शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
पहलगामचा बदला; आता स्थानिक दहशतवादी भारतीय सैन्याच्या निशाण्यावर, आतापर्यंत 6 ठार
3
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
4
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
5
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
6
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
7
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
8
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
9
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
10
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
11
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
12
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
13
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
14
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
15
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
16
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
17
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
18
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
19
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
20
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश

लालफितशाहित अडकला गडचांदूर- आदिलाबाद रेल्वमार्ग

By admin | Updated: November 27, 2014 23:30 IST

जिल्ह्यातील औद्योगिक शहर म्हणून ओळख असलेल्या गडचांदूर शहरामधून जाणारा गडचांदूर- आदिलाबाद रेल्वेमार्ग अद्यापही पूर्ण झालेला नाही. त्यामुळे रेल्वेमार्गाने प्रवास करू इच्छिणाऱ्या

लोकप्रतिनिधींचा संघर्ष व्यर्थ : २५ वर्षांपासून काम रखडलेलेलखमापूर : जिल्ह्यातील औद्योगिक शहर म्हणून ओळख असलेल्या गडचांदूर शहरामधून जाणारा गडचांदूर- आदिलाबाद रेल्वेमार्ग अद्यापही पूर्ण झालेला नाही. त्यामुळे रेल्वेमार्गाने प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांची व स्थानिक नागरिकांची निराशा झाली आहे. विशेष म्हणजे, या मार्गासाठी आजवर अनेक लोकप्रतिनिधींनी संघर्ष केला. मात्र निधीच देण्यात न आल्याने २० ते २५ वर्षांपासून हा रेल्वेमार्ग लालफितशाहीतच अडून राहिला.गेल्या अनेक वर्षांपासून सदर रेल्वेमार्गाची मागणी केली जात आहे. मात्र अद्यापही या मार्गाच्या कार्यास यश आलेले नाही. अर्थसंकल्पात निधीची तरतूद व्हावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर राज्य शासनाने ५० टक्के निधी देण्याची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. यापूर्वी माजी खासदार नरेश पुगलिया यांनी तत्कालिन रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे हा प्रश्न लावून धरला. त्यावेळी सदर मार्ग पूर्णत्वास येईल, असे आश्वासन त्यांना तत्कालीन रेल्वेमंत्र्यांकडून देण्यात आले होते. या क्षेत्रातील माजी आमदार विठ्ठलराव धोटे, प्रभाकरराव मामूलकर, अ‍ॅड. वामनराव चटप आदींनीही खटाटोप केला. मात्र केंद्रात यासाठी आवश्यक असलेला निधी न पुरवल्याने तब्बल २० ते २५ वर्षांपासून हा रेल्वे मार्ग दुर्लक्षितच आहे.कोरपना तालुक्यात चार सिमेंट प्रकल्प आहे. यासाठी स्वतंत्र रेल्वेमार्ग आहे. त्यामुळे माणिकगड, अंबुजा, अल्ट्राटेक या सिमेंट कंपन्यांचा माल बल्लारपूर रेल्वे मार्गाने राज्यातील व देशातील कानाकोपऱ्यात जातो. यासाठी कंपन्या स्थापन होताच केंद्राने रेल्वे मार्गाची तात्काळ व्यवस्था केली. मात्र याचा लाभ प्रवाशी वाहतुकीसाठी झाला नाही. या भागात देशाच्या कानाकोपऱ्यातून कामगार मजूर पोटाची खळगी भरण्यासाठी आलेले आहे तर काही कायमस्वरुपी रहिवाशी झाले आहे. त्याचबरोबर सदर तालुका तेलंगणा सीमेलगत असल्याने जनतेला याचा मोठा फायदा होणार आहे. रेल्वेने प्रवास करू इच्छिणाऱ्यांसाठी गडचांदूर- कोरपना येथून ५० ते ६० किलोमीटर अंतर कापून बल्लारपूर गाठावे लागते. यातून बस, खासगी चारचाकी वाहनाद्वारे प्रवास करावा लागत आहे. ज्यात एका व्यक्तीला साधारणत: ५० ते ७० रुपये खर्च येतो. याउलट कोरपना तालुक्यात मोठ्या प्रमाणात मराठवाड्यातील नागरिक वास्तव्यास आहेत. त्यांना नांदेड तथा इतर जिल्ह्यात जाण्यासाठी आदिलाबाद रेल्वे स्टेशनशिवाय पर्याय नाही. यात आर्थिक बोझा मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. रेल्वे मार्गाची सुविधा झाल्यास प्रवाशांना कमी खर्चात इतर देशात प्रवास करणे अधिक सोपे होईल. मात्र केंद्रीय मंत्रालयाने वा शासनाने आजपर्यंत या मागणीकटडे दुर्लक्ष केल्याची प्रतिक्रिया जनमाणसात आता उमटू लागली आहे. गडचांदूर हे नगर परिषदेचा दर्जा मिळालेले या तालुक्यातील मध्यवर्ती शहर आहे. त्यामुळे लोकहिताच्या दृष्टीने या मार्गाचे काम होणे अत्यंत गरजेचे आहे. अनेक निवडणुकांमध्ये लोकप्रतिनिधी काम पूर्णत्वास आणू, अशी ग्वाही जनतेला देतात. मात्र केंद्रातून निधी उपलब्ध करून देण्यास ते असमर्थ ठरत आहे. तेव्हा आता तरी लोकप्रतिनिधी ही मागणी पूर्ण करतील काय, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)