शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनात चौपट वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 23:54 IST

कौटुंबिक हिंसाचार रोखण्यासाठी शासन, प्रशासनाकडून अनेक उपाययोजना होत आहेत. २००५ मध्ये तसा कायदाही संपूर्ण भारतात लागू करण्यात आला. मात्र यानंतरही कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांचा आलेख वाढतच असल्याची बाब चंद्रपूर पोलीस दलाच्या महिला सहाय्य कक्षातून मिळालेल्या माहितीतून समोर आली आहे.

ठळक मुद्देविविध प्रकरणे : महिला सहाय्य कक्षाची आकडेवारी

मंगेश भांडेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कौटुंबिक हिंसाचार रोखण्यासाठी शासन, प्रशासनाकडून अनेक उपाययोजना होत आहेत. २००५ मध्ये तसा कायदाही संपूर्ण भारतात लागू करण्यात आला. मात्र यानंतरही कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांचा आलेख वाढतच असल्याची बाब चंद्रपूर पोलीस दलाच्या महिला सहाय्य कक्षातून मिळालेल्या माहितीतून समोर आली आहे. २०१५ व २०१६ या दोन वर्षाच्या तुलनेत २०१७ व २०१८ या दोन वर्षांत कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांत तब्बल चौपट वाढ झाली आहे. २०१५-१६ मध्ये १६ घटना तर २०१७-१८ या दोन वर्षांत तब्बल ८४ घटना घडल्या आहेत.ज्या कुटुंबात अथवा घरात ‘ती’ स्वत:ला सुरक्षित समजते, त्याच तिच्या घरात ‘ती’ कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडत आहे. स्त्रियांच्या होणाऱ्या कौटुंबिक छळास प्रतिबंध घालण्यासाठी केंद्र शासनाने कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम २००५ व नियम २००६ संपूर्ण भारतात २६ आॅक्टोबर २००६ पासून लागू केला. मात्र ज्या महिलांना या कायद्याची माहिती नाही, त्या निमुटपणे कौटुंबिक हिंसाचार आजही सहन करीत असल्याचे अनेक प्रकरणांवरून समोर आले आहे.वास्तविक स्त्री ज्या परिवारासोबत वा साथीदारासोबत एकाच छताखाली राहत असेल आणि तिचा छळ ‘त्या’ पुरुषाकडून होत असेल तर ती कौटुंबिक हिंसाचार कायद्यान्वये न्याय दंडाधिकाºयांकडे संरक्षण मागू शकते. मात्र असे केल्याने आपले संसार तुटणार या भीतीने काही महिला तक्रार करीत नाही आणि अन्यायाला बळी पडतात.काही महिला हिमंत करून पोलिसांत तक्रार करतात. अशी जिल्हाभरातील प्रकरणे महिला सहाय्य कक्षाकडे पाठविले जातात. या महिला सहाय्य कक्षातून ‘त्या’ महिलेला न्याय मिळवून देण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. मात्र मागील चार वर्षांचा विचार केल्यास दोन वर्षांत चौपट वाढ झाल्याचे आकेडवारी सांगते.कौटुंबिक हिंसाचारात अशा प्रकरणांचा समावेशकौटुंबिक हिंसाचारात मुख्यता शारीरिक, शाब्दिक, लैंगिक, मानसिक, आर्थिक छळ, हुंडा किंवा मालमत्ता देण्यासाठी महिलेला अपमानित करणे, तिला शिवीगाळ करणे, अपत्य नसल्यामुळे तिला हिणवणे किंवा धमकावणे, त्रास देणे, दुखापत करणे, जखमी करणे किंवा पीडित महिलेचा जीव धोक्यात आणण्यास भाग पाडणे, तिच्या कोणत्याही नातेवाईकाकडे हुंड्याची मागणी करणे, नोकरी करण्यास मज्जाव करणे, अशा घटनांचा समावेश आहे.स्त्री- पुरुष समानता केवळ देखावास्त्रीचा जन्मच अत्याचार सोसण्यासाठी झाला आहे, अशी समाजातील काहींची धारणा आहे. या धारणेला गरीब, श्रीमंत, जात, धर्म, पंथ, शिक्षित, अशिक्षित, ग्रामीण, शहरी, नोकरीवाले, बिगरनोकरीवाले असा कुठलाही अपवाद नाही. स्त्री- पुरुष समानता ही बाब आपल्याकडे केवळ आपण आधुनिक विचारणीचे आहोत, हे दाखविण्यापुरतीच मर्यादीत आहे. वास्तव नेमके याच्या उलट आहे.