शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
5
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
6
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
7
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
8
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
9
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
10
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
11
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
12
ऑनलाइन गेमिंग विधेयकावरुन अनुपम मित्तल यांची सरकारवर टीका; म्हणाले 'या निर्णयामुळे थेट...'
13
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
14
श्रावण शनि अमावास्या: शनिदोष, प्रतिकूल प्रभाव कसा ओळखावा? ‘हे’ ५ उपाय तारतील, कृपा होईल!
15
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
16
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
17
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
18
युद्ध थांबण्याचे नाव नाही! रशियाचा युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; एकाच वेळी डागली ४० क्षेपणास्त्र
19
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
20
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!

तलाव खोलीकरणाचा विसर

By admin | Updated: April 27, 2015 00:54 IST

सध्या संपूर्ण देशातच पाणी टंचाईपासून मुक्ती मिळविण्यासाठी शासनदरबारी विचार केला जात आहे.

लोकमत विशेषरवी जवळे चंद्रपूरसध्या संपूर्ण देशातच पाणी टंचाईपासून मुक्ती मिळविण्यासाठी शासनदरबारी विचार केला जात आहे. जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून पाणी टंचाईवर मात करण्याचा प्रयत्न राज्यभरात जोरदार सुरू आहे. यासाठी कोट्यवधींचा खर्च केला जात आहे. तर दुसरीकडे अस्तित्वात असलेल्या जलस्रोतांकडे मात्र डोळेझाक केली जात आहे. तलाव आणि विहिरींना ग्रामीण भागातील मुख्य जलस्रोत म्हटले जाते. मात्र गतकाळात डोकावून बघितले तर या जलस्रोतांविषयी प्रशासन आणि पर्यायाने शासनाला काही देणेघणे असावे, असे वाटत नाही. तलावात वर्षानुवर्षांपासून साचलेला गाळ काढून तलावाचे खोलीकरण करण्याचा प्रशासनाला विसरच पडला आहे. गावागावांतील विहिरींचीही अशीच दैना आहे. त्यामुळे या जलस्रोतांची साठवण क्षमताच कमालीची कमी झाली आहे. परिणामी दरवर्षी पाणी टंचाईच्या भर पडत आहे.चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाळा कमालीचा तापतो, हे सर्वांना ठाऊक आहे. मे महिना आला की जिल्ह्यातील जलस्रोट आटतात. एवढेच नव्हे तर जिल्ह्यातील भलेमोठ्या सिंचन प्रकल्पातील जलसाठाही ड्राय होतो. असा अनुभव आजवर अनेकदा आला आहे. अशावेळी ग्रामीण भागातील पाण्याची पातळीदेखील कमालीची खालावते. विहिरी, तलावांमध्ये पाणीसाठा नसतो. त्यामुळे नागरिकांना उन्हाळ्यात सिंचन तर सोडाच; प्यायलाही पाणी मिळत नाही. वणवण भटकंती करावी लागते. जिवती, कोरपनासारख्या तालुक्यात तर पाण्याचे दुर्भिक्ष एवढे भयाण असते की चक्क डबक्यातील पाणी काढून नागरिकांना प्यावे लागते. जिल्ह्यात सुमारे मध्यम, लघू व मामा तलावांची संख्या सोळाशेहून अधिक आहे. हे तलाव साधरणत: गावाशेजारी असल्यामुळे ग्रामीण भागात या तलावांना मोठे महत्व असते. महत्त्वाचे जलस्रोत म्हणूनच या तलावांकडे बघितले जाते. या तलावांमुळे गावखेड्याची तहान भागते. शिवाय शेतकऱ्यांचे सिंचनही होते. या तलावांचा महत्वाचा फायदा असा की या तलावांमुळे गावातील पाण्याची पातळीही कायम असते. तलाव आटले की पाण्याच्या पातळीवरही परिणाम होतो. त्यामुळे बोअरवेल, विहिरी आपसुकच आटतात. जिल्ह्यातील तलावांची स्थिती सध्या दयनीय आहे. वरकरणी हे तलाव पाण्याने भरलेले दिसत असले तरी तलावांची पूर्वीची साठवण क्षमता आता राहिलेली नाही. या तलावात वर्षानुवर्षांपासून गाळ साचलेला आहे. दरवर्षी पावसाळ्यात या तलावात गाळ साचतो. मात्र तो काढला जात नाही. २०१२-१३ या वर्षात अतिवृष्टी झाली होती. तब्बल तीनवेळा पूर परिस्थिती निर्माण झाली. यावेळी अनेक तलाव फुटले, क्षतीग्रस्त झाले. पाटबंधारे विभागाकडून याचे सर्वेक्षणही झाले. मात्र या तलावांची दुरुस्ती अद्यापही झाली नसल्याची माहिती आहे. याशिवाय जिल्ह्यातील बोटावर मोजण्याइतक्या तलावातील गाळ उपसला जातो. त्यामुळे तलावांची दैनावस्था होत आहे.