शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
2
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
3
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
4
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
5
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
6
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
7
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
8
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
9
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
10
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
11
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
12
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
13
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
14
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
15
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
16
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
17
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
18
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
19
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
20
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी

स्वातंत्र्याने मोकळा श्वास दिला; विकास कुठे आहे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:29 IST

कोरोनाने हिरावले स्वातंत्र्य भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. यंदा अमृत महाेत्सवी वर्षात पदार्पण करीत आहोत. हयात असलेल्या ...

कोरोनाने हिरावले स्वातंत्र्य

भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. यंदा अमृत महाेत्सवी वर्षात पदार्पण करीत आहोत. हयात असलेल्या फार कमी लोकांनी पारतंत्र्य काळातील इंग्रजांच्या गुलामगिरीचा काळ अनुभवला आहे. इंग्रजांनी अनेक निर्बंध लादले होते. यातून मुक्त झालो. विकासाचे स्वप्न घेऊन पुढे जाऊ लागलो. पण, खरोखरच सर्वांची प्रगती झाली का हा प्रश्न आहे. दोन वर्षांपासून कोरोनामुळे देशांतर्गत निर्बंध आले. मोकळा श्वास घेण्याचे स्वातंत्र्य उरले नाही. शिक्षणाचेही तीनतेरा वाजले. मुलांचे प्रचंड नुकसान होत आहे.

-मनोहर स्वामी, वरोरा

पारतंत्र्याचा काळ खूप संघर्षाचा होता. आज जशा सोयीसुविधा आहेत तशा सुविधा पूर्वी नव्हत्या. विविध क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती झाली. पण, स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही बेरोजगारी, गुन्हेगारी व कर्जबाजारीपणामुळे नागरिक त्रस्त आहेत.

-नामदेव देवाळकर, ज्येष्ठ नागरिक, गोवरी

महिला विविध क्षेत्रात प्रगती करीत आहेत. महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत. क्रीडा क्षेत्र तर युवतींच्या आवडीचे क्षेत्र झाले आहे. परंतु, आज महिला सुरक्षित नाहीत, याची खंत वाटते. महिलांवर वाढत जाणारे अत्याचार आज चिंतेची बाब आहे.

-गायत्री उरकुडे, अंतरगाव (बु.)

भारताने विविध क्षेत्रात प्रगती केली. विज्ञान व तंत्रज्ञानामुळे नवे जग उभे झाले. यंदा ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदक मिळाल्याने खेळाडूंमध्ये चैतन्य निर्माण झाले. परंतु, आतापर्यंतच्या वाटचालीत समस्याही निर्माण झाल्या. राजकीय नेतृत्व स्वार्थाच्या दावणीला बांधल्याने बेरोजगारीचे प्रश्न उग्र रूप धारण करीत आहेत. त्यावर उपायांची गरज आहे.

-प्रद्युत डोहणे, सावली

मुली शिक्षणात अग्रेसर आहेत. त्यांना स्वावलंबी होण्यासाठी शासनाने योग्य धोरण राबविले पाहिजे. पालकांची मानसिकता बदलत आहे. पण, गरीब कुटुुंबांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे.

-वैशाली घोडमारे, बाबूपेठ, चंद्रपूर