शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

दुष्काळग्रस्त तालुक्यातील विद्यार्थ्यांना मोफत बसप्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 22:05 IST

नुकत्याच जाहीर केलेल्या १८० दुष्काळगस्त तालुक्यातील विद्यार्थ्यांना महामंडळाकडून मोफत बस सेवा मिळणार आहे. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, चिमूर, गोंडपिपरी, नागभीड पोंभुर्णा, राजुरा, सिंदेवाही व वरोरा या दहा तालुक्याचा समावेश आहे.

ठळक मुद्देदहा तालुक्यांचा समावेश : रा. प. महामंडळाचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : नुकत्याच जाहीर केलेल्या १८० दुष्काळगस्त तालुक्यातील विद्यार्थ्यांना महामंडळाकडून मोफत बस सेवा मिळणार आहे. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, चिमूर, गोंडपिपरी, नागभीड पोंभुर्णा, राजुरा, सिंदेवाही व वरोरा या दहा तालुक्याचा समावेश आहे. या तालुक्यातील शैक्षणिक, तांत्रिक तसेच व्यावसायिक शिक्षण घेण्याऱ्या विद्यार्थ्यांना सत्र २०१८- १९ साठी मोफत प्रवास सुविधा देण्यात येणार आहे. याबाबतचे परिपत्रक महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने ५ नोव्हेेंबर रोजी प्रारित केले आहे.दरवर्षीच असमानी व सुलतानी संकटाना शेतकºयांना पुढे जावे लागते. त्यामुळे शासनाने यावर्षी महा मदत प्रणालीतर्फे दुष्काळासाठी मुल्यांकन केले. त्यानुसार ट्रिगर दोन नुसार महाराष्ट्रातील सुमारे १८० तालुके दुष्काळग्रस्त जाहीर केले आहेत. त्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील १० तालुक्याचा समावेश आहे. दुष्काळगस्त तालुक्यांना विविध उपाययोजना व सवलती लागू करण्याबाबत शासन निर्णय महसूल व वनविभागाने नुकताच घेतला आहे. राज्य परिवहन महामंडळाने सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने दुष्काळसदृश्य १८० तालुक्यांतील शैक्षणिक, तांत्रिक, तसेच व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या  शालेय व महाविद्यार्थ्यालयीन विद्यार्थ्यांना सन २०१८-२०१९ च्या शैक्षणिक सत्रासाठी १५ नोव्हेंबर २०१८ ते १५ एप्रिल २०१९ मोफत प्रवास सुविधा देण्यात येणार आहे.शहरी भागासाठी अनुज्ञेय नाहीसदर योजना १५ नोव्हेंबर २०१८ ते १५ एप्रिल २०१९ या सत्रासाठी लागू आहे. मात्र ही पास नुतणीकरण करणाऱ्यांना केवळ ग्रामीण बससेवेकरिता अनुज्ञेय राहणार तर शहरी बससेविकरिता ही योजना अनुज्ञेय राहणार नाही.पूर्वीच्या पासधारकांनाही लागूराष्ट्रीय परिवहन महामंडळाकडून शैक्षणिक, तांत्रिक, तसेच व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मासिक पासात ६६.६७ टक्के सवलत देण्यात येत होती. मात्र आता दुष्काळग्रस्त तालुक्यातील विद्यार्थ्यांना पास नुतनीकरण करताना उर्वरीत ३३.३३ टक्के रक्कमही सुट देण्यात आली आहे.