शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

दीक्षाभूमीवर आंबेडकर भवनासाठी १ कोटी ९८ लाखांचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 00:12 IST

राज्याचे वित्त आणि नियोजन, वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने दीक्षाभूमी चंद्रपूर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन बांधकाम व परिसराचे सुशोभीकरण करण्यासाठी १ कोटी ९८ लाख १५ हजार ३०० ...

ठळक मुद्दे पालकमंत्र्यांकडून आश्वासनपूर्ती : दीक्षाभूमीला नवे स्वरूप येणार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्याचे वित्त आणि नियोजन, वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने दीक्षाभूमी चंद्रपूर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन बांधकाम व परिसराचे सुशोभीकरण करण्यासाठी १ कोटी ९८ लाख १५ हजार ३०० इतक्या रकमेच्या प्र्रस्तावाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने याबाबतचा शासन निर्णय २७ सप्टेंबर रोजी जारी केला आहे.वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दीक्षाभूमी चंद्रपूर येथे १६ आॅक्टोबर २०१६ रोजी निधी देण्याचे जाहीर केले होते. १९५६ ला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चंद्रपूर येथे तीन लाखांपेक्षा जास्त लोकांना बौध्द धर्माची दीक्षा दिल होती. या दिवसाची साक्ष म्हणून प्रत्येक वर्षी दीक्षाभूमी, चंद्रपूर येथे १५ व १६ आॅक्टोबरला धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभ साजरा केला जातो.१६ आॅक्टोबर २०१६ रोजी दीक्षाभूमी चंद्रपूर येथे धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभात बौध्दधर्मीय नागरिकांच्या मागणीच्या अनुषंगाने वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दीक्षाभूमीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन बांधकाम व परिसराचे सुशोभीकरण यासाठी निधी मंजूर करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार यासाठी २ कोटी रूपयांच्या मर्यादेत तत्वत: मान्यता २४ मार्च २०१७ च्या शासन निर्णयान्वये देण्यात आली आहे.आयुक्त समाजकल्याण पुणे यांचे मार्फत दीक्षाभूमीच्या विकासासाठी अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी, चंद्रपूर यांनी दीक्षाभूमीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन बांधकाम व परिसराचे सुशोभीकरणाच्या सादर केलेल्या १ कोटी ९८ लाख १५ हजार ३०० इतक्या रकमेच्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यासंदर्भात सन २०१७-१८ च्या अर्थसंकल्पात सुध्दा ना. मुनगंटीवार यांनी निधी उपलबध करण्याची घोषण केली होती. ऐतिहासिक दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन व परिसर सुशोभीकरणाच्या माध्यमातून महामानवाला मोठी आदरांजली ठरणार आहे.या निधीमुळे दीक्षाभूमीला वेगळे रूप प्राप्त होणार आहे. त्यामुळे बौद्धबांधवांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून पालकमंत्र्यांचे आभार मानले आहे.