शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

मुनगंटीवारांच्या प्रयत्नामुळे चारवटचा कायापालट

By admin | Updated: May 29, 2017 00:31 IST

बल्लारपूर तालुक्यातील चारवट गाव इरई नदीच्या पुरामुळे पावसाळ्याच्या दिवसात नेहमीच वेढले जात होते. त्यामुळे वस्तीचे पुनर्वसन करण्याची मागणी होती.

चंदनसिंह चंदेल : दोन कोटींच्यावर विकास कामाचे भूमिपूजनलोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : बल्लारपूर तालुक्यातील चारवट गाव इरई नदीच्या पुरामुळे पावसाळ्याच्या दिवसात नेहमीच वेढले जात होते. त्यामुळे वस्तीचे पुनर्वसन करण्याची मागणी होती. पुनर्वसन प्रक्रिया झाली. परंतु वस्तीचा विकास रखडला होता. चारवट पुर्नवसित गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी अर्थ, नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी २ कोटी ७१ लाख ५३ हजार ५४३ रुपयांचा भरीव निधी उपलब्ध करून दिला. त्यांच्या प्रयत्नामुळे पुनर्वसीत चारवटचा कायापालट होण्यास मदत मिळणार आहे, असे प्रतिपादन वन विकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल यांनी केले.चंद्रपूर जिल्ह्यातील पुर्नवसित चारवट येथे शुक्रवारी सिमेंट काँक्रीट रस्त्याचे भूमिपूजन चंदनसिंह चंदेल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गावकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बल्लारपूरचे नगराध्यक्ष तथा भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरिश शर्मा होते.व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून बल्लारपूर पंचायत समतीचे सभापती गोविंदा पोडे, जिल्हा परिषद सदस्य अ‍ॅड. हरीश गेडाम, बल्लारपूर तालुका भाजपाचे अध्यक्ष किशोर पंदीलवार, पंचायत समिती सदस्य सोमेश्वर पद्मगिरीवार, हडस्तीचे सरपंच बंडू पारखी, उपसरपंच गुणिता गौरकार, मुर्लीधर गौरकार, नांदगाव (पोडे) येथील सरपंच प्रमोद देठे, उपसरपंच मल्लेश कोडारी, बांधकाम उपअभियंता पी.पी. जोशी, अभियंता दोरखंडे यांची उपस्थिती होती.याप्रसंगी चंदनसिंह चंदेल म्हणाले की, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सातत्याने प्रयत्नशील राहून शासनाकडे चारवट गावाचे पुनर्वसन करण्याची मागणी केली. त्यानुसार २००६ मध्ये गावाचा पुनर्वसनाला मान्यता देण्यात आली. पुनर्वसित गावाचा विकास करण्यासाठी ६ मार्च २०१७ रोजी शासन निर्णय निर्गमित करून २ कोटी १८ लाख २७ हजार ८१७ रुपये किंमतीच्या अंदाजपत्रकाला मान्यता दिली. या निधीतून गावातील अंतर्गत रस्ते, खडीकरणाचे काम, नाली बांधकाम व विद्युत व्यवस्था केली जाणार आहे. त्याचप्रमाणे ५३ लाख २५ हजार ७६६ रुपये ार्च करून गावात नळ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित केली जाणार आहे. एकूण २ कोटी ७१ लाख ५३ हजार ५८३ रुपये खर्च करून पुर्नवसित चारवटचा सर्वांगसुंदर विकास ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नामुळे होत असल्याचे चंदेल यांनी सांगितले.नगराध्यक्ष हरीश शर्मा, सभापती गोविंदा पोडे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. संचालन माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर देऊळकर यांनी तर आभार भाजपाचे तालुकाध्यक्ष किशोर पंदीलवार यांनी मानले. यावेळी गावकऱ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.