शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: 'पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या पापाचा घडा भरला अन् त्यानंतर...', भारताचे डीजीएमओ घई काय बोलले?
2
'याचना नहीं, अब रण होगा...' कवितेने सुरुवात; आर्मीने दाखवला 'ऑपरेशन सिंदूर'चा नवा व्हिडिओ
3
Operation Sindoor : "हौसले बुलंद हो, तो..." क्रिकेटचा किस्सा ऐकवत DGMO नी दिला स्पष्ट मेसेज, पाकचा 'खेळ खल्लास' कसा केला ते सांगितलं!
4
भारत-पाकिस्तान डीजीएमओंची हॉटलाईन कनेक्ट होऊ शकली नाही; थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करणार
5
जग कधीच विसरू शकणार नाही विराट कोहलीचे हे 10 कसोटी विक्रम; कुण्याही भारतीयाला जमला नाही असा पराक्रम
6
"मी विराटचे अश्रू पाहिलेत..."; 'किंग कोहली'च्या कसोटी निवृत्तीनंतर अनुष्का शर्माची भावनिक पोस्ट
7
स्मिता पाटील यांच्या मृत्यूनंतर प्रतीकला दत्तक घेणार होती बॉलिवूडची 'ही' प्रसिद्ध जोडी! अभिनेत्याचा मोठा खुलासा 
8
Kangana Ranaut : "जितके संयमी, तितकेच धाडसी"; ऑपरेशन सिंदूरच्या यशाने कंगना राणौत खूश, मोदींचं केलं कौतुक
9
'युद्ध रोमँटिक चित्रपट नाही, गंभीर मुद्दा आहे', माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांचे सूचक विधान
10
संरक्षण दलांसोबत अधिक समन्वयाने काम करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सुतोवाच
11
सेव्हिंग अकाऊंटमध्ये पैसे ठेवूनही मिळेल FD इतकं व्याज; फक्त करावं लागेल 'हे' महत्त्वाचं काम
12
भारताच्या सीमेवर अवकाशातूनही करडी नजर; ISRO लॉन्च करणार RISAT-1B, काय आहे खास वैशिष्टे?
13
विराट कोहलीच्या कसोटी निवृत्तीवर 'हेड कोच' गौतम गंभीरचे ट्विट, सिंहाशी तुलना करत म्हणाला...
14
अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्धाला अखेर पूर्णविराम; ट्रम्प आता किती टॅरिफ आकारणार?
15
Technology: तुटलेल्या केबलचे चार्जर वापरणे ताबडतोब थांबवा; होईल मोठे नुकसान!
16
एल्विशची सिस्टम हँग होणार! सापाचे विष आणि ड्रग्जच्या वापराप्रकरणात युट्यूबरला कोर्टाचा दणका
17
पाकिस्तानात आज पुन्हा भूकंपाचे धक्का; ७ दिवसांत तिसऱ्यांदा हादरली पाकची जमीन
18
सचिन वर्सेस विराट; कसोटीत कोण ठरलं भारी! इथं पाहा खास रेकॉर्ड
19
एका झटक्यात सोन्याच्या दरात २००० रुपयांपेक्षा अधिक घसरण; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
20
Mehraj Malik : "रेशनचा मोठा तुटवडा; दुकानांमध्ये पीठ, तांदूळ, साखर उपलब्ध नाही, जनतेमध्ये भीतीचं वातावरण"

संगणक परिचालकांनी विविध मागण्यांसाठी काढला मोर्चा

By admin | Updated: September 29, 2014 23:03 IST

केंद्र शासनाच्या पंचायतराज मंत्रालयाने ईपीआरआय हा प्रकल्प सर्व राज्यांमध्ये राबविला आहे. त्यानुसार सर्व ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांमध्ये संगणकीकरण करणे अंतर्भूत आहे.

चंद्रपूर : केंद्र शासनाच्या पंचायतराज मंत्रालयाने ईपीआरआय हा प्रकल्प सर्व राज्यांमध्ये राबविला आहे. त्यानुसार सर्व ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांमध्ये संगणकीकरण करणे अंतर्भूत आहे. यासाठी संगणक परिचालक म्हणून बेरोजगार प्रशिक्षित युवकांची पदभरती करण्यात आली. मात्र कर्मचाऱ्यांचे मानधन वेळेवर दिले जात नसून थकीत ठेवण्यात आले आहे. वेतन वेळेवर द्यावे, अशी मागणी करीत संगणक चालकांनी सोमवारी मोर्चा काढत जिल्हाधिकारी तसेच मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना निवेदन दिले. दरम्यान, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून जिल्हा परिषद प्रशासनाने पोलिसांना पाचारण केले. एवढेच नाही तर, जिल्हा परिषदेचे दोन्ही गेट बंद करून मोर्चेकऱ्यांना अडविण्यात आले.ई-पीआरआय प्रकल्पाची राज्यात अंमलबजावणी करण्यासाठी महाआॅनलाईन कंपनीमार्फत हा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र या कंपनीकडून वेळेवर वेतन दिले जात नसून मुलाखतीच्या वेळी निश्चित केलेले ८ हजार ८२४ रुपये एवढे वेतन न देता केवळ ३ हजार ८०० ते ४ हजार रुपये प्रतिमहिना वेतन दिले जाते. परंतु यातही तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागतो. त्यामुळे संगणक चालक त्रस्त झाले आहे.महाआॅनलाईन कंपनीकडे विनंती अर्ज करण्यात आले. त्याचबरोबर मुख्य कार्यपालन अधिकारी यांनाही लेखी निवेदन देण्यात आले. मात्र काहीही उपयोग झाला नाही. दरम्यान संगणक चालकांनी श्रमिक एल्गार संघटनेच्या नेतृत्वात आमरण उपोषण सुरु केले. तरीही प्रशासनाने दखल घेतली नसल्याने सोमवारी महाकाली मंदिर परिसरातून मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर प्रथम जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर जिल्हा परिषदेवर मोर्चा नेण्यात आला. श्रमिक एल्गारच्या अध्यक्षा अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी यांच्या नेतृत्वात मुख्य कार्यपालन अधिकारी आशुतोष सलिल यांना निवेदन दिले. दरम्यान जिल्हा परिषद परिसरात आज मोठ्या प्र्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. मात्र अद्यापही तोडगा निघाला नसल्याने साखळी उपोषण सुरुच ठेवण्यात आले आहे. (नगर प्रतिनिधी)