शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

महा औष्णिक केंद्राला ‘फोर स्टॉर रेटिंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 22:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : औद्योगिक विश्वात पर्यावरणासंबंधी उत्तम कामगिरी करणाऱ्या चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रास राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने ‘फोर स्टॉर रेटिंग’ देऊन गौरव केला आहे.चंद्रपूर महाऔष्णिक केंद्रात सद्या सात संच असून विद्युत निर्मिती क्षमता २९२० मेगावॅट आहे. संच क्र. ३ व ४ संच २१० मेगावॅट आणि ५ ते ९ हे ...

ठळक मुद्देप्रदूषणाला आळा : राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे सन्मानित

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : औद्योगिक विश्वात पर्यावरणासंबंधी उत्तम कामगिरी करणाऱ्या चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रास राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने ‘फोर स्टॉर रेटिंग’ देऊन गौरव केला आहे.चंद्रपूर महाऔष्णिक केंद्रात सद्या सात संच असून विद्युत निर्मिती क्षमता २९२० मेगावॅट आहे. संच क्र. ३ व ४ संच २१० मेगावॅट आणि ५ ते ९ हे संच ५०० मेगावॅट क्षमतेचे आहेत. संचाच्या धुरांड्यामधून धूर कमी निघावा, याकरिता संच क्र. ३ ते ९ मध्ये प्रत्येक संचाला ईएसपी हे संयंत्र बसविण्यात आले आहे. तसेच संच क्र. ३ ते ७ मध्ये इएसपी सोबतच अद्ययावत अमोनिया फ्लु गॅस कंडिशनिंग हे संयंत्र बसविण्यात आले आहे. त्यामुळे इएसपीमधून जास्त प्रमाणात राख बाहेर काढण्यात येते. संच क्र. ८ व ९ ची एसपीएम डिझाईनची क्षमता मोठी आहे. धुरांड्यातील निघणारी राख कमी प्रमाणात म्हणजेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नेमून दिलेल्या मर्यादेतच राहते.चंद्रपूर महाऔष्णिक केंद्रातील धुरांड्यातील राख बाहेर जाऊ नये व राखेचे प्रमाण कमी ठेवण्याकरिता प्रत्येक संचाच्या इएसपी व विविध प्रदूषण नियंत्रण प्रणालीचे काम संबंधित विभागातील अभियंते, रसायन शास्त्रज्ञ व तंत्रज्ञाकडे सकारात्मकपणे व नियमित केले जात आहे. परिणामी, प्रदुषणाला आळा बसला आहे.औष्णिक केंदातून वेगवेगळ्या प्रक्रियेतून जे पाणी निघते. ते जलनि:सारण केंद्रात (इफलुएन्ट ट्रिटमेंड प्लॅन्ट) प्रक्रिया करून पुढे जाते. हे प्रक्रिया केलेले पाणी राख वाहून नेण्याकरिता उपयोगात आणले जाते. विज केंद्रात वेगवेगळ्या क्षमतेचे चार जलनि:सारण केंद्र बसविण्यात आले आहे. त्यामुळे वीज केंद्रातील कोणत्याही प्र्रकारचे दूषित पाणी इरई नदीच्या पात्रामध्ये जाणार नाही, याची संपूर्ण दक्षता घेण्यात आली आहे. पर्यावरणाचे संतुलन व संवर्धन करण्याच्या दृष्टीने मुख्य अभियंता जयंत बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर औष्णिक केंद्रातील संबंधित सर्व विभाग उत्तमरित्या कार्य करीत आहेत. त्यामुळे प्रदुषणाचा प्रश्न मिटला. विजेचे उत्पादन करीत असताना पर्यावरणाकडेही विशेष लक्ष दिले जात आहे. त्यासाठी अधिकारी आणि कर्मचाºयांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. वर्षभर विविध उपक्रम सुरू असतात. केंद्रातर्फे विविध योजना राबविण्यात येत आहे. चंद्रपूर शहराचे पर्यावरण संतुलन व नियंत्रणासाठी योगदान दिल्याने हे मानांकन मिळाल्याचे मुख्य अभियंता जयंत बोबडे यांनी म्हटले आहे.