शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
8
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
10
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
11
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
12
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
13
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
14
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
15
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
16
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
17
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
18
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
19
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
20
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा

दु:ख विसरून शेतकऱ्यांनी सुरू केली हंगामाची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:20 IST

चंद्रपूर : कोरोना संकटाची सर्वत्र दहशत आहे. यावेळी गावागावांत कोरोना रुग्ण आढळून आले. अनेकांनी आपल्या कुटुंबातील जवळच्यांना गमावले आहे. ...

चंद्रपूर : कोरोना संकटाची सर्वत्र दहशत आहे. यावेळी गावागावांत कोरोना रुग्ण आढळून आले. अनेकांनी आपल्या कुटुंबातील जवळच्यांना गमावले आहे. हे सर्व दु:ख विसरून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची नव्या दमाने तयारी सुरू केली आहे. शेतकऱ्यांनी पेरणीसाठी वापरण्यात येणाऱ्या बियाणांची उगवणक्षमता तपासून घ्यावी, विशेषत: घरातील बियाणांचाच अधिक वापर करावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

जवळ असलेल्या बियाणांची उगवणक्षमता तपासून घेणे गरजेचे आहे. घरात असलेल्या सोयाबीनच्या प्रत्येक पोत्यात खोलवर हात घालून मूठभर धान्य बाहेर काढावे, सर्व पोत्यातील काढलेले धान्य एकत्र करून घ्यावे, गोनपाटाचे सहा चौकोनी तुकडे करून स्वच्छ धुऊन घ्यावे, एक तुकडा जमिनीवर पसरावा. पोत्यामधून काढलेल्या धान्यातून सरसकट १०० दाणे दीड ते दोन सेंटीमीटर अंतरावर दहा-दहाच्या रांगेत गोणपाटाच्या एका तुकड्यावर ओळीत ठेवावे, अशाप्रकारे १०० दाण्यांचे तीन नमुने तयार करावेत. गोणपाटावर चांगले पाणी शिंपडून ओले करावे, बियाणांवर दुसरा गोणपाटाचा तुकडा अंथरून पुन्हा चांगले पाणी शिंपडावे. गोणपाटाच्या तुकड्यांची बियाणांसकट गोल गुंडाळी करून थंड ठिकाणी सावलीत ठेवावे, त्यावर अधूनमधून पाणी शिंपडून ओले ठेवावे. सहा ते सात दिवसांनंतर ही गुंडाळी जमिनीवर पसरवून उघडा, चांगले कोंब आलेले दाणे वेगळे करून मोजावेत. तिन्ही गुंडाळ्याची सरासरी काढून १०० दाण्यापेक्षा ७० किंवा त्यापेक्षा जास्त दाणे जर चांगले कोंब आलेले असतील तर आपले बियाणे बाजारातील बियाणांसारखेच गुणवत्तेचे आहे, असे समजावे, शिफारशीनुसार ते आपल्याला पेरणीसाठी वापरता येते, अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.