शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

परक्या मिरचीनेच दिला ‘त्यांना’ आधार

By admin | Updated: February 9, 2016 00:47 IST

मिरची भलेही नागभीड तालुक्यातील पीक नसेल पण याच मिरचीने या तालुक्यातील शेकडो हातांना रोजगार उपलब्ध करुन दिला आहे.

हाताला मिळाले काम : मिरचीचा ठसकाही झाला आता गोड घनश्याम नवघडे नागभीडमिरची भलेही नागभीड तालुक्यातील पीक नसेल पण याच मिरचीने या तालुक्यातील शेकडो हातांना रोजगार उपलब्ध करुन दिला आहे. नागभीड तालुक्यातील बाम्हणी, कानपा आणि मोहाळी येथे भेट दिली तर याची प्रचिती येते.नागभीड तालुक्याचे मुख्य आणि एकमेव पीक धान आहे. या एका पिकावर तालुक्याची अर्थव्यवस्थाही अवलंबून आहे. पण दरवर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे या तालुक्यातील धान शेती भकास होत चालली आहे. खर्च जास्त आणि उत्पन्न कमी या धोरणाने शेतकरीही हतबल झाले आहेत. उद्योगाच्या बाबतीतही नागभीड तालुका कोसो दूर मागे आहे. उद्योगाविरहीत तालुका अशीच नागभीडची ओळख आहे. त्यामुळे येथील तरुणांना आणि लोकांना बेकारीचेच जीवन जगावे लागत आहे. अशा परिस्थितीत नागभीड तालुक्यातील बाम्हणी, मोहाळी आणि कानपा येथे सुरु करण्यात आलेले मिरचीचे सातरे त्या परिसरातील मजुरांना दिलासा देणारे ठरले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी मिरचीचे सातरे सुरु असून शेकडो मजूर त्या ठिकाणी कामाला जावून रोजगार प्राप्त करुन घेत आहेत. अशा परिस्थितीत नागभीड तालुक्यातील बाम्हणी, मोहाळी आणि कानपा येथे सुरु करण्यात आलेले मिरचीचे सातरे त्या परिसरातील मजुरांना दिलासा देणारे ठरले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी मिरचीचे सातरे सुरु असून शेकडो मजुर त्या ठिकाणी कामाला जावून रोजगार प्राप्त करुन घेत आहेत. येथील सातरे पाहून अनेकांना समज होत आहे की, ही मिरची एक तर भिवापूर येथून किंवा नागपूर जिल्ह्यातून येत असावी. पण हा समाज पूर्णत: चुकीचा आहे. या सातऱ्यावर येणारी मिरची आंध्रप्रदेशातून मिरची ट्रकाद्वारे आणल्या जाते. तिथे मिरचीच्या मुक्या काढल्या जातात. त्यासाठी एका बोऱ्यावर मजुरांना ५०० रुपये मोबदला दिला जातो. एक जोडी दीड दिवसात एक बोरा मिरचीच्या मुक्या काढण्याचे काम करते. आता हे सातरे गावातच सुरु झाल्याने या मजुरांनी मुलांनाही या कामावर लावून घेतले आहे. त्यामुळे या मजुरांना दरडोई १५० ते २०० एका दिवसाचा मोबदला मिळतो. मिरची स्वच्छ झाली की देशविदेशात निर्यात होते. शासनाने मग्रारोहयोच्या माध्यमातून प्रत्येकाच्या हाताला काम देण्याचे कबुल केले असले तरी शासनाचे हे आश्वासन अभावानेच नागभीड तालुक्यात दिसून येतो. त्यामानाने या सातऱ्याच्या रुपाने मिळालेला रोजगार परिसरातील मजुरांना दिलासा देणारा आहे.आम्ही यापूर्वी दुसऱ्या गावातील सातऱ्यावर जाऊन काम करीत होतो. यात आमचा बराच वेळ जात होता. या वेळीची बचत व्हावी म्हणून कंत्राटदाराने आम्हाला आमच्या गावीच सातरा उपलब्ध करुन दिला, असे एका महिला मजुराने सांगितले.