शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

मेंडकीच्या विकासासाठी निधी देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 05:00 IST

ब्रह्मपुरी क्षेत्रात वाघांची संख्या ताडोबापेक्षा जास्त आहे. त्यामुळे ‘इको टुरिझम’ विकसित करून स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देऊ. पर्यावरणाच्या दृष्टीने वाघ महत्त्वाचा असला तरी मानवाचा जीवसुद्धा महत्त्वाचाच आहे. माणसाने वाघाला मारले तर मानवावर गुन्हा दाखल होतो. याबाबत कायदे कडक आहेत. त्यामुळे यावर तोडगा काढून मानव - वन्यजीव संघर्ष कमी करण्याबाबत वन विभागाला सूचना केल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ब्रह्मपुरी तालुक्यातील मेंडकी परिसरात मूलभूत सोयी-सुविधांबरोबरच पिण्याचे पाणी, अंतर्गत रस्ते आदी विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.रामनगर टोली येथे ग्रामीण भागातील मूलभूत सोयी-सुविधेअंतर्गत हनुमान मंदिर परिसराच्या आवारात सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन करताना ते बोलत होते. या वेळी जि.प. सदस्य प्रभाकर सेलोकर, स्मिता पारधी, उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, प.स. सदस्य ज्ञानेश्वर कायरकर, सरपंच मंगला इरपाते, हेमराज तिडके, मंगला लोणबळे, सुनील आंबटकर, राजेश कांबळे आदी उपस्थित होते.रामनगर येथे २० लक्ष रुपये खर्च करून सामाजिक सभागृह बांधण्यात येत आहे, असे सांगून पालकमंत्री वडेट्टीवार म्हणाले, निधी मंजूर नसताना केवळ नागरिकांना भूलथापा देण्यासाठी यापूर्वीच्या काळात तीन वेळा या सभागृहाचे भूमिपूजन करण्यात आले. मात्र आम्ही पहिले निधीची तरतूद केली. तांत्रिक व प्रशासकीय मान्यता मिळविली आणि त्यानंतर भूमिपूजन केले. आता येथे लवकरच सभागृहाचे बांधकाम करून त्याचे लोकार्पण करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी या वेळी दिले.

इको-टुरिझम विकसित करूनब्रह्मपुरी क्षेत्रात वाघांची संख्या ताडोबापेक्षा जास्त आहे. त्यामुळे ‘इको टुरिझम’ विकसित करून स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देऊ. पर्यावरणाच्या दृष्टीने वाघ महत्त्वाचा असला तरी मानवाचा जीवसुद्धा महत्त्वाचाच आहे. माणसाने वाघाला मारले तर मानवावर गुन्हा दाखल होतो. याबाबत कायदे कडक आहेत. त्यामुळे यावर तोडगा काढून मानव - वन्यजीव संघर्ष कमी करण्याबाबत वन विभागाला सूचना केल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.

 

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारtourismपर्यटन