शहरं
Join us  
Trending Stories
1
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
2
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
3
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
4
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
5
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
6
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
7
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
8
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
9
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
10
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
11
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
12
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
13
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
14
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
15
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
16
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
17
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
18
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
19
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
20
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य

श्रमिक एल्गार संघटनेचा एसडीओ कार्यालयावर मोर्चा

By admin | Updated: January 26, 2017 01:26 IST

गरिबांना वेळेवर धान्याचे वाटप करावे व वनजमिनी नियमानुकूल करावे या मागणीसाठी मूल

एकास अटक : दोन दिवसांची पोलीस कोठडी मूल : गरिबांना वेळेवर धान्याचे वाटप करावे व वनजमिनी नियमानुकूल करावे या मागणीसाठी मूल व सावली तालुका श्रमिक एल्गारच्या वतीने मूल उपविभागीय कार्यालयावर बुधवारी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात दोन्ही तालुक्यातील हजारो महिला-पुरूष सहभागी झाले होते. सरकारचे धोरण गरीब विरोधी असून त्याविरोधात श्रमिक एल्गारचा लढा सतत सुरू राहील, असा निर्धार संघटनेच्या अध्यक्ष अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी यांनी व्यक्त केला. त्या मोर्चाला संबोधीत करताना बोलत होत्या. जिल्ह्यातील अनेक एपीएल कुटूंबात कुपोषीत मुले असल्याने कुपोषण मुक्तीसाठी सरकारने प्रयत्न केले पाहीजे, याकडे त्यांनी सरकारचे लक्ष वेधले. उपविभागीय अधिकारी उपस्थित नसल्याने मूलचे तहसिलदार सरवदे व सावलीचे तहसिलदार भोयर यांनी मागण्याचे निवेदन स्वीकारले. यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष विजय सिध्दावार, श्रमिक एल्गारचे कार्यकर्ते विजय कोरेवार, महासचिव घनश्याम मेश्राम, छाया सिडाम, अनिल मडावी, संगीता गेडाम, रवी शेरकी, रामचंद्र हुलके, यात्रीका कुमरे, मिराबाई पेटकुले यांची भाषणे झालीत. सभेचे संचालन मूल तालुका सचिव दिनेश घाटे यांनी तर आभार किरण शेंडे यांनी मानले. मोर्चाच्या यशस्वीतेसाठी फरजाना शेख, सपना कामडी, वंदना मांदाडे, अनिल शेंडे, अमित राऊत, प्रेमदास उईके, बाळू मडावी, अरूण जराते, वच्छलाबाई लटारे, दौलत शेंडे यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी) या आहेत मागण्या एपीएल कार्डधारकांना रेशन मिळाले पाहिजे, धान्यात वाढ झाली पाहीजे, कुपोषण मुक्तीसाठी प्रत्येक कुटूंबाला धान्य द्यावे, प्रत्येक कुटूंबाला किमान दोन लिटर रॉकेल द्यावे, वनजमिनीसाठी गैरआदिवासी करीता लावलेली तीन पिढ्याची अट रद्द करावी, पट्टे देण्यासाठी ग्रामसभेची पन्नास टक्के उपस्थितीची अट रद्द करावी, या मागण्या मोर्चेकऱ्यांनी मांडल्या.