शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
2
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
3
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
4
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
5
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
6
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
7
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
8
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
9
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
10
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
11
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
12
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
13
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
14
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
15
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
16
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
17
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
18
घोडबंदर मार्गावर रस्त्यांची कामं सुरू; मुंबईत जाताना ठाण्यात वाहतूककाेंडीची ‘शिक्षा’
19
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
20
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?

राजा बिरशहाच्या समाधीस पुष्पअर्पण कार्यक्रम

By admin | Updated: February 15, 2017 00:45 IST

इको-प्रो संस्था व एफ ई एस गर्ल्स महाविद्यालयाच्यावतीने मंगळवारला व्हॅलेंटाईन दिनाचे औचित्य साधून ...

व्हॅलेंटाईन' दिन साजरा : इको-प्रो व एफ ई एस महाविद्यालयाचा उपक्रम चंद्रपूर : इको-प्रो संस्था व एफ ई एस गर्ल्स महाविद्यालयाच्यावतीने मंगळवारला व्हॅलेंटाईन दिनाचे औचित्य साधून गोंडराजाच्या समाधीस्थळवरील राजा बिरशाह यांच्या समाधीस पुष्पअर्पण कार्यक्रम पार पडला.प्रेमाचे प्रतीक म्हणून राजा बिरशाहच्या समाधीकडे बघितले जाते. परंतु, राणी हिराईने आपले पती राजा बिरशाह यांच्या प्रति असलेले प्रेम फक्त स्मारकापूरते मर्यादित न ठेवता, आपल्या चौफेर कार्यातूनन दाखवून दिले आहे. त्याचा उजाळा आजच्या युवा पिढीला व्हावा, आणि प्रेमाचा खरा अर्थ कळवा याकरिता दरवर्षी प्रेम दिनाच्या दिवशी राजा बिरशाह यांच्या समाधीस पुष्पअर्पण करण्यात येते.१४ फेब्रुवारीला देशभरात 'व्हॅलेंटाइन डे' साजरा केला जातो. त्यामुळे युवा पिढी क्षणभंगुर प्रेमाच्या मागे लागून सर्वस्व गमविण्याच्या कित्येक घटना समोर येत असतात. युवा विचारांना वेगळी दिशा मिळावी म्हणून राजा बिरशाहच्या समाधी वर पुष्पअर्पण करून प्रमेविरांना इतिहासाची माहिती देण्यात येते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रभू चोथवे तर प्रमुख पाहुणे म्हणून इको-प्रोचे अध्यक्ष बंडू धोतरे, प्रा डॉ विद्या वैद्य, प्रा डॉ देशमुख, प्रा डॉ इसादास भडके, धर्मेंद्र लुनावत आदी उपस्थित होते.आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य चोथवे म्हणाले, भारतीय संस्कृतीत प्रेमाचे व्यापक स्वरूप आहे. व्हॅलेंटाइन डे म्हणजे पाश्चिमात्य संस्कृतीच्या निमित्याने आपण प्रदूषण निर्माण करीत आहोत. आपल्या शहरात ऐतिहासिक बिरशाह समाधीच्या रुपाने प्रेरक आणि सुंदर समाधी आहे. आपण आई-वडील,भाऊ-बहीण यांच्या प्रेमाचा विस्तार केला पाहिजे. इको-प्रो चे अध्यक्ष बंडू धोतरे म्हणाले, राजा बिरशाह समाधी म्हणजे सुंदर वास्तू राणी हिराई ने बांधून त्यांच्या प्रति असलेले प्रेम आपल्या कायार्तून अजरामर केले. या निरागस प्रेमाचा इतिहास आपण जानला पाहिजे. युवकांनी क्षणभंगुर प्रेमाच्या मागे लागू नये. आपल्या विविध नात्यातील प्रेम व्यक्त करण्याकरिता विशिष्ट दिवसाची गरज नसून ते आपल्या वागणुकीतून आणि कायार्तून व्यक्त व्हायला पाहिजे, असे मत व्यक्त केले.यावेळी प्रा डॉ विद्या वैद्य यांनीसुद्धा मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे संचालन प्रा डॉ इसादास भडके तर आभार प्रा आनंद वानखेडे यांनी मानले. कार्यक्रमास प्रा.मेघमाला मेश्राम, प्रा राजेंद्र बरसागडे, प्रा राजेश चिमनवार, प्रा अशोक बन्सोड तसेच इको - प्रो चे सर्व सदस्य उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)