शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange: '...तोपर्यंत मुंबई सोडणार नाही', नोटीसनंतर मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा
2
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: बस… आता थांबा, नामुष्की टाळायची असेल तर आंदोलन संपवा, सरकारला सहकार्य करा; जरांगेंना कुणाचा सल्ला?
3
औषधांवर २०० टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्लॅन; भारतावर किती होणार परिणाम?
4
सोन्याने गाठली विक्रमी पातळी! तुमच्या शहरात एक तोळ्याचा आजचा भाव काय? अचानक का आली तेजी?
5
तुळजाभवानीच्या पुजारी मंडळावरून पेटला वाद, आजी-माजी पदाधिकारी आमने-सामने
6
आंदोलनात बेकायदेशीर कृत्ये, लवकरात लवकर मैदान रिकामं करा; मनोज जरांगेंना पाठवलेल्या पोलिसांच्या नोटीसमध्ये काय?
7
UAE चा कॅप्टन Muhammad Waseem नं साधला मोठा डाव! हिटमॅन रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला
8
भारत-रशिया मैत्री पाहून अमेरिका भडकली, ट्रम्प यांचे सल्लागार संतापले; म्हणाले, 'आमच्यासोबत...!'
9
"ती काम करत नाही, पण मी...", मृणालने अनुष्कावर साधला निशाणा? सलमानचा 'सुलतान' नाकारल्याचा दावा
10
Parivartani Ekadashi 2025: ज्यांना आयुष्यात परिवर्तन घडवायचे आहे, त्यांनी 'असे' करा एकादशी व्रत!
11
अनंत चतुर्दशी २०२५: गणेशोत्सवाची सांगता; पाहा, मान्यता, २०२६ मध्ये कधी येणार गणपती बाप्पा?
12
Mitchell Starc T20I Retirement : आगामी टी-२० वर्ल्ड कप आधी स्टार गोलंदाजाने घेतला निवृत्तीचा निर्णय; जाणून घ्या त्यामागचं कारण
13
४ राजयोगात परिवर्तिनी एकादशी: ९ राशींचे कल्याण-भरभराट, सुबत्ता-शुभ-लाभ; धनलक्ष्मी प्रसन्न!
14
GST बैठकीच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात तेजी; रिलायन्समध्ये सर्वाधिक वाढ तर 'हे' स्टॉक्स घसरले
15
अनवाणी चालत बाप्पाच्या दर्शनाला पोहोचला सलमान खान, पळत पळतच कारजवळ आला अन्...
16
Punjab Flood: अर्धा पंजाब पाण्यात! १३०० गावांना पुराचा वेढा, हजारो लोक बेघर; २९ जणांचा मृत्यू
17
Parivartani Ekadashi 2025: परिवर्तनी एकादशी; चातुर्मासाचा मध्यंतर, यादिवशी श्रीहरी श्रीविष्णूंची बदलतात कूस!
18
Maharashtra Rain: राज्यात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार, आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
19
गणेशोत्सव साजरा करत नाही आलिया? ट्रोल झाल्यानंतर दिलं सडेतोड उत्तर; फोटो शेअर करत म्हणाली...
20
'ही' आंतरराष्ट्रीय बँक भारतातून गाशा गुंडाळण्याच्या तयारीत? ग्राहकांच्या पैशांचं काय होणार?

मुनगंटीवारांच्या प्रयत्नामुळे चारवटचा कायापालट

By admin | Updated: May 29, 2017 00:31 IST

बल्लारपूर तालुक्यातील चारवट गाव इरई नदीच्या पुरामुळे पावसाळ्याच्या दिवसात नेहमीच वेढले जात होते. त्यामुळे वस्तीचे पुनर्वसन करण्याची मागणी होती.

चंदनसिंह चंदेल : दोन कोटींच्यावर विकास कामाचे भूमिपूजनलोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : बल्लारपूर तालुक्यातील चारवट गाव इरई नदीच्या पुरामुळे पावसाळ्याच्या दिवसात नेहमीच वेढले जात होते. त्यामुळे वस्तीचे पुनर्वसन करण्याची मागणी होती. पुनर्वसन प्रक्रिया झाली. परंतु वस्तीचा विकास रखडला होता. चारवट पुर्नवसित गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी अर्थ, नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी २ कोटी ७१ लाख ५३ हजार ५४३ रुपयांचा भरीव निधी उपलब्ध करून दिला. त्यांच्या प्रयत्नामुळे पुनर्वसीत चारवटचा कायापालट होण्यास मदत मिळणार आहे, असे प्रतिपादन वन विकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल यांनी केले.चंद्रपूर जिल्ह्यातील पुर्नवसित चारवट येथे शुक्रवारी सिमेंट काँक्रीट रस्त्याचे भूमिपूजन चंदनसिंह चंदेल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गावकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बल्लारपूरचे नगराध्यक्ष तथा भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरिश शर्मा होते.व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून बल्लारपूर पंचायत समतीचे सभापती गोविंदा पोडे, जिल्हा परिषद सदस्य अ‍ॅड. हरीश गेडाम, बल्लारपूर तालुका भाजपाचे अध्यक्ष किशोर पंदीलवार, पंचायत समिती सदस्य सोमेश्वर पद्मगिरीवार, हडस्तीचे सरपंच बंडू पारखी, उपसरपंच गुणिता गौरकार, मुर्लीधर गौरकार, नांदगाव (पोडे) येथील सरपंच प्रमोद देठे, उपसरपंच मल्लेश कोडारी, बांधकाम उपअभियंता पी.पी. जोशी, अभियंता दोरखंडे यांची उपस्थिती होती.याप्रसंगी चंदनसिंह चंदेल म्हणाले की, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सातत्याने प्रयत्नशील राहून शासनाकडे चारवट गावाचे पुनर्वसन करण्याची मागणी केली. त्यानुसार २००६ मध्ये गावाचा पुनर्वसनाला मान्यता देण्यात आली. पुनर्वसित गावाचा विकास करण्यासाठी ६ मार्च २०१७ रोजी शासन निर्णय निर्गमित करून २ कोटी १८ लाख २७ हजार ८१७ रुपये किंमतीच्या अंदाजपत्रकाला मान्यता दिली. या निधीतून गावातील अंतर्गत रस्ते, खडीकरणाचे काम, नाली बांधकाम व विद्युत व्यवस्था केली जाणार आहे. त्याचप्रमाणे ५३ लाख २५ हजार ७६६ रुपये ार्च करून गावात नळ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित केली जाणार आहे. एकूण २ कोटी ७१ लाख ५३ हजार ५८३ रुपये खर्च करून पुर्नवसित चारवटचा सर्वांगसुंदर विकास ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नामुळे होत असल्याचे चंदेल यांनी सांगितले.नगराध्यक्ष हरीश शर्मा, सभापती गोविंदा पोडे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. संचालन माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर देऊळकर यांनी तर आभार भाजपाचे तालुकाध्यक्ष किशोर पंदीलवार यांनी मानले. यावेळी गावकऱ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.