शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
2
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
3
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
4
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
5
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
6
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
7
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
8
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
9
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
10
आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
11
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
12
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
13
Astro Tips: मनासारखा जोडीदार नशिबात आहे की नाही हे कसे ओळखावे? ज्योतिष शास्त्रानुसार... 
14
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
15
"विवाहित मुलांना वडिलांच्या मालमत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही"; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
16
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
17
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
18
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
19
"तुम्ही धर्मेंद्र यांच्या घराबाहेरुन..." पापाराझींना पाहताच पहिल्यांदाच वैतागला रोहित शेट्टी, काय म्हणाला?
20
"नौगाम पोलीस ठाण्यात झालेला ब्लास्ट केवळ...! मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता"; काय म्हणाले JK पोलीस?
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्याने मोकळा श्वास दिला; विकास कुठे आहे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:29 IST

कोरोनाने हिरावले स्वातंत्र्य भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. यंदा अमृत महाेत्सवी वर्षात पदार्पण करीत आहोत. हयात असलेल्या ...

कोरोनाने हिरावले स्वातंत्र्य

भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. यंदा अमृत महाेत्सवी वर्षात पदार्पण करीत आहोत. हयात असलेल्या फार कमी लोकांनी पारतंत्र्य काळातील इंग्रजांच्या गुलामगिरीचा काळ अनुभवला आहे. इंग्रजांनी अनेक निर्बंध लादले होते. यातून मुक्त झालो. विकासाचे स्वप्न घेऊन पुढे जाऊ लागलो. पण, खरोखरच सर्वांची प्रगती झाली का हा प्रश्न आहे. दोन वर्षांपासून कोरोनामुळे देशांतर्गत निर्बंध आले. मोकळा श्वास घेण्याचे स्वातंत्र्य उरले नाही. शिक्षणाचेही तीनतेरा वाजले. मुलांचे प्रचंड नुकसान होत आहे.

-मनोहर स्वामी, वरोरा

पारतंत्र्याचा काळ खूप संघर्षाचा होता. आज जशा सोयीसुविधा आहेत तशा सुविधा पूर्वी नव्हत्या. विविध क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती झाली. पण, स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही बेरोजगारी, गुन्हेगारी व कर्जबाजारीपणामुळे नागरिक त्रस्त आहेत.

-नामदेव देवाळकर, ज्येष्ठ नागरिक, गोवरी

महिला विविध क्षेत्रात प्रगती करीत आहेत. महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत. क्रीडा क्षेत्र तर युवतींच्या आवडीचे क्षेत्र झाले आहे. परंतु, आज महिला सुरक्षित नाहीत, याची खंत वाटते. महिलांवर वाढत जाणारे अत्याचार आज चिंतेची बाब आहे.

-गायत्री उरकुडे, अंतरगाव (बु.)

भारताने विविध क्षेत्रात प्रगती केली. विज्ञान व तंत्रज्ञानामुळे नवे जग उभे झाले. यंदा ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदक मिळाल्याने खेळाडूंमध्ये चैतन्य निर्माण झाले. परंतु, आतापर्यंतच्या वाटचालीत समस्याही निर्माण झाल्या. राजकीय नेतृत्व स्वार्थाच्या दावणीला बांधल्याने बेरोजगारीचे प्रश्न उग्र रूप धारण करीत आहेत. त्यावर उपायांची गरज आहे.

-प्रद्युत डोहणे, सावली

मुली शिक्षणात अग्रेसर आहेत. त्यांना स्वावलंबी होण्यासाठी शासनाने योग्य धोरण राबविले पाहिजे. पालकांची मानसिकता बदलत आहे. पण, गरीब कुटुुंबांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे.

-वैशाली घोडमारे, बाबूपेठ, चंद्रपूर