शहरं
Join us  
Trending Stories
1
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
2
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
3
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
5
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
6
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
7
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
8
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
9
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
10
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
11
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
12
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
13
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
14
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
15
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
16
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
17
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
18
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
19
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
20
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत

लोककलावंत विकताहेत भाजीपाला, चहा सरकारी मदत केवळ नावालाच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:33 IST

सरकारने पहिले लॉकडाऊन केल्यापासूनच लोककलावंतांच्या रोजगाराचे मार्ग बंद झाले. चंद्रपूर जिल्ह्याला समृद्ध झाडीपट्टी रंगभूमीचा इतिहास लाभला आहे. लोकांचे मनोरंज ...

सरकारने पहिले लॉकडाऊन केल्यापासूनच लोककलावंतांच्या रोजगाराचे मार्ग बंद झाले. चंद्रपूर जिल्ह्याला समृद्ध झाडीपट्टी रंगभूमीचा इतिहास लाभला आहे. लोकांचे मनोरंज प्रबोधन करणाऱ्या या कलावंतांना संकटाच्या काळात कुणी विचारत नसल्याचे सध्याचे चित्र आहे. राज्याच्या सांस्कृतिक विभागाकडून जिल्हानिहाय कलावंतांकडून प्रस्ताव मागविले जातात. यंदा जिल्ह्यातून ५०० ते ६०० प्रस्ताव आले. त्यापैकी १०० प्रस्ताव अटी व शर्तींमध्ये बसल्याने त्यांची यादी तयार करण्यात आली. श्रेणीनुसार अशा कलावंतांना मानधन दिले जाते. कीर्तन, दंडार व नाटकात काम करणारे कलाकार, नृत्य करणारे कलाकार, वादक तांत्रिक विभागात काम करणाऱ्या कलावंतांच्या हाताला दोन वर्षांपासून काम नाही. परिणामी, लोककलावंत व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबातील व्यक्तींना मिळेल ती कामे करून आयुष्याचे दिवस ढकलावे लागत आहेत.

तुटपुंज्या मदतीने जगायचे कसे?

कोरोनापासून लोककलावंतांचा रोजगार हिरावला. सर्व कार्यक्रम ठप्प झाले आहेत. यापूर्वी ‘क’ श्रेणीतील लोककलावंतांना १ हजार ५०० रुपये मानधन मिळत होते. आता ते २२५० रुपये करण्यात आले. आजच्या महागाईनुसार ही तुटपुंजी मदत किती दिवस पुरणार, असा प्रश्न लोककलावंतांकडून विचारला जात आहे.

राज्य सरकारची मदत रखडली

राज्य सरकारने ५० वर्षे पूर्ण करणाऱ्या कलावंतांना २ हजार २५० रुपये मानधन देण्याचे जाहीर केले. शासनाकडून निधी उपलब्ध झाला तरच कलावंतांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे ही रक्कम वळती केली जाते. कोरोनापासून निधी उपलब्ध न झाल्याने जिल्ह्यातील कलावंतांचे मानधन रखडले आहे.

१०० कलावंतांचीच निवड

लोककलावंत निवडण्यासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली. राष्ट्रीयस्तरावर ‘अ’ दर्जा, राज्यस्तरावर ‘ब’ आणि स्थानिक स्तरावरील कलावंताला ‘क’ दर्जा दिला जातो. चंद्रपूर जिल्ह्यात दरवर्षी १०० लोककलावंतांचीच निवड केली जाते; परंतु अर्ज करणाऱ्या कलावंतांची संख्या ५०० ते ६०० पेक्षा जास्त आहे. जिप समाजकल्याण विभागातून राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविले जातात.

लोककलावंत म्हणतात...

पारंपरिक लोककलाकर म्हणून माझी ओळख आहे; पण सध्या हाताला काम नसल्याने इमारत बांधकामावर कामगार म्हणून काम करीत आहे. काम केले नाही तर कुटुंब कसे जगेल, याची चिंता आहे. शासनाकडून काहीच मदत मिळाली नाही.

-शिवराम पेंदोर, ढोलकपटू, बाबूपेठ चंद्रपूर

मानधनासाठी पात्र ठरविताना सरकारने लागू केलेले नियम अडचणीचे ठरत आहेत. सध्याची स्थिती लक्षात घेऊन यामध्ये बदल केले पाहिजेत. कोरोनापासून आम्ही कसे जगत आहोत, याचा विचार करण्याची गरज आहे.

-पांडुरंग ठेमसे, पोवाडा गायक, ब्रह्मपुरी

सरकार ग्रामीण व आदिवासी भागातील कलावंतांच्या पाठीशी उभे राहिले तरच कलावंत टिकतील. सरकारच्या विविध योजनांचा प्रचार-प्रसार करतील; पण महामारीचे कारण पुढे करून आमच्या व्यथांची दखल घेणे बंद केले.

-उमेश कोल्हटकर, लोकशाहीर, दुर्गापूर