शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

चार एकरात फुलविले नंदनवन

By admin | Updated: January 6, 2015 22:56 IST

नापिकी, दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती अशा एक ना अनेक संकटांचा सामना करताना शेतकरी कोलमडत चालला आहे. त्यातूनच आत्महत्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. मात्र अशाही प्रतिकुल परिस्थितीत

साईनाथ कुचनकार ल्ल चंद्रपूरनापिकी, दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती अशा एक ना अनेक संकटांचा सामना करताना शेतकरी कोलमडत चालला आहे. त्यातूनच आत्महत्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. मात्र अशाही प्रतिकुल परिस्थितीत केवळ चार एकराच्या शेतीच्या तुकड्यावर अंगमेहनत घेऊन सेंद्रीय पद्धतीने ती फुलविली. आर्थिक उत्पन्नात भर पाडली. शिवदास दाजीबा कोरे (सायघाटा, ब्रह्मपुरी) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ब्रह्मपुरीपासून काही अंतरावर असलेल्या सायगाटा येथील शिवदास कोरे यांचे शिक्षण जेमतेम दहावीपर्यंत झाले. सततची नापिकी, दुष्काळामुळे कंटाळून त्यांनी काही शेती विकून मिळालेल्या पैशातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न केला. आता त्यांच्याकडे अवघी चार एकर शेती शिल्लक आहे. जगण्याचा मोठा प्रश्न त्यांचासमोर उभा असताना कमी खर्चात शेती करण्यासाठी सेंद्रीय पद्धतीचा अवलंब करण्याचा निर्धार त्यांनी केला. अड्याळ टेकडी येथे तुकारामदादा गीताचार्य यांच्या संकल्पनेतून परिसरातील शेतकऱ्यांना सेंद्रीय शेतीबद्दल माहिती देण्यात आली होती. याच माहितीच्या आधारावर कोरे यांनी शेती सुरु केली. त्यांनी गांडूळ खत विकत आणले आणि शेतातच घर बांधले. यात त्यांनी धान, हळद, अद्रक, ऊस, भाजीपाला आदी पिकांची लागवड केली.त्यांनी अर्धा एकरात ऊस उत्पादन घेतले. त्यानंतर त्यांनी प्रथम शेतातच रसवंती सुरु केली. या रसवंतीमुळे परिससरातील नागरिक ऊसाचा रस पिण्याकरिता येऊ लागले. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर त्यांनी भाजीपाला लागवडीकडे लक्ष दिले. एकीकडे शेतकऱ्यांचे आत्महत्यासत्र सुरु आहे; तर कोरे यांच्यासारखे अनेक शेतकरी शेतातच नंदनवन निर्माण करीत आहे.