शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

चार एकरात फुलविले नंदनवन

By admin | Updated: January 6, 2015 22:56 IST

नापिकी, दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती अशा एक ना अनेक संकटांचा सामना करताना शेतकरी कोलमडत चालला आहे. त्यातूनच आत्महत्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. मात्र अशाही प्रतिकुल परिस्थितीत

साईनाथ कुचनकार ल्ल चंद्रपूरनापिकी, दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती अशा एक ना अनेक संकटांचा सामना करताना शेतकरी कोलमडत चालला आहे. त्यातूनच आत्महत्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. मात्र अशाही प्रतिकुल परिस्थितीत केवळ चार एकराच्या शेतीच्या तुकड्यावर अंगमेहनत घेऊन सेंद्रीय पद्धतीने ती फुलविली. आर्थिक उत्पन्नात भर पाडली. शिवदास दाजीबा कोरे (सायघाटा, ब्रह्मपुरी) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ब्रह्मपुरीपासून काही अंतरावर असलेल्या सायगाटा येथील शिवदास कोरे यांचे शिक्षण जेमतेम दहावीपर्यंत झाले. सततची नापिकी, दुष्काळामुळे कंटाळून त्यांनी काही शेती विकून मिळालेल्या पैशातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न केला. आता त्यांच्याकडे अवघी चार एकर शेती शिल्लक आहे. जगण्याचा मोठा प्रश्न त्यांचासमोर उभा असताना कमी खर्चात शेती करण्यासाठी सेंद्रीय पद्धतीचा अवलंब करण्याचा निर्धार त्यांनी केला. अड्याळ टेकडी येथे तुकारामदादा गीताचार्य यांच्या संकल्पनेतून परिसरातील शेतकऱ्यांना सेंद्रीय शेतीबद्दल माहिती देण्यात आली होती. याच माहितीच्या आधारावर कोरे यांनी शेती सुरु केली. त्यांनी गांडूळ खत विकत आणले आणि शेतातच घर बांधले. यात त्यांनी धान, हळद, अद्रक, ऊस, भाजीपाला आदी पिकांची लागवड केली.त्यांनी अर्धा एकरात ऊस उत्पादन घेतले. त्यानंतर त्यांनी प्रथम शेतातच रसवंती सुरु केली. या रसवंतीमुळे परिससरातील नागरिक ऊसाचा रस पिण्याकरिता येऊ लागले. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर त्यांनी भाजीपाला लागवडीकडे लक्ष दिले. एकीकडे शेतकऱ्यांचे आत्महत्यासत्र सुरु आहे; तर कोरे यांच्यासारखे अनेक शेतकरी शेतातच नंदनवन निर्माण करीत आहे.