शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
4
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
5
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
6
निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा
7
भूपतीचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव, जगन म्हणतो शस्त्र ठेवणार नाही ! माओवादी संघटनेतील वाद चव्हाट्यावर
8
१०० वर्षांनी शुभ योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: ६ मूलांकांचे ग्रहण सुटेल; पैसा-लाभ-वरदान!
9
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
10
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
11
हृदयस्पर्शी! "आई-वडिलांना सोडून मुलगी गेली लंडनला"; ८० वर्षांचे आजोबा ट्रेनमध्ये विकतात पदार्थ
12
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
13
GST Rate Cut: ५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
14
Hanuman Temple: 'या' मंदिरात हनुमान निद्रावस्थेत, तरीही केवळ दर्शनाने पूर्ण होते भक्तांची प्रत्येक इच्छा 
15
Vivo Y50i: झटक्यात चार्ज होणार आणि दिर्घकाळ चालणार; विवोचा बजेट स्मार्टफोन बाजारात!
16
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
17
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
18
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
19
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
20
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क

महा औष्णिक केंद्राला ‘फोर स्टॉर रेटिंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 22:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : औद्योगिक विश्वात पर्यावरणासंबंधी उत्तम कामगिरी करणाऱ्या चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रास राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने ‘फोर स्टॉर रेटिंग’ देऊन गौरव केला आहे.चंद्रपूर महाऔष्णिक केंद्रात सद्या सात संच असून विद्युत निर्मिती क्षमता २९२० मेगावॅट आहे. संच क्र. ३ व ४ संच २१० मेगावॅट आणि ५ ते ९ हे ...

ठळक मुद्देप्रदूषणाला आळा : राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे सन्मानित

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : औद्योगिक विश्वात पर्यावरणासंबंधी उत्तम कामगिरी करणाऱ्या चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रास राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने ‘फोर स्टॉर रेटिंग’ देऊन गौरव केला आहे.चंद्रपूर महाऔष्णिक केंद्रात सद्या सात संच असून विद्युत निर्मिती क्षमता २९२० मेगावॅट आहे. संच क्र. ३ व ४ संच २१० मेगावॅट आणि ५ ते ९ हे संच ५०० मेगावॅट क्षमतेचे आहेत. संचाच्या धुरांड्यामधून धूर कमी निघावा, याकरिता संच क्र. ३ ते ९ मध्ये प्रत्येक संचाला ईएसपी हे संयंत्र बसविण्यात आले आहे. तसेच संच क्र. ३ ते ७ मध्ये इएसपी सोबतच अद्ययावत अमोनिया फ्लु गॅस कंडिशनिंग हे संयंत्र बसविण्यात आले आहे. त्यामुळे इएसपीमधून जास्त प्रमाणात राख बाहेर काढण्यात येते. संच क्र. ८ व ९ ची एसपीएम डिझाईनची क्षमता मोठी आहे. धुरांड्यातील निघणारी राख कमी प्रमाणात म्हणजेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नेमून दिलेल्या मर्यादेतच राहते.चंद्रपूर महाऔष्णिक केंद्रातील धुरांड्यातील राख बाहेर जाऊ नये व राखेचे प्रमाण कमी ठेवण्याकरिता प्रत्येक संचाच्या इएसपी व विविध प्रदूषण नियंत्रण प्रणालीचे काम संबंधित विभागातील अभियंते, रसायन शास्त्रज्ञ व तंत्रज्ञाकडे सकारात्मकपणे व नियमित केले जात आहे. परिणामी, प्रदुषणाला आळा बसला आहे.औष्णिक केंदातून वेगवेगळ्या प्रक्रियेतून जे पाणी निघते. ते जलनि:सारण केंद्रात (इफलुएन्ट ट्रिटमेंड प्लॅन्ट) प्रक्रिया करून पुढे जाते. हे प्रक्रिया केलेले पाणी राख वाहून नेण्याकरिता उपयोगात आणले जाते. विज केंद्रात वेगवेगळ्या क्षमतेचे चार जलनि:सारण केंद्र बसविण्यात आले आहे. त्यामुळे वीज केंद्रातील कोणत्याही प्र्रकारचे दूषित पाणी इरई नदीच्या पात्रामध्ये जाणार नाही, याची संपूर्ण दक्षता घेण्यात आली आहे. पर्यावरणाचे संतुलन व संवर्धन करण्याच्या दृष्टीने मुख्य अभियंता जयंत बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर औष्णिक केंद्रातील संबंधित सर्व विभाग उत्तमरित्या कार्य करीत आहेत. त्यामुळे प्रदुषणाचा प्रश्न मिटला. विजेचे उत्पादन करीत असताना पर्यावरणाकडेही विशेष लक्ष दिले जात आहे. त्यासाठी अधिकारी आणि कर्मचाºयांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. वर्षभर विविध उपक्रम सुरू असतात. केंद्रातर्फे विविध योजना राबविण्यात येत आहे. चंद्रपूर शहराचे पर्यावरण संतुलन व नियंत्रणासाठी योगदान दिल्याने हे मानांकन मिळाल्याचे मुख्य अभियंता जयंत बोबडे यांनी म्हटले आहे.