शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

रानात चराई बंदी, गुरांचे पोट भरण्यासाठी चंद्रपुरात मुरघास उपक्रम

By साईनाथ कुचनकार | Updated: April 28, 2023 14:56 IST

चाराटंचाईवर होणार मात

चंद्रपूर : जनावरांना आता रानात चराई बंदी आहे. त्यामुळे जनावरांना घरच्या घरी चारापाणी द्यावे लागते. त्यामुळे पौष्टिक चारा मिळणे कठीण झाले आहे. परिणामी दुग्ध उत्पादनावरही परिणाम होत आहे. विकतचा चारा घेऊन जनावरे पोसावी लागत असल्याने दिवसेंदिवस संख्या कमी होत आहे. त्यामुळे आता कृषी विभागाने जिल्ह्यात ज्वारी, बाजरी, मक्यापासून मुरघास चारा बनविण्याच्या उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमामुळे चाराटंचाईवर मात करता येणार आहे.

कृषी विभागाच्या मार्गदर्शनात अजयपूर येथील विठ्ठल परसूटकर यांनी आपल्या शेतावर बाजरी लावली. यातून दोन टन मुरघास विशेष प्रशिक्षकाकडून तयार करून घेतले. या उपक्रमाची पाहणी करण्याकरिता जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी अजयपूर येथे भेट देऊन प्रात्यक्षिक बघितले. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, आत्माच्या प्रकल्प संचालक प्रीती हिरवळकर उपस्थित होते.

मुरघास चारा दुधाळू जनावरांसाठी वरदान आहे. विशेषत: मक्यापासून बनविलेला मुरघास जनावरे मोठ्या चवीने खातात. त्यामुळे दुधाच्या उत्पादनात निश्चित वाढ होते. मुरघास सहा रुपये किलो दराने विकल्यास शेतकऱ्यांना आर्थिक लाभ होऊ शकतो. मुरघास दिल्यामुळे दूध उत्पादन वाढण्यास मदत होईलच, तसेच शेतकऱ्यांना पूरक व्यवसाय उपलब्ध होईल, त्यामुळे शेतमालाच्या उत्पादनासोबतच जनावरांना पौष्टिक चारा उपलब्ध होण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा. यासाठी कृषी विभागाने योग्य मार्गदर्शन करावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. यावेळी तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत ठाकरे, मंडळ कृषी अधिकारी भास्कर गायकवाड, कृषी पर्यवेक्षक बुगेवार व गावातील दूध उत्पादन करणारे शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :agricultureशेतीchandrapur-acचंद्रपूर