोलिच्या कुशीत वसले आहे. गावात पाण्याचे मुबलक साठे आहेत. परंतु गावकºयांना मिळणारे पाणी हे शुद्ध असावे, या हेतूने ग्रामपंचायतीने १४ व्या वित्त आयोगाच्या मिळणाºया निधीतून नागरिकांसाठी गावातच जलशुद्धीकरण प्लॉन्ट उभारला. आरओ प्लान्ट सुरू झाल्याने पाच रुपयात २० लिटर शुद्ध पाणी गावकºयांना मिळू लागले. आरओ मशिनच्या शुद्ध पाण्याच्या टाकीची धारण क्षमता दीड हजार लिटर आहे. या आरओ मशिनचे खास वैशिष्ट्य म्हणजे आपण एटीएम मशिनमधून पैसे काढतो, त्याचप्रमाणे नागरिकांनी आरओ मशिनला कार्ड दाखविल्यास एक कॅनभर म्हणजेच २० लिटर पाणी नागरिकांना मिळत आहे. जलशुद्धीकरणाकरिता ग्रामपंचायतीला जेमतेम साडेपाच लाख रुपयांपर्यंत खर्च आला आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने गावात साथीचे आजार पसरण्याची भीती असते. बहुतांश आजार हे दूषित पाण्यातून होत असतात. त्यामुळे शुद्ध पाणी गावकºयांना मिळावे, यासाठी ग्रामपंचायतीने जलशुद्धीकरण प्लॉन्टची निर्मिती केली आहे. या आरओ प्लान्टला गावकºयांचे चांगलेच सहकार्य मिळत आहे. दूषित पाणी पिल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येवू शकते. त्यामुळे नागरिकांनी शुद्ध पाण्याचा पुरेपुर लाभ घ्यावा.जलशुद्धीकरण गावकºयांसाठी लाभदायीगावातील प्रत्येकच नागरिक शुद्ध पाण्याची मशिन बसवू शकत नाही. त्यामुळे हे जलशुध्दीकरण संयंत्र गावकºयांसाठी लाभदायी ठरत आहे. गोवरी ग्रामपंचायतीचा हा उपक्रम इतरही ग्रामपंचायतीने राबविला तर गावाचे आरोग्य सुदृढ राखण्यास मदत होऊ शकते.प्रत्येकजण आरओ मशीन घेऊ शकत नाही. गावातील प्रत्येक नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे , यासाठी जलशुद्धीकरण प्लान्टची निर्मिती करण्यात आली आहे. निरोगी आरोग्य राहण्यासाठी गावकºयांनी शुद्ध पाण्याचा लाभ घेणे आवश्यक आहे.- सुनील उरकुडे, जि.प. सदस्य