शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

लालफितशाहित अडकला गडचांदूर- आदिलाबाद रेल्वमार्ग

By admin | Updated: November 27, 2014 23:30 IST

जिल्ह्यातील औद्योगिक शहर म्हणून ओळख असलेल्या गडचांदूर शहरामधून जाणारा गडचांदूर- आदिलाबाद रेल्वेमार्ग अद्यापही पूर्ण झालेला नाही. त्यामुळे रेल्वेमार्गाने प्रवास करू इच्छिणाऱ्या

लोकप्रतिनिधींचा संघर्ष व्यर्थ : २५ वर्षांपासून काम रखडलेलेलखमापूर : जिल्ह्यातील औद्योगिक शहर म्हणून ओळख असलेल्या गडचांदूर शहरामधून जाणारा गडचांदूर- आदिलाबाद रेल्वेमार्ग अद्यापही पूर्ण झालेला नाही. त्यामुळे रेल्वेमार्गाने प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांची व स्थानिक नागरिकांची निराशा झाली आहे. विशेष म्हणजे, या मार्गासाठी आजवर अनेक लोकप्रतिनिधींनी संघर्ष केला. मात्र निधीच देण्यात न आल्याने २० ते २५ वर्षांपासून हा रेल्वेमार्ग लालफितशाहीतच अडून राहिला.गेल्या अनेक वर्षांपासून सदर रेल्वेमार्गाची मागणी केली जात आहे. मात्र अद्यापही या मार्गाच्या कार्यास यश आलेले नाही. अर्थसंकल्पात निधीची तरतूद व्हावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर राज्य शासनाने ५० टक्के निधी देण्याची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. यापूर्वी माजी खासदार नरेश पुगलिया यांनी तत्कालिन रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे हा प्रश्न लावून धरला. त्यावेळी सदर मार्ग पूर्णत्वास येईल, असे आश्वासन त्यांना तत्कालीन रेल्वेमंत्र्यांकडून देण्यात आले होते. या क्षेत्रातील माजी आमदार विठ्ठलराव धोटे, प्रभाकरराव मामूलकर, अ‍ॅड. वामनराव चटप आदींनीही खटाटोप केला. मात्र केंद्रात यासाठी आवश्यक असलेला निधी न पुरवल्याने तब्बल २० ते २५ वर्षांपासून हा रेल्वे मार्ग दुर्लक्षितच आहे.कोरपना तालुक्यात चार सिमेंट प्रकल्प आहे. यासाठी स्वतंत्र रेल्वेमार्ग आहे. त्यामुळे माणिकगड, अंबुजा, अल्ट्राटेक या सिमेंट कंपन्यांचा माल बल्लारपूर रेल्वे मार्गाने राज्यातील व देशातील कानाकोपऱ्यात जातो. यासाठी कंपन्या स्थापन होताच केंद्राने रेल्वे मार्गाची तात्काळ व्यवस्था केली. मात्र याचा लाभ प्रवाशी वाहतुकीसाठी झाला नाही. या भागात देशाच्या कानाकोपऱ्यातून कामगार मजूर पोटाची खळगी भरण्यासाठी आलेले आहे तर काही कायमस्वरुपी रहिवाशी झाले आहे. त्याचबरोबर सदर तालुका तेलंगणा सीमेलगत असल्याने जनतेला याचा मोठा फायदा होणार आहे. रेल्वेने प्रवास करू इच्छिणाऱ्यांसाठी गडचांदूर- कोरपना येथून ५० ते ६० किलोमीटर अंतर कापून बल्लारपूर गाठावे लागते. यातून बस, खासगी चारचाकी वाहनाद्वारे प्रवास करावा लागत आहे. ज्यात एका व्यक्तीला साधारणत: ५० ते ७० रुपये खर्च येतो. याउलट कोरपना तालुक्यात मोठ्या प्रमाणात मराठवाड्यातील नागरिक वास्तव्यास आहेत. त्यांना नांदेड तथा इतर जिल्ह्यात जाण्यासाठी आदिलाबाद रेल्वे स्टेशनशिवाय पर्याय नाही. यात आर्थिक बोझा मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. रेल्वे मार्गाची सुविधा झाल्यास प्रवाशांना कमी खर्चात इतर देशात प्रवास करणे अधिक सोपे होईल. मात्र केंद्रीय मंत्रालयाने वा शासनाने आजपर्यंत या मागणीकटडे दुर्लक्ष केल्याची प्रतिक्रिया जनमाणसात आता उमटू लागली आहे. गडचांदूर हे नगर परिषदेचा दर्जा मिळालेले या तालुक्यातील मध्यवर्ती शहर आहे. त्यामुळे लोकहिताच्या दृष्टीने या मार्गाचे काम होणे अत्यंत गरजेचे आहे. अनेक निवडणुकांमध्ये लोकप्रतिनिधी काम पूर्णत्वास आणू, अशी ग्वाही जनतेला देतात. मात्र केंद्रातून निधी उपलब्ध करून देण्यास ते असमर्थ ठरत आहे. तेव्हा आता तरी लोकप्रतिनिधी ही मागणी पूर्ण करतील काय, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)