शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
2
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
3
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
4
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
5
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
6
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
7
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
8
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
9
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
10
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
11
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
12
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
13
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
14
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
15
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
16
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
17
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
18
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
19
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
20
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे

संगणक परिचालकांनी विविध मागण्यांसाठी काढला मोर्चा

By admin | Updated: September 29, 2014 23:03 IST

केंद्र शासनाच्या पंचायतराज मंत्रालयाने ईपीआरआय हा प्रकल्प सर्व राज्यांमध्ये राबविला आहे. त्यानुसार सर्व ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांमध्ये संगणकीकरण करणे अंतर्भूत आहे.

चंद्रपूर : केंद्र शासनाच्या पंचायतराज मंत्रालयाने ईपीआरआय हा प्रकल्प सर्व राज्यांमध्ये राबविला आहे. त्यानुसार सर्व ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांमध्ये संगणकीकरण करणे अंतर्भूत आहे. यासाठी संगणक परिचालक म्हणून बेरोजगार प्रशिक्षित युवकांची पदभरती करण्यात आली. मात्र कर्मचाऱ्यांचे मानधन वेळेवर दिले जात नसून थकीत ठेवण्यात आले आहे. वेतन वेळेवर द्यावे, अशी मागणी करीत संगणक चालकांनी सोमवारी मोर्चा काढत जिल्हाधिकारी तसेच मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना निवेदन दिले. दरम्यान, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून जिल्हा परिषद प्रशासनाने पोलिसांना पाचारण केले. एवढेच नाही तर, जिल्हा परिषदेचे दोन्ही गेट बंद करून मोर्चेकऱ्यांना अडविण्यात आले.ई-पीआरआय प्रकल्पाची राज्यात अंमलबजावणी करण्यासाठी महाआॅनलाईन कंपनीमार्फत हा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र या कंपनीकडून वेळेवर वेतन दिले जात नसून मुलाखतीच्या वेळी निश्चित केलेले ८ हजार ८२४ रुपये एवढे वेतन न देता केवळ ३ हजार ८०० ते ४ हजार रुपये प्रतिमहिना वेतन दिले जाते. परंतु यातही तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागतो. त्यामुळे संगणक चालक त्रस्त झाले आहे.महाआॅनलाईन कंपनीकडे विनंती अर्ज करण्यात आले. त्याचबरोबर मुख्य कार्यपालन अधिकारी यांनाही लेखी निवेदन देण्यात आले. मात्र काहीही उपयोग झाला नाही. दरम्यान संगणक चालकांनी श्रमिक एल्गार संघटनेच्या नेतृत्वात आमरण उपोषण सुरु केले. तरीही प्रशासनाने दखल घेतली नसल्याने सोमवारी महाकाली मंदिर परिसरातून मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर प्रथम जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर जिल्हा परिषदेवर मोर्चा नेण्यात आला. श्रमिक एल्गारच्या अध्यक्षा अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी यांच्या नेतृत्वात मुख्य कार्यपालन अधिकारी आशुतोष सलिल यांना निवेदन दिले. दरम्यान जिल्हा परिषद परिसरात आज मोठ्या प्र्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. मात्र अद्यापही तोडगा निघाला नसल्याने साखळी उपोषण सुरुच ठेवण्यात आले आहे. (नगर प्रतिनिधी)