शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
2
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
3
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
4
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
5
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
6
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
7
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
8
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
9
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
10
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
11
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
12
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
13
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
14
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
15
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
16
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
17
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
18
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
19
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
20
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  

जिल्ह्यातील जनतेला २०० युनिटपर्यंत मोफत वीज द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 01:18 IST

वस्तू जिथे तयार होते ती तिथे स्वस्त मिळते. असे असताना चंद्रपूर जिल्ह्यात तब्बल ५५०० मे.वॅ. वीज निर्मिती होत असतानाही येथील जनतेला भरमसाठ वीज बिल भरावे लागते.

ठळक मुद्देकिशोर जोरगेवार : आंदोलनाची शृंखला चालविणार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वस्तू जिथे तयार होते ती तिथे स्वस्त मिळते. असे असताना चंद्रपूर जिल्ह्यात तब्बल ५५०० मे.वॅ. वीज निर्मिती होत असतानाही येथील जनतेला भरमसाठ वीज बिल भरावे लागते. जिल्ह्यात सहा वीज कंपन्यांमध्ये दररोज एक लाख टनपेक्षा अधिक कोळसा जळतो. यामुळे भयंकर प्रदूषणाचा सामना करावा लागतो. एकतर चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना २०० युनिटपर्यंत मोफत वीज द्या अन्यथा वीज निर्मिती केंद्र बंद करा, असा खणखणीत इशारा शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख तथा चंद्रपूर विधानसभा क्षेत्र प्रमुख किशोर जोरगेवार यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत दिला.चंद्रपूर जिल्हा वनसंपत्तीने नटलेला आहे. येथे खजिन व पाण्यासाठी इरई नदी अस्तित्वात आहे. पाणी आणि कोळशाच्या मुबलकतेमुळे आशिया खंडातील सर्वात जास्त वीज निर्मिती करणारे सीटीपीएस केंद्र सुरू आहे. हा प्रकल्प ६० एकरात व्यापला आहे. महाराष्ट्राला लागणाºया २५ टक्के विजेचे उत्पादन करणाºया चंद्रपूर जिल्ह्याला प्रदूषणाची झळ सोसावी लागत आहे. तसेच सरकार येथील जनतेला महागडी वीज देते.यामध्ये सामान्य जनतेचे मोठे नुकसान होत आहे. आणि दुसरीकडे मुंबईत मात्र हीच वीज स्वस्तात उपलब्ध करून दिली जाते. हा ंचद्रपूर जिल्ह्यातील जनतेवर अन्याय आहे. यापुढे हा अन्याय येथील जनता सहन करणार नाही, जनतेला किमान २०० युनिटपर्यंत मोफत वीज द्यावी. त्यानंतरच्या युनिटला उत्पादन खर्चाएवढे बील आकारावे, यासाठी लोकशाही मार्गाने जनआंदोलन उभारण्यात येणार आहे, अशी माहितीही जोरगेवार यांनी दिली.प्रति युनिट वीज उत्पादन खर्च २.५० रुपये इतका आहे. मात्र हीच वीज वीज कंपनीला ४ ते १४ रुपये प्रतियुनिट प्रमाणे जनतेसाठी विकत घ्यावी लागत आहे. सीटीपीएस हा प्रकल्प ६० एकरात व्यापला आहे. या जागेत तज्ज्ञांच्या माहितीनुसार सौर ऊर्जेची निर्मिती करून सुद्धा वीज उत्पादन केल्या जाऊ शकते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.आंदोलनाचाच एक भाग म्हणून प्रदूषणाची विदारक स्थिती दर्शविणारी माहिती असलेल्या २५ हजार पुस्तिका प्रकाशित करून जनतेला त्याचे वितरण केले जाणार आहे. सोबतच पाच लाख लोकांच्या स्वाक्षरीचे निवेदन मुख्यमंत्री व पंतप्रधानांसा सोपविले जाणार असल्याचेही जोरगेवार यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख दीपक दापके व अन्य मंडळी उपस्थित होती.महागड्या विजेमुळे८० टक्के उद्योग ठप्पवीज महागात पडत असल्यामुळे जिल्ह्यातील ८० टक्के उद्योग ठप्प पडलेले आहे. नवीन उद्योग शेजारच्या राज्यात गेल्याचे एका सर्वेक्षणात आढळून आले आहे. परिणामी स्थानिक बेरोजगारांचा रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.