शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
4
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
5
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
6
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
7
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
8
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
9
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
10
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
11
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
12
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
14
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
15
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
16
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
17
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
18
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
19
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
20
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला

खाद्यतेलाचा वारंवार वापर हा तर गुन्हा, होऊ शकतो कॅन्सर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:33 IST

चंद्रपूर : कमी दर्जाच्या भेसळयुक्त अन्न पदार्थांची विक्री करणे, खाद्यपदार्थ तळताना खाद्यतेलाचा वारंवार वापर करणे हे अन्न व सुरक्षा ...

चंद्रपूर : कमी दर्जाच्या भेसळयुक्त अन्न पदार्थांची विक्री करणे, खाद्यपदार्थ तळताना खाद्यतेलाचा वारंवार वापर करणे हे अन्न व सुरक्षा कायद्यानुसार नियमबाह्य आहे. यासाठी संबंधितांवर गुन्हाही दाखल होतो. असे असले तरी जिल्ह्यातील काही ठिकाणी अशा पद्धतीने तळलेल्या तेलाचा पुनर्वापर होत आहे. त्यामुळे नागरिकांनी अन्न औषध प्रशासन विभागाच्या कारवाईची वाट न बघता वेळीच सावध होऊन अशा ठिकाणचे पदार्थ खाणे टाळले पाहिजे.

चंद्रपूर शहरासह जिल्ह्यातील काही ठिकाणी उघड्यावर खाद्यपदार्थ तयार केले जातात. एवढेच नाही तर खाद्यपदार्थ तळताना त्या तेलाचा पुनर्वापर केला जातो. यामुळे आरोग्याच्या तक्रारी वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे जिभेचे चोचले पुरविण्यापूर्वी एकदा आपल्या आरोग्याचा विचार करूनच कोणतेही पदार्थ सेवन करण्यापूर्वी विचार केलेला बरा.

बाॅक्स

रस्त्यावर न खाल्लेले बरे

जिभेचे चोचले पुरविण्यासाठी नागरिक रस्त्याच्या कडेला उघड्यावर विक्री करणारे पदार्थ आवडीने खातात. मोठ्या हाॅटेलच्या तुलनेमध्ये स्वस्तसुद्धा मिळतात. मात्र, या ठिकाणी कमी दर्जाच्या तेलाचा वापर केला जातो, तसेच तेलाचा पुनर्वापर केला जातो. तेलाचा पुनर्वापर करणे नियमबाह्य आहे. असे पदार्थ सेवन केल्याने पोटाचे, हृदयाचे विकार, घशाची जळजळ आदी वाढण्याची शक्यता असते.

बाॅक्स

तेलाचा पुनर्वापर घातक

तेलामध्ये एकदा कोणताही पदार्थ तळला आणि त्यानंतर त्याच उरलेल्या तेलात दुसरे पदार्थ बनवले गेले तर अशा तेलात फ्री रेडिकल्स तयार होतात. हे रेडिकल्स शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम करतात. अनेकदा या रेडिकल्समुळे कॅन्सर होण्याची शक्यता वाढते. आपल्या शरीरातील कॉलेस्ट्रॉल वाढून धमन्या ब्लॉक होतात.

कोट

तेलाचा पुनर्वापर करून तळलेले पदार्थ सेवन केल्याने शरीरात कोलेस्ट्राॅल वाढतात. परिणामी आजारांना बळी पडावे लागते. एकदा वापरलेले तेल पुन्हा वापरल्यावर ॲसिडीटी तसेच ह्रदयासंबंधित आजार, पार्किंसन्सचे आजार आणि घशाची जळजळ या सारख्या समस्या उदभवू शकतात. कोणतेही पदार्थ सेवन करताना प्रथम चौकशी करून, त्यानंतर खावे. जेणेकरून आरोग्यावर परिणाम पडणार नाही.

-डाॅ. सौरभ राजूरकर

छातीरोग तज्ज्ञ, चंद्रपूर.