शहरं
Join us  
Trending Stories
1
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
2
काकासोबत असलेल्या प्रशिकवर बिबट्याची झडप, घरापासून ५० मीटरवर सापडला मृतदेह
3
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
4
‘टॅरिफ’मुळे प्लास्टिक उद्योग अडचणीत; ३ वर्षांत भारतातून इतर देशांमध्ये चौपटीने निर्यात वाढविण्याचे लक्ष्य
5
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
6
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
7
शेअर बाजाराच्या तेजीला ब्रेक; Sensex १४७ अंकांनी आपटला, निफ्टीतही घसरण; 'हे' प्रमुख स्टॉक्स घसरले
8
यूएई सामन्याआधी केलेलं नाटक पाकिस्तानच्या अंगलट, आयसीसीनं पाठवला ईमेल!
9
रुममेटशी भांडण, पोलिसांनी थेट झाडल्या गोळ्या, अमेरिकेत भारतीय इंजिनियरचा मृत्यू  
10
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
11
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
12
Nilon's Success Journey: लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
13
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
14
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
15
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
16
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
17
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
18
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
19
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
20
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर

दीक्षाभूमीवर आंबेडकर भवनासाठी १ कोटी ९८ लाखांचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 00:12 IST

राज्याचे वित्त आणि नियोजन, वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने दीक्षाभूमी चंद्रपूर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन बांधकाम व परिसराचे सुशोभीकरण करण्यासाठी १ कोटी ९८ लाख १५ हजार ३०० ...

ठळक मुद्दे पालकमंत्र्यांकडून आश्वासनपूर्ती : दीक्षाभूमीला नवे स्वरूप येणार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्याचे वित्त आणि नियोजन, वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने दीक्षाभूमी चंद्रपूर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन बांधकाम व परिसराचे सुशोभीकरण करण्यासाठी १ कोटी ९८ लाख १५ हजार ३०० इतक्या रकमेच्या प्र्रस्तावाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने याबाबतचा शासन निर्णय २७ सप्टेंबर रोजी जारी केला आहे.वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दीक्षाभूमी चंद्रपूर येथे १६ आॅक्टोबर २०१६ रोजी निधी देण्याचे जाहीर केले होते. १९५६ ला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चंद्रपूर येथे तीन लाखांपेक्षा जास्त लोकांना बौध्द धर्माची दीक्षा दिल होती. या दिवसाची साक्ष म्हणून प्रत्येक वर्षी दीक्षाभूमी, चंद्रपूर येथे १५ व १६ आॅक्टोबरला धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभ साजरा केला जातो.१६ आॅक्टोबर २०१६ रोजी दीक्षाभूमी चंद्रपूर येथे धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभात बौध्दधर्मीय नागरिकांच्या मागणीच्या अनुषंगाने वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दीक्षाभूमीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन बांधकाम व परिसराचे सुशोभीकरण यासाठी निधी मंजूर करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार यासाठी २ कोटी रूपयांच्या मर्यादेत तत्वत: मान्यता २४ मार्च २०१७ च्या शासन निर्णयान्वये देण्यात आली आहे.आयुक्त समाजकल्याण पुणे यांचे मार्फत दीक्षाभूमीच्या विकासासाठी अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी, चंद्रपूर यांनी दीक्षाभूमीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन बांधकाम व परिसराचे सुशोभीकरणाच्या सादर केलेल्या १ कोटी ९८ लाख १५ हजार ३०० इतक्या रकमेच्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यासंदर्भात सन २०१७-१८ च्या अर्थसंकल्पात सुध्दा ना. मुनगंटीवार यांनी निधी उपलबध करण्याची घोषण केली होती. ऐतिहासिक दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन व परिसर सुशोभीकरणाच्या माध्यमातून महामानवाला मोठी आदरांजली ठरणार आहे.या निधीमुळे दीक्षाभूमीला वेगळे रूप प्राप्त होणार आहे. त्यामुळे बौद्धबांधवांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून पालकमंत्र्यांचे आभार मानले आहे.