शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

जबरान जोतधारकांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 22:23 IST

शेतमजूर व जबरान जोतधारकांना सामाजिक न्यायानुसार विविध योजनांचा लाभ मिळत नसल्याच्या निषेधार्थ शेकडो नागरिकांनी उपविभागीय कार्यालयावर सोमवारी मोर्चा काढला. हुतात्मा स्मारकापासून मोर्चाची सुरूवात झाली.

ठळक मुद्देब्रह्मपुरीत मागण्यांकडे वेधले लक्ष : शेकडो शेतमजूर, जबरोन जोतधारकांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : शेतमजूर व जबरान जोतधारकांना सामाजिक न्यायानुसार विविध योजनांचा लाभ मिळत नसल्याच्या निषेधार्थ शेकडो नागरिकांनी उपविभागीय कार्यालयावर सोमवारी मोर्चा काढला. हुतात्मा स्मारकापासून मोर्चाची सुरूवात झाली. संजय गांधी निराधार योजनेपासून वंचित असलेल्या नागरिकांनीही मोर्चात सहभागी होवून सरकारविरूध्द घोषणाबाजी केली.ब्रह्मपुरी तालुक्यासह जिल्ह्यामध्ये जबरान जोतधारकांची संख्या हजारोंचा घरात आहे. हक्काची जमीन नसल्याने कुटुंब कसे जगवावे हा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. भारतीय संविधानाने सामाजिक न्यायाची तरतूद केली. याला अनुसरून शासनाने अनेक कायदे केले. परंतु हे कायदे कागदावरच असल्याने शेकडो जबरान जोतधारकांना जमिनीपासून वंचित राहावे लागत आहे.राज्य व केंद्र शासनाने विविध नियम तयार करून जबरान जोतधारकांना जमीन उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. परंतु योजनेची अंमलबजावणी होत नाही, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. शेतमजूर व संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या नागरिकांपासून हक्कापासून डावलल्या जात आहे. असंघटीत क्षेत्रातील कामगारांमध्ये कायद्यानुसार लाभ मिळत नाही. यामुळे मोर्चेकऱ्यांनी सरकारविरूद्ध घोषणेबाजी केली. उपविभागीय अधिकाºयांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.मोर्चाचे नेतृत्व किसान सभेनी केले. यावेळी विनोद झोडगे, डॉ. महेश कोपूलवार, अरूण वनकर, देवराव चवळे, मिलिंद भन्नारे, नामदेव नखाते, दौलत खानखुरे, रामदास कामडी, धनराज खोब्रागडे आदीसह शेकडो नागरिक सहभागी झाले होते.२५ गावांना पाणी द्याब्रह्मपुरी तालुक्यातील मेंडकी व अड्याळ तलाठी साजात येणाऱ्या २५ गावांना गोसीखुर्द प्रकल्पाचे पाणी मिळत नाही. त्यामुळे शेती वाया जाते. निसर्गाच्या भरोशावर असणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. याकडेही नागभिड व ब्रह्मपुरी तालुक्यातील नागरिकांनी मोर्चाद्वारे लक्ष वेधले.