शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

चार पोलीस सांभाळतात ४२ गावांचा डोलारा

By admin | Updated: December 3, 2014 22:47 IST

तळोधी(बाळा) येथे स्वतंत्र पोलीस ठाणे असावे अशी परिसरातील नागरिकांची मागणी असली तरी या मागणीकडे नेहमीच दुर्लक्ष करण्यात आले आहे. तब्बल ४२ गावाचा चार पोलिसांवर भार असल्याने

नागभीड : तळोधी(बाळा) येथे स्वतंत्र पोलीस ठाणे असावे अशी परिसरातील नागरिकांची मागणी असली तरी या मागणीकडे नेहमीच दुर्लक्ष करण्यात आले आहे. तब्बल ४२ गावाचा चार पोलिसांवर भार असल्याने नागरिकांची सुरक्षा वाऱ्यावर आहे. नव्या शासनाने या बाबीची दखल घ्यावी अशी मागणी होत आहे.नागभीड तालुक्यात नागभीडनंतर सर्वात मोठी ग्रामपंचायत तळोधी आहे. तळोधीची लोकसंख्या १२ हजाराच्या घरात आहे. याशिवाय वाढोणा, गोविंदपूर, गिरगाव, सावरगाव या मोठ्या गावासह ४२ गावे तळोधीशी सलग्न आहेत. या ४२ गावासाठी तळोधी येथे एक पोलीस चौकी स्थापन करण्यात आली असून एक सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि चार शिपायांची त्याठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. एवढे कमी मनुष्यबळ गेल्या अनेक वर्षापासून तळोधीसह ४२ गावांचा भार वाहत आहे. मनुष्यबळ कमी असल्याने तेथे नियुक्त कर्मचाऱ्यांना ४२ गावांचा डोलारा सांभाळतांना नाकीनऊ येत आहे. नेमक्या याच कमी मनुष्यबळाचा फायदा तळोधी येथील असामाजिक तत्व उचलत आहेत.गेल्या चार-पाच महिन्याचा विचार केला तर खुनासारखे दोन ते तीन गंभीर प्रकारही तळोधी परिसरात घडले आहेत. भुरट्या चोरट्यांनी तर नागरिकांना त्रस्त केले आहे. चार महिन्यापूर्वी एकाच रात्री भुरट्या चोरांनी १३ घरी हात साफ केल्याचीही माहिती आहे. पंधरा दिवसापूर्वी भर चौकात असलेल्या वेल्डींग वर्कशॉपमधून दोन लाख रुपये किंमतीचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. या घटनेने तळोधीत एवढा असंतोष निर्माण झाला की नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने समोर येवून पोलीस चौकीला घेराव घातला होता.मागील वर्षी जिल्ह्यात काही पोलीस चौकींचे ठाण्यामध्ये रुपांतर करण्यात आले. याचबरोबर तळोधीलाही पोलीस ठाण्याचा दर्जा दिला असता तर नागरिक दिलासा मिळाला असता. ४२ गावांची धुरा सांभाळताना पोलिसांची अक्षरश: दमछाक होत आहे.या घटनांसोबतच तळोधीत इतर अवैध धंदेही मुळ धरत आहेत. अवैध सट्टापट्टी आणि अवैध दारूची विक्रीही तळोधी आणि परिसरात सर्रास केल्या जात आहे. याबाबीचा विचार करून शासनाने तळोधी येथे नवीन पोलीस ठाण्यास तत्काळ मंजुरी द्यावी, अशी मागणी आहे. नव्या सरकारने या मागणीकडे लक्ष देवून पोलिसांवरील भार कमी करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे. (तालुका प्रतिनिधी)