शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
4
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
5
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
6
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
7
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
8
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
9
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
10
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
11
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
12
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
13
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
14
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
15
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
16
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
17
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
18
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
19
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
20
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई

केंद्राच्या कामगारविरोधी धोरणाच्या विरोधासाठी पुढे या

By admin | Updated: August 30, 2015 00:45 IST

केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणामुळे देशातीेल कामगार वर्ग अडचणीत आला आहे.

 नरेश पुगलिया : २ सप्टेंबरला चंद्रपुरात मोर्चाचंद्रपूर : केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणामुळे देशातीेल कामगार वर्ग अडचणीत आला आहे. त्यामुळे केंद्राच्या या धोरणाचा निषेध करण्यासाठी २ सप्टेंबरला होणाऱ्या कामगारविरोधी धोरणाच्या निषेधार्थ निघणाऱ्या मोर्चात कामगारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कामगार नेते तथा माजी खासदार नरेश पुगलिया यांनी केले.येत्या २ सप्टेंबरला कामगार संघटनांच्या वतीने आयोजित केलेल्या देशव्यापी मोर्चासंदर्भात माहिती देण्यासाठी शुक्रवारी नरेश पुगलिया यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत हे आवाहन केले. ते म्हणाले, कामगार संघटनाकडून सरकारकडे सामाजिक सुरक्षा, किमान वेतन, असंघटीत क्षेत्रातील कामगारांना ईएसआय आणि ईपीएफच्या सुविधा तसेच बोनस सिलिंगची मर्यादा वाढविण्यासाठी वारंवार विनंती करण्यात आली आहे. तरीही सरकारचे धोरण कामगारविरोधीच राहिले आहे. कामगार कायद्यात बदल करून उद्योगपतींच्या सोईचे कायदे तयार करण्याचे काम या सरकारने सुरू केले असून हा अन्याय आहे. या धोरणाचा निषेध करण्यासाठी हा देशव्यापी मोर्चा असल्याचे ते म्हणाले. सदर मोर्चा स्थानिक गांधी चौकातून सकाळी १० वाजता निघणार असून जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन निवेदन दिले जाणार आहे. यात सर्व कामगार संघटना सहभागी होणार असल्याने जिल्ह्यातील कामगारांनी मोठ्या संख्येने यात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. (जिल्हा प्रतिनिधी)