शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
2
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
3
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
4
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
5
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
6
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
7
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
8
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
9
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
10
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
11
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
12
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
13
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
14
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
15
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
16
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
17
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
18
हृदयस्पर्शी! १४ वर्षांनी लेकाने पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न, गिफ्ट केली बुलेट, Video पाहून पाणावले डोळे
19
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश
20
विभान भवनाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये तुफान राडा, शिविगाळ

सहा हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य अंधारात

By admin | Updated: December 16, 2015 01:23 IST

शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी व शिक्षण क्षेत्राची प्रगती करण्याच्या हेतूने शासनाने विविध उपक्रम राबविले आहेत.

१० वर्षांपासून सेवेत सामावूनघेण्यासाठी करताहेत प्रतीक्षासर्व शिक्षा अभियानांतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांची व्यथासास्ती : शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी व शिक्षण क्षेत्राची प्रगती करण्याच्या हेतूने शासनाने विविध उपक्रम राबविले आहेत. त्यात सर्व शिक्षा अभियान महत्त्वपूर्ण ठरला. या उपक्रमांतर्गत राज्यात जवळपास सहा हजार कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीवर नेमणूक करुन मागील १०- १२ वर्षांपासून त्यांच्याकडून अल्प मानधानात काम करवून घेत शासन आपले हेतू साध्य करीत आहे. मात्र कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांचे भविष्य अंधारात असून सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी सर्व कर्मचारी १६ डिसेंबरला विधान भवनावर धडकणार आहेत.सर्व शिक्षा अभियान या राज्याच्या महत्त्वपूर्ण उपक्रमात शिक्षणापासून वंचित राहत असलेल्या घटकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम कंत्राटी कर्मचारी करीत आहेत. या सोबतच शिक्षण विभागातील महत्त्वाच्या पदाचा भारही हे कर्मचारी सांभाळत आहेत. उच्च शिक्षित असलेल्या या कर्मचाऱ्यांची जीवनातील १०-१२ वर्षे या अभियानाला यशस्वी करण्याकरीता दिले असून अल्पशा मानधनात ते हे काम करीत आहेत. जीवनातील महत्त्वाच्या काळातील १०-१२ वर्षे अल्प मानधनात शासनाचे काम करीत असून आता शासन सेवेत आम्हाला कायम समावून घ्यावे, अशी एकमेव मागणी सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांची आहे.शासन विविध उपक्रमांतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांना सेवेत कायमस्वरुपी सामावून घेत असते. तेव्हा इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यांना शासनाने सेवेत कायमस्वरुपी सामावून घ्यावे, या मागणीसाठी अभियानातील कंत्राटी सेवेत कार्यरत असलेले सहायक कार्यक्रम अधिकारी, जिल्हा समन्वयक (पर्या. शिक्षण), जिल्हा समन्वयक (मुलींचे शिक्षण), गट समन्वयक, संशोधन सहाय्यक, कार्यकारी अभियंता, कनिष्ठ अभियंता, संगणक प्रोग्रामर, एम.आय.एस. को- आॅडीनेटर, डाटा एन्ट्री आॅपरेटर कम असिस्टंट, वरिष्ठ लेखा लिपीक तथा रोखपाल, विषय साधन व्यक्ती, जिल्हा समन्वयक, समावेशित शिक्षण विशेष तज्ज्ञ, फिरते विशेष शिक्षक, वरिष्ठ लिपीक, वाहनचालक आदी असे राज्यभरातील सहा हजार कर्मचारी नागपूर अधिवेशनावर बुधवारी मुक मोर्चा काढणार आहेत.शासनाच्या उपक्रमात १०-१२ वर्षांपासून अल्पशा मानधनात कार्य करीत आहेत. त्यांना पेन्शन नाही किंवा कुठलीही कायम हमी नाही. त्यामुळे या सर्व कर्मचाऱ्यांचे भविष्य अंधारातच असल्याचे दिसून येत असून शासन त्यांच्या मागणीकडे लक्षही देत नाही. त्यामुळे त्यांना आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागला आहे. (वार्ताहर)