शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
2
"गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण..."; पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात स्पष्टच बोलल्या
3
Goldman Sachs चे 'हे' ४ शेअर्स बनले सुपरस्टार; एका वर्षात १५५ टक्क्यांपर्यंतची तेजी, तुम्ही घेतलाय का?
4
'आग तो लगी थी घर में...."; धनंजय मुंडेंनी शायरीतून भावना व्यक्त केली, मंत्रिपदाबाबत खंतही बोलून दाखवली
5
२ घास कमी खा पण स्वाभिमानाने राहा, कुणाचे तुकडे उचलू नका; पंकजा मुंडेंचं मेळाव्यात आवाहन
6
कराड आमचे दैवत...; पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात झळकले वाल्मिक कराडचे पोस्टर
7
Gold Silver Price: सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी वाढ; गुंतवणूकदारांनी मात्र टाळाव्यात 'या' ५ चुका
8
"खोटे धंदे करू नका, गुंड पाळू नका, काही गरज नाही", पंकजा मुंडे भगवान गडावर काय बोलल्या?
9
Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहचा मोठा पराक्रम, घरच्या मैदानावर 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
10
७५ वर्षांचा नवरा अन् ३५ वर्षांची नवरी! लग्नाच्या रात्रीच पतीचा मृत्यू; गूढ उलगडलं, समोर आलं सत्य
11
१९ वर्षे शनि, १८ वर्षे राहु महादशा: शनि महादशेत राहु अंतर्दशा आली? भाग्योदय; अपार पैसा-लाभ!
12
अभिनेता विजयला सोबत घेण्याचा भाजपाचा प्रयत्न; चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर समोर आली नवीन रणनीती
13
Gensol Engineering Ltd: ₹२४०० वरुन ₹४१ वर आला 'हा' शेअर, आता ट्रेडिंग झालं बंद; संकटात कंपनी, तुमच्याकडे आहे का शेअर?
14
WhatsApp वापरकर्त्यांची प्रतीक्षा संपली! फक्त नंबर डायल करा आणि कॉल करा, नवीन फिचर आले
15
डोक्याला ताप! दिवसभर इन्स्टाग्रामवर रील बनवायची बायको; नवरा ओरडल्यावर मुलासह गायब
16
शुक्रवारपासून पंचक प्रारंभ: ५ दिवस अत्यंत प्रतिकूल, अशुभ; ‘या’ गोष्टी करूच नयेत, अमंगल काळ!
17
TATA Motors च्या गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी; डीमर्जरची तारीख आली समोर, एकावर १ शेअर मिळणार
18
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
19
"बेबी, स्वीटी, तू माझ्यासोबत...!" विद्यार्थीनीसोबत एवढ्या घाणेरड्या गप्पा, समोर आलं चैतन्यानंदचं घृणास्पद चॅट
20
IMD: बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ धडकणार; ओडिशा किनारपट्टीला धोका!

वन संशोधनात निधीची आडकाठी

By admin | Updated: December 20, 2014 22:35 IST

वनांची प्रत सुधारून त्याची उत्पादन क्षमता वाढविणे हा वन व्यवस्थापनाचा मुख्य उद्देश आहे. मात्र वन व्यवस्थापनाच्या तरतुदी सागावरच केंद्रित झाल्या आहेत. त्यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहे.

मिळणारा निधी अपुरा : साग वगळता इतर प्रजातीचे संशोधन थांबलेरवी जवळे - चंद्रपूरवनांची प्रत सुधारून त्याची उत्पादन क्षमता वाढविणे हा वन व्यवस्थापनाचा मुख्य उद्देश आहे. मात्र वन व्यवस्थापनाच्या तरतुदी सागावरच केंद्रित झाल्या आहेत. त्यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहे. सागासोबतच इतर इमारती वृक्ष प्रजाती व गौण वन उपज देणाऱ्या प्रजातींचा संशोधनात्मक अभ्यास करण्यासाठी चंद्रपूरपासून सहा किमी अंतरावरील लोहारा येथे वन संशोधन केंद्र स्थापन करण्यात आले. देशातील हे अशाप्रकारचे पहिले केंद्र असले तरी यावर शासनाचीच वक्रदृष्टी आहे. वन संशोधनासाठी शासनाकडून मिळणारा निधी अतिशय तोकडा असल्याने या केंद्रात साग वगळता इतर प्रजातींचे संशोधन जवळजवळ थांबलेच आहे. पूर्व विदर्भातील चंद्रपूर व गडचिरोली जिल्हे उच्च प्रतिच्या सागाकरिता संपूर्ण देशात प्रसिध्द आहेत. यासोबतच या जिल्ह्यांमध्ये विविध इमारती वृक्ष प्रजाती व गौण वन उपज देणाऱ्या प्रजातींचा समावेश आहे. याशिवाय विविध वन औषधीही या परिसरातील जंगलात आढळून येतात. या सर्व प्रजातींचा संशोधनात्मक अभ्यास करण्याच्या उद्देशाने चंद्रपुरात १९६९ मध्ये महाराष्ट्र वन संशोधन संस्थेची स्थापना करण्यात आली. या संस्थेचे मुख्यालय चंद्रपुरातच आहे. या संस्थेचे मुख्य संशोधन केंद्र लोहारा येथे असून २६० हेक्टर क्षेत्र या कामांसाठी आरक्षित ठेवले आहे. आतापर्यंत देशातील विविध भागातून तब्बल २५९ सागांची रोपे या ठिकाणी आणून लावण्यात आली आहेत. या वृक्षांचे जतन केले जात असून मदर ट्री म्हणून याचा वापर केला जातो. विविध राज्यातील या सागांच्या झाडांपासून बीज काढले जाते. त्यावर या केंद्रातच असलेल्या संयंत्राद्वारे प्रक्रिया करून दुसऱ्या रोपांवर बड ग्राफ्टिंग केले जाते. यातून निर्माण होणाऱ्या नवीन सागांच्या झाडांची वाढ, त्याची गोलाई या बाबी तपासल्या जातात व उच्च प्रजातीचे सागवान वृक्ष तयार केले जातात. वास्तविक सागाचे ज्या पध्दतीने संशोधन केले जात आहे, तसेच संशोधन इतर वृक्षांच्या प्रजातींचेही व्हायला हवे. मात्र ते अद्याप या केंद्रात होत नसल्याची माहिती आहे. शासनाकडून जो निधी या संशोधन कार्यासाठी पाठविला जातो. त्यातील ९० टक्के निधी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतनावरच खर्च होतो. त्यामुळे इतर बाबींसाठी या कार्यालयाकडे निधीच नसतो.