शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गावकऱ्यांना वनविभागाचा आधार

By admin | Updated: August 22, 2015 01:36 IST

जंगलाशेजारी असणाऱ्या गावकऱ्यांना वन्यप्राण्यांचा सतत धोका निर्माण होत असतो. कधी गावात हिंस्र प्राणी प्रवेश करुन गावकऱ्यांवर हल्ला करतात.

कोठारी : जंगलाशेजारी असणाऱ्या गावकऱ्यांना वन्यप्राण्यांचा सतत धोका निर्माण होत असतो. कधी गावात हिंस्र प्राणी प्रवेश करुन गावकऱ्यांवर हल्ला करतात. तर सरपणासाठी जंगलात जाणाऱ्या महिलांवर प्राणी हल्ला करुन जीव घेत असतात. अशात मानव-वन्य प्राणी संघर्ष पेटत असतो. यावेळेस मानवास मदतीची गरज असते तर वन्यप्राण्यांना संंरक्षणाची गरज असते. त्याकरिता कोठारी येथे वनकार्यालयात वनविभागाने अति शीघ्र दलाची (आरआरयु) निर्मिती केली आहे. कार्यालयाच्या इमारतीचे बांधकाम करुन त्याचे उद्घाटनही वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी वनमंत्र्यांनी आता गावकऱ्यांना वनविभागाच्या अति शीघ्र दलाचा मदतीसाठी आधार असेल. शेतकऱ्यांनी व गावकऱ्यांनी निसंकोच वनविभागाकडे मदतीसाठी आले पाहिजे. राज्यात वने मंत्र्यालयाकडून जंगल शेजारी असणाऱ्या गावकऱ्यांसाठी विविध उपक्रम हाती घेण्यात येत आहेत. हिंस्त्र प्राण्यांच्या हल्ल्यात ठार झालेल्यांना भरीव मदत होत आहे. इतर राज्यापेक्षा महाराष्ट्रात भरघोष मदतीचा निर्णय झाला. शेतकऱ्यांच्या शेतात वन्यप्राणी शेतीचे नुकसान करीत असतील तर त्यातही वनविभागातर्फे मदतीची तरतूद केली आहे. रानडुकरांचा हैदोस कमी करण्यासाठी त्यांना ठार मारुन त्याची विल्हेवाट लावण्याची परवानगी देण्यात येत आहे. जंगलात सरपणासाठी महिला जाऊ नये, यासाठी वनविभाग गॅस कनेक्शनचे वाटप करीत आहे. वन मंत्रालयाने विविध लोकोपयोगी निर्णय घेतल्याची माहितीही मुनगंटीवार यांनी दिली.अशी शीघ्र दलाची निर्मिती करुन त्याचे कार्यालय व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. शीघ्र दलात अत्याधुनिक साधनांचा पुरवठा करण्यात आला असून महत्त्वपूर्ण साहित्यासह कार्यालय सुसज्ज आहे. जंगलाशेजारी विपरीत परिस्थिती निर्माण होताच अती शीघ्र दल त्याठिकाणी कार्यान्वित होऊन अनुचित प्रकार घडणार नाही, याची दक्षता घेत गावकऱ्यांना मदत करणार आहेत.कोठारीत वन कार्यालयाची इंग्रजकालीन इमारत होती. ती पूर्णत: जीर्ण झाली. त्यामुळे कोठारी वन कार्यालय सध्या मंजूर निवासात आहे. त्यातून वनाचा कारभार सुरू आहे. मात्र यामुळे कर्मचाऱ्यांना व गावकऱ्यांना त्रास सहन करावा लागतो आहे. वनाधिकाऱ्यांना कार्यालयात बसण्यास जागा नसल्याने सरकारी निवासातून देखरेख करतात. ही अडचण पाहून उपवनसंरक्षक गजेंद्र हिरे यांनी नवीन इमारतीचा प्रस्ताव वनमंत्र्यालयाकडे पाठवून त्यास मंजूर करवून घेतले. नवीन वनकार्यालयाचे भूमिपूजन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पार पडले. गावातील ज्येष्ठ नागरिक व वनसेवेतून निवृत्त झालेले वनाधिकारी ठाकरे व वनपाल कावळे यांच्या हस्ते वन कार्यालयाच्या नवीन इमारतीची पायाभरणीही करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य वनसंरक्षक संजय ठाकरे यांनी केले तर संचालन शिक्षिका उपलंचीवार यांनी केले तर आभार क्षेत्रसहायक भोवरे यांनी मानले. यशस्वीतेसाठी वनाधिकारी हाके, क्षेत्रसहायक भोवरे आदींनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)