शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

गावकऱ्यांना वनविभागाचा आधार

By admin | Updated: August 22, 2015 01:36 IST

जंगलाशेजारी असणाऱ्या गावकऱ्यांना वन्यप्राण्यांचा सतत धोका निर्माण होत असतो. कधी गावात हिंस्र प्राणी प्रवेश करुन गावकऱ्यांवर हल्ला करतात.

कोठारी : जंगलाशेजारी असणाऱ्या गावकऱ्यांना वन्यप्राण्यांचा सतत धोका निर्माण होत असतो. कधी गावात हिंस्र प्राणी प्रवेश करुन गावकऱ्यांवर हल्ला करतात. तर सरपणासाठी जंगलात जाणाऱ्या महिलांवर प्राणी हल्ला करुन जीव घेत असतात. अशात मानव-वन्य प्राणी संघर्ष पेटत असतो. यावेळेस मानवास मदतीची गरज असते तर वन्यप्राण्यांना संंरक्षणाची गरज असते. त्याकरिता कोठारी येथे वनकार्यालयात वनविभागाने अति शीघ्र दलाची (आरआरयु) निर्मिती केली आहे. कार्यालयाच्या इमारतीचे बांधकाम करुन त्याचे उद्घाटनही वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी वनमंत्र्यांनी आता गावकऱ्यांना वनविभागाच्या अति शीघ्र दलाचा मदतीसाठी आधार असेल. शेतकऱ्यांनी व गावकऱ्यांनी निसंकोच वनविभागाकडे मदतीसाठी आले पाहिजे. राज्यात वने मंत्र्यालयाकडून जंगल शेजारी असणाऱ्या गावकऱ्यांसाठी विविध उपक्रम हाती घेण्यात येत आहेत. हिंस्त्र प्राण्यांच्या हल्ल्यात ठार झालेल्यांना भरीव मदत होत आहे. इतर राज्यापेक्षा महाराष्ट्रात भरघोष मदतीचा निर्णय झाला. शेतकऱ्यांच्या शेतात वन्यप्राणी शेतीचे नुकसान करीत असतील तर त्यातही वनविभागातर्फे मदतीची तरतूद केली आहे. रानडुकरांचा हैदोस कमी करण्यासाठी त्यांना ठार मारुन त्याची विल्हेवाट लावण्याची परवानगी देण्यात येत आहे. जंगलात सरपणासाठी महिला जाऊ नये, यासाठी वनविभाग गॅस कनेक्शनचे वाटप करीत आहे. वन मंत्रालयाने विविध लोकोपयोगी निर्णय घेतल्याची माहितीही मुनगंटीवार यांनी दिली.अशी शीघ्र दलाची निर्मिती करुन त्याचे कार्यालय व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. शीघ्र दलात अत्याधुनिक साधनांचा पुरवठा करण्यात आला असून महत्त्वपूर्ण साहित्यासह कार्यालय सुसज्ज आहे. जंगलाशेजारी विपरीत परिस्थिती निर्माण होताच अती शीघ्र दल त्याठिकाणी कार्यान्वित होऊन अनुचित प्रकार घडणार नाही, याची दक्षता घेत गावकऱ्यांना मदत करणार आहेत.कोठारीत वन कार्यालयाची इंग्रजकालीन इमारत होती. ती पूर्णत: जीर्ण झाली. त्यामुळे कोठारी वन कार्यालय सध्या मंजूर निवासात आहे. त्यातून वनाचा कारभार सुरू आहे. मात्र यामुळे कर्मचाऱ्यांना व गावकऱ्यांना त्रास सहन करावा लागतो आहे. वनाधिकाऱ्यांना कार्यालयात बसण्यास जागा नसल्याने सरकारी निवासातून देखरेख करतात. ही अडचण पाहून उपवनसंरक्षक गजेंद्र हिरे यांनी नवीन इमारतीचा प्रस्ताव वनमंत्र्यालयाकडे पाठवून त्यास मंजूर करवून घेतले. नवीन वनकार्यालयाचे भूमिपूजन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पार पडले. गावातील ज्येष्ठ नागरिक व वनसेवेतून निवृत्त झालेले वनाधिकारी ठाकरे व वनपाल कावळे यांच्या हस्ते वन कार्यालयाच्या नवीन इमारतीची पायाभरणीही करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य वनसंरक्षक संजय ठाकरे यांनी केले तर संचालन शिक्षिका उपलंचीवार यांनी केले तर आभार क्षेत्रसहायक भोवरे यांनी मानले. यशस्वीतेसाठी वनाधिकारी हाके, क्षेत्रसहायक भोवरे आदींनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)