शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
2
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
3
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
4
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
5
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
6
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
7
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
8
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
9
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
10
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
11
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
12
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
13
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
14
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
15
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
16
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
17
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
18
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
19
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 

रानात चराई बंदी, गुरांचे पोट भरण्यासाठी चंद्रपुरात मुरघास उपक्रम

By साईनाथ कुचनकार | Updated: April 28, 2023 14:56 IST

चाराटंचाईवर होणार मात

चंद्रपूर : जनावरांना आता रानात चराई बंदी आहे. त्यामुळे जनावरांना घरच्या घरी चारापाणी द्यावे लागते. त्यामुळे पौष्टिक चारा मिळणे कठीण झाले आहे. परिणामी दुग्ध उत्पादनावरही परिणाम होत आहे. विकतचा चारा घेऊन जनावरे पोसावी लागत असल्याने दिवसेंदिवस संख्या कमी होत आहे. त्यामुळे आता कृषी विभागाने जिल्ह्यात ज्वारी, बाजरी, मक्यापासून मुरघास चारा बनविण्याच्या उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमामुळे चाराटंचाईवर मात करता येणार आहे.

कृषी विभागाच्या मार्गदर्शनात अजयपूर येथील विठ्ठल परसूटकर यांनी आपल्या शेतावर बाजरी लावली. यातून दोन टन मुरघास विशेष प्रशिक्षकाकडून तयार करून घेतले. या उपक्रमाची पाहणी करण्याकरिता जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी अजयपूर येथे भेट देऊन प्रात्यक्षिक बघितले. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, आत्माच्या प्रकल्प संचालक प्रीती हिरवळकर उपस्थित होते.

मुरघास चारा दुधाळू जनावरांसाठी वरदान आहे. विशेषत: मक्यापासून बनविलेला मुरघास जनावरे मोठ्या चवीने खातात. त्यामुळे दुधाच्या उत्पादनात निश्चित वाढ होते. मुरघास सहा रुपये किलो दराने विकल्यास शेतकऱ्यांना आर्थिक लाभ होऊ शकतो. मुरघास दिल्यामुळे दूध उत्पादन वाढण्यास मदत होईलच, तसेच शेतकऱ्यांना पूरक व्यवसाय उपलब्ध होईल, त्यामुळे शेतमालाच्या उत्पादनासोबतच जनावरांना पौष्टिक चारा उपलब्ध होण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा. यासाठी कृषी विभागाने योग्य मार्गदर्शन करावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. यावेळी तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत ठाकरे, मंडळ कृषी अधिकारी भास्कर गायकवाड, कृषी पर्यवेक्षक बुगेवार व गावातील दूध उत्पादन करणारे शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :agricultureशेतीchandrapur-acचंद्रपूर