शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांची सरकारमधून बाहेर पडण्याची तयारी?; 'वर्षा'वरील बैठकीत दादा संतापले, दानवेंचा दावा
2
डॉ. मुजम्मिलच्या डायरीतून समोर आलं मोठं गुपित, 'कोड वर्ड'मध्ये लिहिला होता दहशतीचा प्लॅन! आणखी 25 नावं समोर
3
आधीच BCCIची रोहित शर्माला 'वॉर्निंग'; त्यात आता MCAच्या 'त्या' विधानाने वाढवलं 'टेन्शन'
4
Groww Share Price Today : Groww च्या शेअर्सची दुसऱ्या दिवशीही जोरदार घोडदौड! गुंतवणूकदारांना ५०% हून अधिक फायदा, केलं मालामाल
5
दहशतवाद्यांसाठी काळ बनून आले 'हे' IPS अधिकारी; एका पोस्टरवरुन केला मोठ्या कटाचा खुलासा
6
दिल्ली स्फोटाची भीषणता! लाल किल्ल्यापासून ३०० मीटर दूर दुकानाच्या छतावर सापडला मानवी हात; मृतांचा आकडा १३ वर
7
पाकिस्तानची अफगाणिस्तान अन् भारताला पोकळ धमकी; एकाचवेळी युद्ध करण्याची क्षमता आहे किती?
8
SIP द्वारे कोट्यधीश व्हायचंय? '१०-७-१०' हा फॉर्म्युला येईल कामी; श्रीमंत होण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही
9
पार्थ पवारांच्या कंपनीला सूट द्यायची आहे का? बावनकुळेंच्या प्रश्नामुळे मुद्रांक शुल्क विभागच संभ्रमात
10
खळबळजनक! लेकाला PUBG चं व्यसन, कंटाळलेल्या आईने अखेर संपवलं जीवन, वडील म्हणतात...
11
CM देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकाच मंचावर येणार; दोघांची भेट लक्षवेधी ठरणार
12
तहसीलदार पदावरून ४ वेळा निलंबन; ‘कामाची’ सवय असलेले सूर्यकांत येवले लाच प्रकरणांतही आघाडीवर
13
सोशल मीडियावर रातोरात व्हायरल झाली गिरीजा ओक, पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाली...
14
दिल्लीत स्फोटापूर्वी मशिदीत गेला होता दहशतवादी डॉ. उमर नबी; स्फोटाच्या आधीचे सीसीटीव्ही समोर
15
अल-कायदाचा माजी कमांडर; व्हाईट हाऊसमध्ये अल-शरा आणि डोनाल्ड ट्रम्प यांची ऐतिहासिक भेट
16
“बूट फेकीसारख्या घटना पुन्हा घडू नये यासाठी काय उपाय करता येईल?”; सुप्रीम कोर्टाचा सवाल
17
कर्तव्यनिष्ठेला सलाम! कुशीत बाळ अन् हातात मशीन... आई करतेय कंडक्टरचं काम; 'ती'चा संघर्ष
18
'या' सरकारी बँकेचा ग्राहकांना मोठा दिलासा; घर घेण्याच्या विचारात असाल तर, पाहा काय आहेत नवे दर?
19
Delhi Blast : व्हाईट कॉलर टेरर मॉड्यूल! दिल्ली स्फोट प्रकरणात आणखी एका डॉक्टरला घेतलं ताब्यात
20
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटातील कारची ११ वर्षात ५ वेळा विक्री; खरा मालक कोण, शेवटचा व्यवहार कधी झाला?

ग्रामपंचायतीने साकारला जलशुद्धीकरण प्लान्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 02:28 IST

पाणी म्हणजे जीवन. सर्व जिवांची तहान भागविणारे जीवनामृत. मात्र ते शुद्ध असेल तर गावकºयांचे आरोग्य चांगले राहील.

ठळक मुद्देगोवरी ग्रामपंचायत: शुद्ध पाण्यामुळे गावकºयांचे आरोग्य सुदृढ

प्रकाश काळे ।लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : पाणी म्हणजे जीवन. सर्व जिवांची तहान भागविणारे जीवनामृत. मात्र ते शुद्ध असेल तर गावकºयांचे आरोग्य चांगले राहील. अन्यथा परिस्थिती विपरित होणार. त्यामुळे गोवरी ग्रामपंचायतीने नागरिकांसाठी जलशुद्धीकरण प्लॉन्टची निर्मिती केली. या जलशुद्धीकरण प्लॉन्टचे गावकºयांनी स्वागत केले असून पाच रुपयात नागरिकांना कॅनभर पाणी मिळत असल्याने गावकºयांचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होणार आहे.राजुरा तालुक्यातील गोवरी हे चार हजार लोकसंख्येचे गाव वेकोलिच्या कुशीत वसले आहे. गावात पाण्याचे मुबलक साठे आहेत. परंतु गावकºयांना मिळणारे पाणी हे शुद्ध असावे, या हेतूने ग्रामपंचायतीने १४ व्या वित्त आयोगाच्या मिळणाºया निधीतून नागरिकांसाठी गावातच जलशुद्धीकरण प्लॉन्ट उभारला. आरओ प्लान्ट सुरू झाल्याने पाच रुपयात २० लिटर शुद्ध पाणी गावकºयांना मिळू लागले. आरओ मशिनच्या शुद्ध पाण्याच्या टाकीची धारण क्षमता दीड हजार लिटर आहे. या आरओ मशिनचे खास वैशिष्ट्य म्हणजे आपण एटीएम मशिनमधून पैसे काढतो, त्याचप्रमाणे नागरिकांनी आरओ मशिनला कार्ड दाखविल्यास एक कॅनभर म्हणजेच २० लिटर पाणी नागरिकांना मिळत आहे. जलशुद्धीकरणाकरिता ग्रामपंचायतीला जेमतेम साडेपाच लाख रुपयांपर्यंत खर्च आला आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने गावात साथीचे आजार पसरण्याची भीती असते. बहुतांश आजार हे दूषित पाण्यातून होत असतात. त्यामुळे शुद्ध पाणी गावकºयांना मिळावे, यासाठी ग्रामपंचायतीने जलशुद्धीकरण प्लॉन्टची निर्मिती केली आहे. या आरओ प्लान्टला गावकºयांचे चांगलेच सहकार्य मिळत आहे. दूषित पाणी पिल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येवू शकते. त्यामुळे नागरिकांनी शुद्ध पाण्याचा पुरेपुर लाभ घ्यावा.जलशुद्धीकरण गावकºयांसाठी लाभदायीगावातील प्रत्येकच नागरिक शुद्ध पाण्याची मशिन बसवू शकत नाही. त्यामुळे हे जलशुध्दीकरण संयंत्र गावकºयांसाठी लाभदायी ठरत आहे. गोवरी ग्रामपंचायतीचा हा उपक्रम इतरही ग्रामपंचायतीने राबविला तर गावाचे आरोग्य सुदृढ राखण्यास मदत होऊ शकते.प्रत्येकजण आरओ मशीन घेऊ शकत नाही. गावातील प्रत्येक नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे , यासाठी जलशुद्धीकरण प्लान्टची निर्मिती करण्यात आली आहे. निरोगी आरोग्य राहण्यासाठी गावकºयांनी शुद्ध पाण्याचा लाभ घेणे आवश्यक आहे.- सुनील उरकुडे, जि.प. सदस्य