शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
8
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
9
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
10
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
11
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
12
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
13
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
14
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
15
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
16
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
17
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
18
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
19
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
20
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल

वन संशोधनात निधीची आडकाठी

By admin | Updated: December 20, 2014 22:35 IST

वनांची प्रत सुधारून त्याची उत्पादन क्षमता वाढविणे हा वन व्यवस्थापनाचा मुख्य उद्देश आहे. मात्र वन व्यवस्थापनाच्या तरतुदी सागावरच केंद्रित झाल्या आहेत. त्यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहे.

मिळणारा निधी अपुरा : साग वगळता इतर प्रजातीचे संशोधन थांबलेरवी जवळे - चंद्रपूरवनांची प्रत सुधारून त्याची उत्पादन क्षमता वाढविणे हा वन व्यवस्थापनाचा मुख्य उद्देश आहे. मात्र वन व्यवस्थापनाच्या तरतुदी सागावरच केंद्रित झाल्या आहेत. त्यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहे. सागासोबतच इतर इमारती वृक्ष प्रजाती व गौण वन उपज देणाऱ्या प्रजातींचा संशोधनात्मक अभ्यास करण्यासाठी चंद्रपूरपासून सहा किमी अंतरावरील लोहारा येथे वन संशोधन केंद्र स्थापन करण्यात आले. देशातील हे अशाप्रकारचे पहिले केंद्र असले तरी यावर शासनाचीच वक्रदृष्टी आहे. वन संशोधनासाठी शासनाकडून मिळणारा निधी अतिशय तोकडा असल्याने या केंद्रात साग वगळता इतर प्रजातींचे संशोधन जवळजवळ थांबलेच आहे. पूर्व विदर्भातील चंद्रपूर व गडचिरोली जिल्हे उच्च प्रतिच्या सागाकरिता संपूर्ण देशात प्रसिध्द आहेत. यासोबतच या जिल्ह्यांमध्ये विविध इमारती वृक्ष प्रजाती व गौण वन उपज देणाऱ्या प्रजातींचा समावेश आहे. याशिवाय विविध वन औषधीही या परिसरातील जंगलात आढळून येतात. या सर्व प्रजातींचा संशोधनात्मक अभ्यास करण्याच्या उद्देशाने चंद्रपुरात १९६९ मध्ये महाराष्ट्र वन संशोधन संस्थेची स्थापना करण्यात आली. या संस्थेचे मुख्यालय चंद्रपुरातच आहे. या संस्थेचे मुख्य संशोधन केंद्र लोहारा येथे असून २६० हेक्टर क्षेत्र या कामांसाठी आरक्षित ठेवले आहे. आतापर्यंत देशातील विविध भागातून तब्बल २५९ सागांची रोपे या ठिकाणी आणून लावण्यात आली आहेत. या वृक्षांचे जतन केले जात असून मदर ट्री म्हणून याचा वापर केला जातो. विविध राज्यातील या सागांच्या झाडांपासून बीज काढले जाते. त्यावर या केंद्रातच असलेल्या संयंत्राद्वारे प्रक्रिया करून दुसऱ्या रोपांवर बड ग्राफ्टिंग केले जाते. यातून निर्माण होणाऱ्या नवीन सागांच्या झाडांची वाढ, त्याची गोलाई या बाबी तपासल्या जातात व उच्च प्रजातीचे सागवान वृक्ष तयार केले जातात. वास्तविक सागाचे ज्या पध्दतीने संशोधन केले जात आहे, तसेच संशोधन इतर वृक्षांच्या प्रजातींचेही व्हायला हवे. मात्र ते अद्याप या केंद्रात होत नसल्याची माहिती आहे. शासनाकडून जो निधी या संशोधन कार्यासाठी पाठविला जातो. त्यातील ९० टक्के निधी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतनावरच खर्च होतो. त्यामुळे इतर बाबींसाठी या कार्यालयाकडे निधीच नसतो.