शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
3
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
4
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
5
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
6
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
7
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
8
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
9
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
10
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
11
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
12
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
13
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
14
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
15
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
16
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
17
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
18
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
19
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
20
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."

शेतकºयांचा मोर्चा धडकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 00:29 IST

राज्य सरकारने कर्जमाफीच्या नावावर शेतकºयांची दिशाभूल केली आहे. रोज नवनवीन शासन निर्णय काढून शेतकºयांना वेठीस धरण्याचे काम फडणवीस सरकारकडून सुरु आहे.

ठळक मुद्देशेकडोंचा सहभाग : तहसीलदारांना दिले ‘माझी कर्जमाफी झाली नाही’चे पाच हजार अर्ज

लोकमत न्यूज नेटवर्ककोरपना : राज्य सरकारने कर्जमाफीच्या नावावर शेतकºयांची दिशाभूल केली आहे. रोज नवनवीन शासन निर्णय काढून शेतकºयांना वेठीस धरण्याचे काम फडणवीस सरकारकडून सुरु आहे. आॅनलाईन नोंदणी प्रक्रियेमुळे शेतकरी वैतागला आहे. त्यामुळे शेतकºयांच्या कर्जमाफीचा मुद्दा घेऊन महाराष्ट्र काँग्रेस कमेटीचे सरचिटणीस तथा राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वात तालुका काँग्रेस, युवक काँग्रेस व महिला काँग्रेसच्या वतीने सोमवारी दुपारी २ वाजता कोरपना तहसील कार्यालयावर शेतकºया धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात परिसरातील शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने सुरु असलेल्या ‘माझी कर्जमाफी झाली नाही’ या मोहिमेर्तगत शेतकºयांकडून काँग्रेस कार्यकर्त्यांनी भरून घेतलेले ५ हजार अर्ज तहसीलदार हरीश गाडे यांच्याकडे देण्यात आले.यावेळी माजी आमदार सुभाष धोटे शेतकºयांना मार्गदर्शन करताना केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील फडणवीस सरकार शेतकरी, शेतमजूर, कामगार, शोषित, पीडितांना फक्त आश्वासनाचे गाजर देत असून त्यापलिकडे काहीच दिले नाही. शेतकºयांची कर्जमाफी केली म्हणून शासन गाजावाजा करीत आहे. मात्र प्रत्यक्षात किती शेतकºयांची कर्जमाफी झाली असा सवाल त्यांनी शासनाला केला. सरकार हे फसणवीस सरकार असून शासनाने दुर्गम व आदिवासी भागातील शेतकºयांना आॅनलाईन अर्ज भरण्याच्या सूचना केल्या आहे. मात्र आॅनलाईन अर्ज भरणे आदिवासी भागातील शेतकºयांना शक्य होत नाही आहे. अनेक ठिकाणी इंटरनेटची व्यवस्था नाही. वेगवेगळ्या जटील अटी व शर्ती लादून कर्जमाफी केली आहे म्हणणाºया शासनाला धडा शिकविण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने राज्यात ज्या शेतकºयांची कर्जमाफी झाली नाही अशांकडून ‘माझी कर्जमाफी झाली नाही’ म्हणून अर्ज भरून घेतले आहे, असे सांगितले. मोर्चात तालुकाध्यक्ष विठ्ठल थिपे, विजय बावणे, सभापती शाम रणदिवे, उपसभापती संभाशिव कोवे, जि.प. सदस्य शिवचंद्र काळे, विनाताई मालेकर, कल्पना पेचे, उत्तम पेचे, सिताराम कोडापे, युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष आशिष देरकर, महासचिव विक्रम येरणे, सतीश बेतावर, उमेश राजूरकर, महिलाध्यक्ष ललिता गेडाम, रऊफ खान, वजीर खान आदी सहभागी झाले होते.राहुल गांधी यांच्यावरील हल्ल्याचा निषेधगुजरातमध्ये राहुल गांधी यांच्यावर झालेला हल्ला म्हणजे लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार आहे. विकृत विचारसरणी असलेल्या लोकांकडूनच अशी अपेक्षा करता येते. ७० वर्षांच्या काळात काँग्रेसकडून भाजपच्या नेतृत्वाला अशाप्रकारच्या घटनांना सामोरे जाण्याची वेळ आली नव्हती. काँग्रेसने संस्कृती जपली. मात्र अल्पावधीत भाजपच्या लोकांची वृत्ती तानाशाही झाल्याचे सांगत या घटनेचा सुभाष धोटे यांनी निषेध केला.