शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
2
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
3
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
4
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
5
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
6
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
7
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
8
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
9
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
10
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
11
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
12
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
13
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
14
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
15
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
16
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
17
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
18
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
19
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

मनपाच्या आवाहनाला गणेश मंडळांचा ठेंगा

By admin | Updated: August 31, 2014 23:41 IST

सार्वजनिक सण, उत्सव, कार्यक्रमांसाठी मंडप उभारताना मनपाची परवानगी घेऊनच मंडप उभारण्याचे आवाहन, मनपा प्रशासनाने दोन दिवसांपूर्वी केले होते. मात्र, या आवाहनाला सार्वजनिक गणेश मंडळांनी ठेंगा

मंगेश भांडेकर - चंद्रपूरसार्वजनिक सण, उत्सव, कार्यक्रमांसाठी मंडप उभारताना मनपाची परवानगी घेऊनच मंडप उभारण्याचे आवाहन, मनपा प्रशासनाने दोन दिवसांपूर्वी केले होते. मात्र, या आवाहनाला सार्वजनिक गणेश मंडळांनी ठेंगा दाखविला आहे. शहरातील केवळ ४० मंडळानीच परवानगी घेऊन मंडप उभारले असून उर्वरित मंडळाचे पदाधिकाऱ्यांनी मात्र परवानगीविनाच रस्त्यावर मंडप उभारले आहे.सार्वजनिक उत्सव, समारंभ, सभा आदी कार्यक्रमांसाठी रस्त्यांवर मंडप उभारताना, सार्वजनिक मालमत्तेची नासधूस होते. अनेक ठिकाणी रस्ता खोदून खांब किंवा लाकडी बल्ल्या उभ्या केल्या जातात. त्यामुळे रहदारीच्या रस्त्यावर खड्डे पडतात. कार्यक्रम आटोपल्यानंतर पडलेला खड्डा बुजविला जात नाही. त्यामुळे रस्त्यावर तो खड्डे वाढत जाऊन अपघात घडण्यास कारणीभूत ठरतोे. याची दखल घेत मनपा प्रशासनाने गणेश उत्सवाच्या मुहूर्तावर आवाहन करून मंडप उभारण्यासाठी मनपाची परवानगी आवश्यक असल्याचे सुचित केले. परवानगी न घेणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशाराही दिला होता. मात्र, गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी याला ठेंंगा दाखविला आहे. मनपाच्या परवानगीसाठी प्रभाग कार्यालयात अर्ज करून ५०० रूपये शुल्क मनपाच्या कर विभागात भरावे लागते. त्यानंतर मंडळाच्या सदस्यांकडून मंडप उभारताना रस्त्याची किंवा सार्वजनिक मालमत्तेची नासधूस होणार नाही, असे हमीपत्र लिहून दिले जाते. त्यानंतर मंडळाला परवानगी दिली जाते. यात एखाद्या बादलीत रेती भरुन रस्त्यावर खड्डे न पाडता, बल्या उभे करण्याचा मनपाचा नियम आहे. मात्र, मनपाच्या या आवाहनाला सार्वजनिक गणेश मंडळांनी ठेंगा दाखवून रस्त्यावरच मंडप उभारले आहे. शहरातील गणेश मंडळांच्या मंडपाची पाहणी केली असता, अनेकांनी रस्त्याच्या कडेला खड्डे खोदून बल्या उभे केले आहेत. तर मुख्य मंडपही अशाच प्रकारे उभा आहे. शहरात तीनशेच्या जवळपास सार्वजनिक गणेश मंडळ आहेत. मात्र, यापैकी केवळ आजपर्यंत ४० मंडळानी मनपाच्या कर विभागात ५०० रुपये शुल्क भरुन परवानगी घेतली आहे. उर्वरित मंडळाच्या सदस्यांनी मात्र, मनपाची कोणतीही परवानगी न घेता मंडप उभारले आहे. सार्वनिक कार्यक्रमाला मनपा प्रशासन कोणताही अडथळा आणणार नाही, असे या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. ज्या मंडळानी परवानगी घेतली आहे, त्या मंडळांनी मनपाच्या नियमाप्रमाणे मंडप उभारले किंवा नाही, याची चौकशी करण्याचे काम प्रभागाच्या अभियंत्याकडे आहे. दोषी आढळणाऱ्या मंडळांवर काय कारवाई करतात याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.