शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांनी घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
4
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
5
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
6
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
7
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
8
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
9
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
10
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
11
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
12
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
13
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
14
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
15
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
16
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
17
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
18
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
19
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
20
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?

जबरान जोतधारकांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 22:23 IST

शेतमजूर व जबरान जोतधारकांना सामाजिक न्यायानुसार विविध योजनांचा लाभ मिळत नसल्याच्या निषेधार्थ शेकडो नागरिकांनी उपविभागीय कार्यालयावर सोमवारी मोर्चा काढला. हुतात्मा स्मारकापासून मोर्चाची सुरूवात झाली.

ठळक मुद्देब्रह्मपुरीत मागण्यांकडे वेधले लक्ष : शेकडो शेतमजूर, जबरोन जोतधारकांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : शेतमजूर व जबरान जोतधारकांना सामाजिक न्यायानुसार विविध योजनांचा लाभ मिळत नसल्याच्या निषेधार्थ शेकडो नागरिकांनी उपविभागीय कार्यालयावर सोमवारी मोर्चा काढला. हुतात्मा स्मारकापासून मोर्चाची सुरूवात झाली. संजय गांधी निराधार योजनेपासून वंचित असलेल्या नागरिकांनीही मोर्चात सहभागी होवून सरकारविरूध्द घोषणाबाजी केली.ब्रह्मपुरी तालुक्यासह जिल्ह्यामध्ये जबरान जोतधारकांची संख्या हजारोंचा घरात आहे. हक्काची जमीन नसल्याने कुटुंब कसे जगवावे हा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. भारतीय संविधानाने सामाजिक न्यायाची तरतूद केली. याला अनुसरून शासनाने अनेक कायदे केले. परंतु हे कायदे कागदावरच असल्याने शेकडो जबरान जोतधारकांना जमिनीपासून वंचित राहावे लागत आहे.राज्य व केंद्र शासनाने विविध नियम तयार करून जबरान जोतधारकांना जमीन उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. परंतु योजनेची अंमलबजावणी होत नाही, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. शेतमजूर व संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या नागरिकांपासून हक्कापासून डावलल्या जात आहे. असंघटीत क्षेत्रातील कामगारांमध्ये कायद्यानुसार लाभ मिळत नाही. यामुळे मोर्चेकऱ्यांनी सरकारविरूद्ध घोषणेबाजी केली. उपविभागीय अधिकाºयांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.मोर्चाचे नेतृत्व किसान सभेनी केले. यावेळी विनोद झोडगे, डॉ. महेश कोपूलवार, अरूण वनकर, देवराव चवळे, मिलिंद भन्नारे, नामदेव नखाते, दौलत खानखुरे, रामदास कामडी, धनराज खोब्रागडे आदीसह शेकडो नागरिक सहभागी झाले होते.२५ गावांना पाणी द्याब्रह्मपुरी तालुक्यातील मेंडकी व अड्याळ तलाठी साजात येणाऱ्या २५ गावांना गोसीखुर्द प्रकल्पाचे पाणी मिळत नाही. त्यामुळे शेती वाया जाते. निसर्गाच्या भरोशावर असणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. याकडेही नागभिड व ब्रह्मपुरी तालुक्यातील नागरिकांनी मोर्चाद्वारे लक्ष वेधले.