शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
2
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
3
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
4
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
5
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
6
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
7
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
8
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
9
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
10
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
11
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
12
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
13
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
14
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
15
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
16
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
17
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
18
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
19
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
20
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?

पाचगावच्या बांबूसंदर्भात वन विभागच संभ्रमात

By admin | Updated: May 8, 2014 01:53 IST

हल्ली वनविभागात काय चाललेयं हे कुणालाच कळायला मार्ग नाही. खुद्द वनविभागातील अधिकार्‍यांनाही काय करावे आणि काय नको हे कळनासे झाल्यासारखे वागताना दिसत आहे.

चंद्रपूर : हल्ली वनविभागात काय चाललेयं हे कुणालाच कळायला मार्ग नाही. खुद्द वनविभागातील अधिकार्‍यांनाही काय करावे आणि काय नको हे कळनासे झाल्यासारखे वागताना दिसत आहे. गोंडपिपरी तालुक्यातील पाचगाव ग्रामसभेतील घटनेमुळे सध्या ही स्थिती निर्माण झाली आहे. मात्र वनविभागाची स्थिती मात्र जंगलराजसारखी झाली आहे.चंद्रपूरच्या मध्य चांदा वनविभागाअंतर्गत येणार्‍या पाचगावला अनुसूचित जाती जमाती व अन्य पारंपारिक वन निवासी अधिनियम-२00६ नुसार सामूहिक वनअधिकाराचा दावा मंजूर झाला होता. या अधिनियमानुसार, या गावच्या ग्रामसभेला बांबू कटाई आणि गौण उपज संकलनाचे अधिकार मिळाले होते. त्या आधारावर ग्रामसभेने यंदा बांबू कटाईसुद्धा केली होती. मात्र, बांबू कटाईमध्ये नियमांचे पालन न केल्याचा आरोप लावून वनविभागाने प्रारंभी अज्ञात लोकांविरूध्द प्राथमिक गुन्हा नोंदविला होता. त्यानंतर यात पाचगाव ग्रामसभेला गुंतवून गावकर्‍यांना दोषी ठरविण्याचा प्रयत्न झाला. दरम्यान, आज बुधवारी वनविभागाचे कर्मचारी आणि पोलिसांनी या गावात जाऊन कापलेला बांबू जप्त केला. त्यांनतर उपवनसंरक्षकांचे आदेश आल्याचे सांगत ही जप्ती थांबविली. वनविभागाच्या या वागण्यामुळे गावकरी आश्‍चर्य व्यक्त करीत आहेत. बांबू कटाईचा अधिकार देऊनही गावाला दोषी कसे काय ठरविता, असा गावकर्‍यांचा प्रश्न आहे.वनविभागाचे अधिकारी ही कारवाई आपल्या मर्जीनेच करीत असल्याचा पाचगाववासियांचा आरोप आहे. बांबू कटाईचा अधिकार सरकारनेच दिला असल्याने त्यात काही चुका झाल्या असल्यास त्या दुरुस्त करण्यासाठी सांगता आले असते. मात्र त्याऐवजी चक्क बांबूच्या जप्तीची आणि कारवाई करण्याची प्रक्रिया केल्याने गावकर्‍यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. ग्रामसभेला स्वतंत्र दर्जा असल्याने या अधिकार्‍यांवर कारवाई का केली जाऊ नये, असा पवित्रा घेण्याच्या विचारात ही ग्रामसभा आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

ही कारवाई तेथील गावकर्‍यांच्या मनमानीमुळे करण्यात आली आहे. त्यांना मिळालेला सामूहिक वन अधिकार नियमानुसार काम करण्यासाठी होता. मात्र, त्यांनी बांबू कटाई अवैधपणे केली. त्यामुळेच गुन्हा नोंदविण्यात आला होता. बांबू कटाईच्या गुन्ह्याची कबुलीही गावकर्‍यांनी दिली आहे. त्यामुळेच पथक बांबूच्या जप्तीसाठी गेले होते. मात्र विभागीय वनअधिकार्‍यांचा आदेश आल्याने जप्तीचा बांबू परत करण्यात आला.-डी.एम. उकेकोठारी वन परिक्षेत्राधिकारी