शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
2
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
3
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
4
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
5
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
6
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
7
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
8
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
9
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
10
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
11
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
12
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
13
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
14
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
15
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
16
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
18
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
19
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
20
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे

पाचगावच्या बांबूसंदर्भात वन विभागच संभ्रमात

By admin | Updated: May 8, 2014 01:53 IST

हल्ली वनविभागात काय चाललेयं हे कुणालाच कळायला मार्ग नाही. खुद्द वनविभागातील अधिकार्‍यांनाही काय करावे आणि काय नको हे कळनासे झाल्यासारखे वागताना दिसत आहे.

चंद्रपूर : हल्ली वनविभागात काय चाललेयं हे कुणालाच कळायला मार्ग नाही. खुद्द वनविभागातील अधिकार्‍यांनाही काय करावे आणि काय नको हे कळनासे झाल्यासारखे वागताना दिसत आहे. गोंडपिपरी तालुक्यातील पाचगाव ग्रामसभेतील घटनेमुळे सध्या ही स्थिती निर्माण झाली आहे. मात्र वनविभागाची स्थिती मात्र जंगलराजसारखी झाली आहे.चंद्रपूरच्या मध्य चांदा वनविभागाअंतर्गत येणार्‍या पाचगावला अनुसूचित जाती जमाती व अन्य पारंपारिक वन निवासी अधिनियम-२00६ नुसार सामूहिक वनअधिकाराचा दावा मंजूर झाला होता. या अधिनियमानुसार, या गावच्या ग्रामसभेला बांबू कटाई आणि गौण उपज संकलनाचे अधिकार मिळाले होते. त्या आधारावर ग्रामसभेने यंदा बांबू कटाईसुद्धा केली होती. मात्र, बांबू कटाईमध्ये नियमांचे पालन न केल्याचा आरोप लावून वनविभागाने प्रारंभी अज्ञात लोकांविरूध्द प्राथमिक गुन्हा नोंदविला होता. त्यानंतर यात पाचगाव ग्रामसभेला गुंतवून गावकर्‍यांना दोषी ठरविण्याचा प्रयत्न झाला. दरम्यान, आज बुधवारी वनविभागाचे कर्मचारी आणि पोलिसांनी या गावात जाऊन कापलेला बांबू जप्त केला. त्यांनतर उपवनसंरक्षकांचे आदेश आल्याचे सांगत ही जप्ती थांबविली. वनविभागाच्या या वागण्यामुळे गावकरी आश्‍चर्य व्यक्त करीत आहेत. बांबू कटाईचा अधिकार देऊनही गावाला दोषी कसे काय ठरविता, असा गावकर्‍यांचा प्रश्न आहे.वनविभागाचे अधिकारी ही कारवाई आपल्या मर्जीनेच करीत असल्याचा पाचगाववासियांचा आरोप आहे. बांबू कटाईचा अधिकार सरकारनेच दिला असल्याने त्यात काही चुका झाल्या असल्यास त्या दुरुस्त करण्यासाठी सांगता आले असते. मात्र त्याऐवजी चक्क बांबूच्या जप्तीची आणि कारवाई करण्याची प्रक्रिया केल्याने गावकर्‍यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. ग्रामसभेला स्वतंत्र दर्जा असल्याने या अधिकार्‍यांवर कारवाई का केली जाऊ नये, असा पवित्रा घेण्याच्या विचारात ही ग्रामसभा आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

ही कारवाई तेथील गावकर्‍यांच्या मनमानीमुळे करण्यात आली आहे. त्यांना मिळालेला सामूहिक वन अधिकार नियमानुसार काम करण्यासाठी होता. मात्र, त्यांनी बांबू कटाई अवैधपणे केली. त्यामुळेच गुन्हा नोंदविण्यात आला होता. बांबू कटाईच्या गुन्ह्याची कबुलीही गावकर्‍यांनी दिली आहे. त्यामुळेच पथक बांबूच्या जप्तीसाठी गेले होते. मात्र विभागीय वनअधिकार्‍यांचा आदेश आल्याने जप्तीचा बांबू परत करण्यात आला.-डी.एम. उकेकोठारी वन परिक्षेत्राधिकारी