शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
4
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
5
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
6
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
7
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
8
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
9
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
10
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
11
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
12
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
13
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
17
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
18
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
20
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!

पुरातन व सांस्कृतिक वारशांच्या जतनासाठी निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 00:03 IST

चंद्रपूर या ऐतिहासिक महानगरातील गोंडकालीन समृद्ध अशा वारशाचे तसेच चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील व जिल्ह्यातील पुरातन वास्तुंचे जतन करण्यासाठी केंद्रीय पर्यटन व सांस्कृतिक मंत्रालयाकडून भरीव निधी उपलब्ध केला जाईल, ....

ठळक मुद्देप्राचीन ठेवा चकाकणार : हंसराज अहीर यांना केंद्रीय पर्यटन मंत्र्यांची ग्वाही

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर या ऐतिहासिक महानगरातील गोंडकालीन समृद्ध अशा वारशाचे तसेच चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील व जिल्ह्यातील पुरातन वास्तुंचे जतन करण्यासाठी केंद्रीय पर्यटन व सांस्कृतिक मंत्रालयाकडून भरीव निधी उपलब्ध केला जाईल, अशी ग्वाही केंद्रीय पर्यटन व सांस्कृतिक मंत्री डॉ.महेश शर्मा यांनी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान दिली.चंद्रपूर जिल्ह्यातील नादुरुस्त व भग्नावस्थेतील वास्तुंचे पुनर्बांधकाम करण्यात यावे व यासाठी भरीव निधीची तरतूद करावी, अशी मागणी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केली असता केंद्रीय पर्यटन मंत्र्यांनी यावेळी सर्व मागण्यांकडे विशेष लक्ष देत निधीची तरतूद केली जाईल, असे चर्चेदरम्यान आश्वासन दिले.ना. हंसराज अहीर यांच्या नवी दिल्ली स्थित शासकीय निवासस्थानावर २६ सप्टेंबर रोजी झालेल्या या चर्चेदरम्यान चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार नाना श्यामकुळे, वणी क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, आर्णी क्षेत्राचे आमदार राजू तोडसाम, भाजपा नेते विजय राऊत, इको-प्रोचे बंडू धोतरे, नितीन रामटेके, रवींद्र गुरनुले, ऐतिहासिक वास्तुंचे अभ्यासक टी.टी. जुलमे आदींची यावेळी उपस्थिती होती.केंद्रीय पर्यटन मंत्र्यांना चंद्रपूर जिल्ह्यातील ऐतिहासिक वास्तू, धार्मिक स्थळे व परकोटांविषयक वारसा दर्शविणारी पुस्तिका यावेळी सादर करण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्यात पर्यटनाच्या दृष्टीने काय पावले उचलता येतील, संशोधन व संवर्धनाकरिता कोणत्या बाबींची आवश्यकता आहे, याबाबतचा सविस्तर अहवाल सादर करण्याची सूचना केंद्रीय पर्यटन मंत्र्यांनी यावेळी केली. चंद्रपूर जिल्ह्यात व लोकसभा क्षेत्रामध्ये दुर्लक्षित असलेल्या वास्तुंसाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात यावा, अशी मागणी ना.अहीर यांनी केली. पर्यटन मंत्र्यांनी चंद्रपूर जिल्ह्यास भेट देऊन या ऐतिहासिक, पुरातन वास्तुंचा परामर्ष घ्यावा, अशी विनंती सुद्धा ना. अहीर यांनी केली. केंद्रीय पर्यटन मंत्र्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील पर्यटन विषयक सर्व बाबी व सूचनांची योग्य दखल घेऊन येथील ऐतिहासिक वारशांचे जतन, संरक्षण व संवर्धन करण्याची काळजी घेतली जाईल असे सांगितले. स्वच्छ भारत अभियानाच्या अनुषंगाने इको-प्रोद्वारा चंद्रपूर महानगरातील ऐतिहासिक परकोटांची व त्या परिसराची स्वच्छता करण्याचे अभियान तब्बल २०० दिवस राबविण्यात आले. या उपक्रमांची प्रशंसा केली.