शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
सारा तेंडुलकर 'या' बॉलिवूड अभिनेत्याला करतेय 'डेट'? दीपिका पदुकोणसोबत दिलेत भरपूर 'किसिंग सीन'
3
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
4
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
5
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
6
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
7
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
8
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
9
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
10
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
11
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
12
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

जिल्ह्यातील जनतेला २०० युनिटपर्यंत मोफत वीज द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 01:18 IST

वस्तू जिथे तयार होते ती तिथे स्वस्त मिळते. असे असताना चंद्रपूर जिल्ह्यात तब्बल ५५०० मे.वॅ. वीज निर्मिती होत असतानाही येथील जनतेला भरमसाठ वीज बिल भरावे लागते.

ठळक मुद्देकिशोर जोरगेवार : आंदोलनाची शृंखला चालविणार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वस्तू जिथे तयार होते ती तिथे स्वस्त मिळते. असे असताना चंद्रपूर जिल्ह्यात तब्बल ५५०० मे.वॅ. वीज निर्मिती होत असतानाही येथील जनतेला भरमसाठ वीज बिल भरावे लागते. जिल्ह्यात सहा वीज कंपन्यांमध्ये दररोज एक लाख टनपेक्षा अधिक कोळसा जळतो. यामुळे भयंकर प्रदूषणाचा सामना करावा लागतो. एकतर चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना २०० युनिटपर्यंत मोफत वीज द्या अन्यथा वीज निर्मिती केंद्र बंद करा, असा खणखणीत इशारा शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख तथा चंद्रपूर विधानसभा क्षेत्र प्रमुख किशोर जोरगेवार यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत दिला.चंद्रपूर जिल्हा वनसंपत्तीने नटलेला आहे. येथे खजिन व पाण्यासाठी इरई नदी अस्तित्वात आहे. पाणी आणि कोळशाच्या मुबलकतेमुळे आशिया खंडातील सर्वात जास्त वीज निर्मिती करणारे सीटीपीएस केंद्र सुरू आहे. हा प्रकल्प ६० एकरात व्यापला आहे. महाराष्ट्राला लागणाºया २५ टक्के विजेचे उत्पादन करणाºया चंद्रपूर जिल्ह्याला प्रदूषणाची झळ सोसावी लागत आहे. तसेच सरकार येथील जनतेला महागडी वीज देते.यामध्ये सामान्य जनतेचे मोठे नुकसान होत आहे. आणि दुसरीकडे मुंबईत मात्र हीच वीज स्वस्तात उपलब्ध करून दिली जाते. हा ंचद्रपूर जिल्ह्यातील जनतेवर अन्याय आहे. यापुढे हा अन्याय येथील जनता सहन करणार नाही, जनतेला किमान २०० युनिटपर्यंत मोफत वीज द्यावी. त्यानंतरच्या युनिटला उत्पादन खर्चाएवढे बील आकारावे, यासाठी लोकशाही मार्गाने जनआंदोलन उभारण्यात येणार आहे, अशी माहितीही जोरगेवार यांनी दिली.प्रति युनिट वीज उत्पादन खर्च २.५० रुपये इतका आहे. मात्र हीच वीज वीज कंपनीला ४ ते १४ रुपये प्रतियुनिट प्रमाणे जनतेसाठी विकत घ्यावी लागत आहे. सीटीपीएस हा प्रकल्प ६० एकरात व्यापला आहे. या जागेत तज्ज्ञांच्या माहितीनुसार सौर ऊर्जेची निर्मिती करून सुद्धा वीज उत्पादन केल्या जाऊ शकते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.आंदोलनाचाच एक भाग म्हणून प्रदूषणाची विदारक स्थिती दर्शविणारी माहिती असलेल्या २५ हजार पुस्तिका प्रकाशित करून जनतेला त्याचे वितरण केले जाणार आहे. सोबतच पाच लाख लोकांच्या स्वाक्षरीचे निवेदन मुख्यमंत्री व पंतप्रधानांसा सोपविले जाणार असल्याचेही जोरगेवार यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख दीपक दापके व अन्य मंडळी उपस्थित होती.महागड्या विजेमुळे८० टक्के उद्योग ठप्पवीज महागात पडत असल्यामुळे जिल्ह्यातील ८० टक्के उद्योग ठप्प पडलेले आहे. नवीन उद्योग शेजारच्या राज्यात गेल्याचे एका सर्वेक्षणात आढळून आले आहे. परिणामी स्थानिक बेरोजगारांचा रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.