शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
2
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
3
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  
4
"हात लावशील तर ३५ तुकडे करेन"; मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने दिली थेट धमकी! म्हणाली...
5
अहमदाबाद विमान अपघात: ब्लॅक बॉक्सची माहिती कधीपर्यंत मिळेल? केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले...
6
हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल
7
ज्या कतारवर हल्ला केला, त्याच कतारच्या शेखने फोन केला...; अन् इराण सीझफायरसाठी तयारही झाला...
8
"अमेरिकेला गुडघे टेकायला लावले, इराण बनला मुस्लिम जगताचा नेता’’, महबूबा मुफ्ती यांनी केलं कौतुक  
9
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
10
युद्धबंदीच्या बातमीनंतर सेन्सेक्स-निफ्टी वधारले, पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
11
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
12
लग्नानंतर दरमहा १०,००० फिक्स! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त एकदाच करा गुंतवणूक!
13
"शूट करुन मग सर्जरी करायची...", अपघातानंतर अलका कुबल यांना निर्मात्यांकडून आला कटू अनुभव
14
"आधार कार्ड अपडेट करून येते"; बहाणा सांगून लग्नाच्या १०व्या दिवशी पत्नी झाली फरार! सोबत नवऱ्याचे पैसेही नेले
15
ENG vs IND : भारतीय क्रिकेटमध्ये दुखवटा! मैदानात दोन्ही संघांतील खेळाडूंनी दिग्गज फिरकीपटूला वाहिली श्रद्धांजली
16
Gold Silver Price 24 June: एका झटक्यात सोनं झालं ₹२ हजारांपेक्षाही स्वस्त; Iran-Israel युद्ध थांबलं तर चांदीचीही चमक झाली कमी
17
मुख्यमंत्री फडणवीसांच्या मतदारसंघात ५ महिन्यात ८ टक्के मतदार वाढ ही मतचोरीच- हर्षवर्धन सपकाळ
18
पत्नीच्या हत्येचा आरोपी NSG कमांडो, 'ऑपरेशन सिंदूर'च्या नावाखाली बचाव करत होता, सुप्रीम कोर्ट काय म्हणाले?
19
'गब्बर सिंगला डायलॉग शिकवले', यावरून ट्रोल होतायेत सचिन पिळगावकर; नक्की काय म्हणाले होते? पाहा Video
20
Jyeshtha Amavasya 2025: घरातले आजारपण, भांडणतंटा कमी होत नसेल तर ज्येष्ठ अमावास्येला करा 'हे' उपाय!

चार पोलीस सांभाळतात ४२ गावांचा डोलारा

By admin | Updated: December 3, 2014 22:47 IST

तळोधी(बाळा) येथे स्वतंत्र पोलीस ठाणे असावे अशी परिसरातील नागरिकांची मागणी असली तरी या मागणीकडे नेहमीच दुर्लक्ष करण्यात आले आहे. तब्बल ४२ गावाचा चार पोलिसांवर भार असल्याने

नागभीड : तळोधी(बाळा) येथे स्वतंत्र पोलीस ठाणे असावे अशी परिसरातील नागरिकांची मागणी असली तरी या मागणीकडे नेहमीच दुर्लक्ष करण्यात आले आहे. तब्बल ४२ गावाचा चार पोलिसांवर भार असल्याने नागरिकांची सुरक्षा वाऱ्यावर आहे. नव्या शासनाने या बाबीची दखल घ्यावी अशी मागणी होत आहे.नागभीड तालुक्यात नागभीडनंतर सर्वात मोठी ग्रामपंचायत तळोधी आहे. तळोधीची लोकसंख्या १२ हजाराच्या घरात आहे. याशिवाय वाढोणा, गोविंदपूर, गिरगाव, सावरगाव या मोठ्या गावासह ४२ गावे तळोधीशी सलग्न आहेत. या ४२ गावासाठी तळोधी येथे एक पोलीस चौकी स्थापन करण्यात आली असून एक सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि चार शिपायांची त्याठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. एवढे कमी मनुष्यबळ गेल्या अनेक वर्षापासून तळोधीसह ४२ गावांचा भार वाहत आहे. मनुष्यबळ कमी असल्याने तेथे नियुक्त कर्मचाऱ्यांना ४२ गावांचा डोलारा सांभाळतांना नाकीनऊ येत आहे. नेमक्या याच कमी मनुष्यबळाचा फायदा तळोधी येथील असामाजिक तत्व उचलत आहेत.गेल्या चार-पाच महिन्याचा विचार केला तर खुनासारखे दोन ते तीन गंभीर प्रकारही तळोधी परिसरात घडले आहेत. भुरट्या चोरट्यांनी तर नागरिकांना त्रस्त केले आहे. चार महिन्यापूर्वी एकाच रात्री भुरट्या चोरांनी १३ घरी हात साफ केल्याचीही माहिती आहे. पंधरा दिवसापूर्वी भर चौकात असलेल्या वेल्डींग वर्कशॉपमधून दोन लाख रुपये किंमतीचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. या घटनेने तळोधीत एवढा असंतोष निर्माण झाला की नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने समोर येवून पोलीस चौकीला घेराव घातला होता.मागील वर्षी जिल्ह्यात काही पोलीस चौकींचे ठाण्यामध्ये रुपांतर करण्यात आले. याचबरोबर तळोधीलाही पोलीस ठाण्याचा दर्जा दिला असता तर नागरिक दिलासा मिळाला असता. ४२ गावांची धुरा सांभाळताना पोलिसांची अक्षरश: दमछाक होत आहे.या घटनांसोबतच तळोधीत इतर अवैध धंदेही मुळ धरत आहेत. अवैध सट्टापट्टी आणि अवैध दारूची विक्रीही तळोधी आणि परिसरात सर्रास केल्या जात आहे. याबाबीचा विचार करून शासनाने तळोधी येथे नवीन पोलीस ठाण्यास तत्काळ मंजुरी द्यावी, अशी मागणी आहे. नव्या सरकारने या मागणीकडे लक्ष देवून पोलिसांवरील भार कमी करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे. (तालुका प्रतिनिधी)