शहरं
Join us  
Trending Stories
1
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
2
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
3
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
4
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
5
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
6
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
7
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
8
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
9
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
10
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
11
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
12
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
13
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
14
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
15
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
16
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
17
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
18
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
19
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
20
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र

शेतकºयांचा मोर्चा धडकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 00:29 IST

राज्य सरकारने कर्जमाफीच्या नावावर शेतकºयांची दिशाभूल केली आहे. रोज नवनवीन शासन निर्णय काढून शेतकºयांना वेठीस धरण्याचे काम फडणवीस सरकारकडून सुरु आहे.

ठळक मुद्देशेकडोंचा सहभाग : तहसीलदारांना दिले ‘माझी कर्जमाफी झाली नाही’चे पाच हजार अर्ज

लोकमत न्यूज नेटवर्ककोरपना : राज्य सरकारने कर्जमाफीच्या नावावर शेतकºयांची दिशाभूल केली आहे. रोज नवनवीन शासन निर्णय काढून शेतकºयांना वेठीस धरण्याचे काम फडणवीस सरकारकडून सुरु आहे. आॅनलाईन नोंदणी प्रक्रियेमुळे शेतकरी वैतागला आहे. त्यामुळे शेतकºयांच्या कर्जमाफीचा मुद्दा घेऊन महाराष्ट्र काँग्रेस कमेटीचे सरचिटणीस तथा राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वात तालुका काँग्रेस, युवक काँग्रेस व महिला काँग्रेसच्या वतीने सोमवारी दुपारी २ वाजता कोरपना तहसील कार्यालयावर शेतकºया धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात परिसरातील शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने सुरु असलेल्या ‘माझी कर्जमाफी झाली नाही’ या मोहिमेर्तगत शेतकºयांकडून काँग्रेस कार्यकर्त्यांनी भरून घेतलेले ५ हजार अर्ज तहसीलदार हरीश गाडे यांच्याकडे देण्यात आले.यावेळी माजी आमदार सुभाष धोटे शेतकºयांना मार्गदर्शन करताना केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील फडणवीस सरकार शेतकरी, शेतमजूर, कामगार, शोषित, पीडितांना फक्त आश्वासनाचे गाजर देत असून त्यापलिकडे काहीच दिले नाही. शेतकºयांची कर्जमाफी केली म्हणून शासन गाजावाजा करीत आहे. मात्र प्रत्यक्षात किती शेतकºयांची कर्जमाफी झाली असा सवाल त्यांनी शासनाला केला. सरकार हे फसणवीस सरकार असून शासनाने दुर्गम व आदिवासी भागातील शेतकºयांना आॅनलाईन अर्ज भरण्याच्या सूचना केल्या आहे. मात्र आॅनलाईन अर्ज भरणे आदिवासी भागातील शेतकºयांना शक्य होत नाही आहे. अनेक ठिकाणी इंटरनेटची व्यवस्था नाही. वेगवेगळ्या जटील अटी व शर्ती लादून कर्जमाफी केली आहे म्हणणाºया शासनाला धडा शिकविण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने राज्यात ज्या शेतकºयांची कर्जमाफी झाली नाही अशांकडून ‘माझी कर्जमाफी झाली नाही’ म्हणून अर्ज भरून घेतले आहे, असे सांगितले. मोर्चात तालुकाध्यक्ष विठ्ठल थिपे, विजय बावणे, सभापती शाम रणदिवे, उपसभापती संभाशिव कोवे, जि.प. सदस्य शिवचंद्र काळे, विनाताई मालेकर, कल्पना पेचे, उत्तम पेचे, सिताराम कोडापे, युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष आशिष देरकर, महासचिव विक्रम येरणे, सतीश बेतावर, उमेश राजूरकर, महिलाध्यक्ष ललिता गेडाम, रऊफ खान, वजीर खान आदी सहभागी झाले होते.राहुल गांधी यांच्यावरील हल्ल्याचा निषेधगुजरातमध्ये राहुल गांधी यांच्यावर झालेला हल्ला म्हणजे लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार आहे. विकृत विचारसरणी असलेल्या लोकांकडूनच अशी अपेक्षा करता येते. ७० वर्षांच्या काळात काँग्रेसकडून भाजपच्या नेतृत्वाला अशाप्रकारच्या घटनांना सामोरे जाण्याची वेळ आली नव्हती. काँग्रेसने संस्कृती जपली. मात्र अल्पावधीत भाजपच्या लोकांची वृत्ती तानाशाही झाल्याचे सांगत या घटनेचा सुभाष धोटे यांनी निषेध केला.