शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

मुनगंटीवारांच्या प्रयत्नामुळे चारवटचा कायापालट

By admin | Updated: May 29, 2017 00:31 IST

बल्लारपूर तालुक्यातील चारवट गाव इरई नदीच्या पुरामुळे पावसाळ्याच्या दिवसात नेहमीच वेढले जात होते. त्यामुळे वस्तीचे पुनर्वसन करण्याची मागणी होती.

चंदनसिंह चंदेल : दोन कोटींच्यावर विकास कामाचे भूमिपूजनलोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : बल्लारपूर तालुक्यातील चारवट गाव इरई नदीच्या पुरामुळे पावसाळ्याच्या दिवसात नेहमीच वेढले जात होते. त्यामुळे वस्तीचे पुनर्वसन करण्याची मागणी होती. पुनर्वसन प्रक्रिया झाली. परंतु वस्तीचा विकास रखडला होता. चारवट पुर्नवसित गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी अर्थ, नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी २ कोटी ७१ लाख ५३ हजार ५४३ रुपयांचा भरीव निधी उपलब्ध करून दिला. त्यांच्या प्रयत्नामुळे पुनर्वसीत चारवटचा कायापालट होण्यास मदत मिळणार आहे, असे प्रतिपादन वन विकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल यांनी केले.चंद्रपूर जिल्ह्यातील पुर्नवसित चारवट येथे शुक्रवारी सिमेंट काँक्रीट रस्त्याचे भूमिपूजन चंदनसिंह चंदेल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गावकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बल्लारपूरचे नगराध्यक्ष तथा भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरिश शर्मा होते.व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून बल्लारपूर पंचायत समतीचे सभापती गोविंदा पोडे, जिल्हा परिषद सदस्य अ‍ॅड. हरीश गेडाम, बल्लारपूर तालुका भाजपाचे अध्यक्ष किशोर पंदीलवार, पंचायत समिती सदस्य सोमेश्वर पद्मगिरीवार, हडस्तीचे सरपंच बंडू पारखी, उपसरपंच गुणिता गौरकार, मुर्लीधर गौरकार, नांदगाव (पोडे) येथील सरपंच प्रमोद देठे, उपसरपंच मल्लेश कोडारी, बांधकाम उपअभियंता पी.पी. जोशी, अभियंता दोरखंडे यांची उपस्थिती होती.याप्रसंगी चंदनसिंह चंदेल म्हणाले की, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सातत्याने प्रयत्नशील राहून शासनाकडे चारवट गावाचे पुनर्वसन करण्याची मागणी केली. त्यानुसार २००६ मध्ये गावाचा पुनर्वसनाला मान्यता देण्यात आली. पुनर्वसित गावाचा विकास करण्यासाठी ६ मार्च २०१७ रोजी शासन निर्णय निर्गमित करून २ कोटी १८ लाख २७ हजार ८१७ रुपये किंमतीच्या अंदाजपत्रकाला मान्यता दिली. या निधीतून गावातील अंतर्गत रस्ते, खडीकरणाचे काम, नाली बांधकाम व विद्युत व्यवस्था केली जाणार आहे. त्याचप्रमाणे ५३ लाख २५ हजार ७६६ रुपये ार्च करून गावात नळ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित केली जाणार आहे. एकूण २ कोटी ७१ लाख ५३ हजार ५८३ रुपये खर्च करून पुर्नवसित चारवटचा सर्वांगसुंदर विकास ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नामुळे होत असल्याचे चंदेल यांनी सांगितले.नगराध्यक्ष हरीश शर्मा, सभापती गोविंदा पोडे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. संचालन माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर देऊळकर यांनी तर आभार भाजपाचे तालुकाध्यक्ष किशोर पंदीलवार यांनी मानले. यावेळी गावकऱ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.