शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
2
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
3
‘शार्क’शिवाय ‘सार्क’? अशक्य!
4
एअर इंडियाला इंधन नियंत्रण स्विचमध्ये कोणताही दोष आढळला नाही, बोईंग 787 विमानाची तपासणी पूर्ण
5
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
6
आत्ता फक्त बिहार, नंतर तुमच्याही मानेवर तलवार! मतदार यादी व्हेरिफिकेशनचे वास्तव भयानकच...
7
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
8
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
9
राज्य कामगार विमा योजनेत नोंदणी नसलेल्यांनी लक्ष द्या...
10
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
11
बंपर लॉटरी लागली! भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल
12
इस्रायली उद्योजकापासून दोन मुली; पतीला न सांगता महिला गोव्यातून गेली गुहेत राहायला
13
अधिवेशन गाजणार? विरोधक करणार कोंडी; काँग्रेससह विरोधी पक्षांकडून मुद्द्यांची जुळवाजुळव सुरू
14
जुनी शस्त्रे वापरून भारताला आधुनिक युद्धे जिंकणे अवघड; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे परखड मत
15
इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत २१ पट वाढ; चार्जिंग स्टेशनही तीन वर्षांत ५ पट वाढले
16
काैटुंबिक कलहातून होतेय कोवळ्या मुलांची हाेरपळ; बदलापुरात मुलीचे अपहरण; मुंब्य्रात आईच बनली क्रूर
17
रस्ते अपघातांच्या मुळाशी पोलिस का जात नाहीत? वाहनचालकच का ठरतात गुन्हेगार?
18
दोस्त दोस्त ना रहा..!   भांडणातून घेतला जीव 
19
तरुणांभोवती ऑनलाइन गेमचा फास; टार्गेट पूर्ण न झाल्याने दाेघांची आत्महत्या
20
खासदारांना 'हेल्दी मेन्यू'द्वारे मिळणार 'ताकद'!

बाबुपेठ रेल्वे उड्डाणपुलावरून चारचाकी वाहन खाली कोसळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2021 05:00 IST

अभिषेक गुप्ता व इतर तिघेजण मित्राच्या लग्नाला चंद्रपूरला आले होते. लग्न आटोपून चंद्रपूरहून बल्लारपूरकडे जात होते. मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवित होते. बायपास मार्गावरील उड्डाणपुलावजवळ चालकांचे नियंत्रण सुटल्याने वाहन ( क्रमांक एमएच ३४ बीआर ०१४१) पुलावरून खाली कोसळले.  या अपघातात अभिषेक गुप्ता (२२) रा. गोरक्षण वार्ड बल्लारपूर हा जागेवरच ठार झाला तर रोहित सुभाष तोगरवार (२१) व मोहन सल्लारेडी (२१) रा. बालाजी वाॅर्ड बल्लारपूर हे गंभीर जखमी झालेत.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मद्यधुंद अवस्थेत चारचाकी वाहनाने चंद्रपूरहून बल्लारपूरकडे जात असताना बायपास मार्गावरील डीएएड कॉलेजजवळील रेल्वे उड्डाण पुलाजवळ वाहन पलटल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहे. ही घटना रविवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अभिषेक गुप्ता रा. गोरक्षण वार्ड बल्लारपूर असे  मृतकाचे नाव आहे. अभिषेक गुप्ता व इतर तिघेजण मित्राच्या लग्नाला चंद्रपूरला आले होते. लग्न आटोपून चंद्रपूरहून बल्लारपूरकडे जात होते. मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवित होते. बायपास मार्गावरील उड्डाणपुलावजवळ चालकांचे नियंत्रण सुटल्याने वाहन ( क्रमांक एमएच ३४ बीआर ०१४१) पुलावरून खाली कोसळले.  या अपघातात अभिषेक गुप्ता (२२) रा. गोरक्षण वार्ड बल्लारपूर हा जागेवरच ठार झाला तर रोहित सुभाष तोगरवार (२१) व मोहन सल्लारेडी (२१) रा. बालाजी वाॅर्ड बल्लारपूर हे गंभीर जखमी झालेत व भुवन गजभिये (२१) रा. राजुरा किरकोळ जखमी झाला. चंद्रपूर शहर पोलिसांना या घटनेची  माहिती  मिळताच पोलीस उपनिरीक्षक नीलेश वाघमारे व त्यांची चमू लगेच तात्काळ घटनास्थळी पोहोचले व जखमींना तात्काळ चंद्रपूर सामान्य रुग्णालयात हलविले. तसेच क्रेनच्या सहाय्याने चारचाकी वाहन काढण्यात आले. वृत्त हाती येईपर्यंत दोघांची प्रकृती गंभीर असून एका युवकाला किरकोळ जखमी असल्याने सुटी देण्यात आली, अशी माहिती आहे. अपघातातील क्षतीग्रस्त झालेले वाहन बल्लारपुरातील सुभाष तोगरवार यांच्या मालकीचे होते. 

 

टॅग्स :Accidentअपघात