शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
3
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
6
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
7
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
8
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
9
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
10
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
11
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
12
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
13
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
15
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
16
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
17
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
18
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
19
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
20
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!

गावकऱ्यांना वनविभागाचा आधार

By admin | Updated: August 22, 2015 01:36 IST

जंगलाशेजारी असणाऱ्या गावकऱ्यांना वन्यप्राण्यांचा सतत धोका निर्माण होत असतो. कधी गावात हिंस्र प्राणी प्रवेश करुन गावकऱ्यांवर हल्ला करतात.

कोठारी : जंगलाशेजारी असणाऱ्या गावकऱ्यांना वन्यप्राण्यांचा सतत धोका निर्माण होत असतो. कधी गावात हिंस्र प्राणी प्रवेश करुन गावकऱ्यांवर हल्ला करतात. तर सरपणासाठी जंगलात जाणाऱ्या महिलांवर प्राणी हल्ला करुन जीव घेत असतात. अशात मानव-वन्य प्राणी संघर्ष पेटत असतो. यावेळेस मानवास मदतीची गरज असते तर वन्यप्राण्यांना संंरक्षणाची गरज असते. त्याकरिता कोठारी येथे वनकार्यालयात वनविभागाने अति शीघ्र दलाची (आरआरयु) निर्मिती केली आहे. कार्यालयाच्या इमारतीचे बांधकाम करुन त्याचे उद्घाटनही वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी वनमंत्र्यांनी आता गावकऱ्यांना वनविभागाच्या अति शीघ्र दलाचा मदतीसाठी आधार असेल. शेतकऱ्यांनी व गावकऱ्यांनी निसंकोच वनविभागाकडे मदतीसाठी आले पाहिजे. राज्यात वने मंत्र्यालयाकडून जंगल शेजारी असणाऱ्या गावकऱ्यांसाठी विविध उपक्रम हाती घेण्यात येत आहेत. हिंस्त्र प्राण्यांच्या हल्ल्यात ठार झालेल्यांना भरीव मदत होत आहे. इतर राज्यापेक्षा महाराष्ट्रात भरघोष मदतीचा निर्णय झाला. शेतकऱ्यांच्या शेतात वन्यप्राणी शेतीचे नुकसान करीत असतील तर त्यातही वनविभागातर्फे मदतीची तरतूद केली आहे. रानडुकरांचा हैदोस कमी करण्यासाठी त्यांना ठार मारुन त्याची विल्हेवाट लावण्याची परवानगी देण्यात येत आहे. जंगलात सरपणासाठी महिला जाऊ नये, यासाठी वनविभाग गॅस कनेक्शनचे वाटप करीत आहे. वन मंत्रालयाने विविध लोकोपयोगी निर्णय घेतल्याची माहितीही मुनगंटीवार यांनी दिली.अशी शीघ्र दलाची निर्मिती करुन त्याचे कार्यालय व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. शीघ्र दलात अत्याधुनिक साधनांचा पुरवठा करण्यात आला असून महत्त्वपूर्ण साहित्यासह कार्यालय सुसज्ज आहे. जंगलाशेजारी विपरीत परिस्थिती निर्माण होताच अती शीघ्र दल त्याठिकाणी कार्यान्वित होऊन अनुचित प्रकार घडणार नाही, याची दक्षता घेत गावकऱ्यांना मदत करणार आहेत.कोठारीत वन कार्यालयाची इंग्रजकालीन इमारत होती. ती पूर्णत: जीर्ण झाली. त्यामुळे कोठारी वन कार्यालय सध्या मंजूर निवासात आहे. त्यातून वनाचा कारभार सुरू आहे. मात्र यामुळे कर्मचाऱ्यांना व गावकऱ्यांना त्रास सहन करावा लागतो आहे. वनाधिकाऱ्यांना कार्यालयात बसण्यास जागा नसल्याने सरकारी निवासातून देखरेख करतात. ही अडचण पाहून उपवनसंरक्षक गजेंद्र हिरे यांनी नवीन इमारतीचा प्रस्ताव वनमंत्र्यालयाकडे पाठवून त्यास मंजूर करवून घेतले. नवीन वनकार्यालयाचे भूमिपूजन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पार पडले. गावातील ज्येष्ठ नागरिक व वनसेवेतून निवृत्त झालेले वनाधिकारी ठाकरे व वनपाल कावळे यांच्या हस्ते वन कार्यालयाच्या नवीन इमारतीची पायाभरणीही करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य वनसंरक्षक संजय ठाकरे यांनी केले तर संचालन शिक्षिका उपलंचीवार यांनी केले तर आभार क्षेत्रसहायक भोवरे यांनी मानले. यशस्वीतेसाठी वनाधिकारी हाके, क्षेत्रसहायक भोवरे आदींनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)