शहरं
Join us  
Trending Stories
1
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
2
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
3
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
4
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
5
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
6
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...
7
EMI थकवला तर फोन, लॅपटॉप होणार लॉक! RBI चा नवा नियम; कर्ज वसुलीसाठी बँकांना मिळणार 'हे' अधिकार
8
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
9
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
10
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
11
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा
12
Nashik Crime: टोळी संघर्षातून गोळीबार, भाजप नेत्यानंतर म्होरक्या विकी वाघसह साथीदार अडकला जाळ्यात
13
रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवण्यामागचं 'गंभीर' कनेक्शन; जाणून घ्या सविस्तर
14
Rape Case: पार्टीसाठी बोलावलं, शिक्षकेवर चार जीम ट्रेनर्संनी केला सामूहिक बलात्कार; आरोपींची नावे आली समोर
15
रशियाकडून पाकिस्तानला फायटर जेट इंजिनचा पुरवठा? काँग्रेसच्या दाव्यावर भाजपचा पलटवार...
16
आधार अपडेटसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय, देशभरातील 6 कोटी मुलांना होणार फायदा
17
Nashik Kumbh Mela: सिंहस्थ कुंभमेळ्यात 'गुगल' दाखवणार गर्दीतून वाट; अडीच हजार CCTV ची शहरावर नजर
18
गुडन्यूज! ५८व्या वर्षी दुसऱ्यांदा बाबा झाला अरबाज खान, पत्नी शूराने दिला गोंडस बाळाला जन्म
19
पश्चिम बंगालमध्ये पावसाचा हाहाकार, दार्जिलिंगमध्ये पूल कोसळला, 6 जणांचा मृत्यू; बघा Video 
20
पुण्यात NCP शरद पवार गटाच्या आमदाराला मारहाण; सत्ताधारी अजित पवारांच्या समर्थकांसोबत वाद

लालफितशाहित अडकला गडचांदूर- आदिलाबाद रेल्वमार्ग

By admin | Updated: November 27, 2014 23:30 IST

जिल्ह्यातील औद्योगिक शहर म्हणून ओळख असलेल्या गडचांदूर शहरामधून जाणारा गडचांदूर- आदिलाबाद रेल्वेमार्ग अद्यापही पूर्ण झालेला नाही. त्यामुळे रेल्वेमार्गाने प्रवास करू इच्छिणाऱ्या

लोकप्रतिनिधींचा संघर्ष व्यर्थ : २५ वर्षांपासून काम रखडलेलेलखमापूर : जिल्ह्यातील औद्योगिक शहर म्हणून ओळख असलेल्या गडचांदूर शहरामधून जाणारा गडचांदूर- आदिलाबाद रेल्वेमार्ग अद्यापही पूर्ण झालेला नाही. त्यामुळे रेल्वेमार्गाने प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांची व स्थानिक नागरिकांची निराशा झाली आहे. विशेष म्हणजे, या मार्गासाठी आजवर अनेक लोकप्रतिनिधींनी संघर्ष केला. मात्र निधीच देण्यात न आल्याने २० ते २५ वर्षांपासून हा रेल्वेमार्ग लालफितशाहीतच अडून राहिला.गेल्या अनेक वर्षांपासून सदर रेल्वेमार्गाची मागणी केली जात आहे. मात्र अद्यापही या मार्गाच्या कार्यास यश आलेले नाही. अर्थसंकल्पात निधीची तरतूद व्हावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर राज्य शासनाने ५० टक्के निधी देण्याची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. यापूर्वी माजी खासदार नरेश पुगलिया यांनी तत्कालिन रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे हा प्रश्न लावून धरला. त्यावेळी सदर मार्ग पूर्णत्वास येईल, असे आश्वासन त्यांना तत्कालीन रेल्वेमंत्र्यांकडून देण्यात आले होते. या क्षेत्रातील माजी आमदार विठ्ठलराव धोटे, प्रभाकरराव मामूलकर, अ‍ॅड. वामनराव चटप आदींनीही खटाटोप केला. मात्र केंद्रात यासाठी आवश्यक असलेला निधी न पुरवल्याने तब्बल २० ते २५ वर्षांपासून हा रेल्वे मार्ग दुर्लक्षितच आहे.कोरपना तालुक्यात चार सिमेंट प्रकल्प आहे. यासाठी स्वतंत्र रेल्वेमार्ग आहे. त्यामुळे माणिकगड, अंबुजा, अल्ट्राटेक या सिमेंट कंपन्यांचा माल बल्लारपूर रेल्वे मार्गाने राज्यातील व देशातील कानाकोपऱ्यात जातो. यासाठी कंपन्या स्थापन होताच केंद्राने रेल्वे मार्गाची तात्काळ व्यवस्था केली. मात्र याचा लाभ प्रवाशी वाहतुकीसाठी झाला नाही. या भागात देशाच्या कानाकोपऱ्यातून कामगार मजूर पोटाची खळगी भरण्यासाठी आलेले आहे तर काही कायमस्वरुपी रहिवाशी झाले आहे. त्याचबरोबर सदर तालुका तेलंगणा सीमेलगत असल्याने जनतेला याचा मोठा फायदा होणार आहे. रेल्वेने प्रवास करू इच्छिणाऱ्यांसाठी गडचांदूर- कोरपना येथून ५० ते ६० किलोमीटर अंतर कापून बल्लारपूर गाठावे लागते. यातून बस, खासगी चारचाकी वाहनाद्वारे प्रवास करावा लागत आहे. ज्यात एका व्यक्तीला साधारणत: ५० ते ७० रुपये खर्च येतो. याउलट कोरपना तालुक्यात मोठ्या प्रमाणात मराठवाड्यातील नागरिक वास्तव्यास आहेत. त्यांना नांदेड तथा इतर जिल्ह्यात जाण्यासाठी आदिलाबाद रेल्वे स्टेशनशिवाय पर्याय नाही. यात आर्थिक बोझा मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. रेल्वे मार्गाची सुविधा झाल्यास प्रवाशांना कमी खर्चात इतर देशात प्रवास करणे अधिक सोपे होईल. मात्र केंद्रीय मंत्रालयाने वा शासनाने आजपर्यंत या मागणीकटडे दुर्लक्ष केल्याची प्रतिक्रिया जनमाणसात आता उमटू लागली आहे. गडचांदूर हे नगर परिषदेचा दर्जा मिळालेले या तालुक्यातील मध्यवर्ती शहर आहे. त्यामुळे लोकहिताच्या दृष्टीने या मार्गाचे काम होणे अत्यंत गरजेचे आहे. अनेक निवडणुकांमध्ये लोकप्रतिनिधी काम पूर्णत्वास आणू, अशी ग्वाही जनतेला देतात. मात्र केंद्रातून निधी उपलब्ध करून देण्यास ते असमर्थ ठरत आहे. तेव्हा आता तरी लोकप्रतिनिधी ही मागणी पूर्ण करतील काय, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)