शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

ग्रामस्थांनी बुजविले पाच किमीवरील खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 00:52 IST

विरूर (रोड) ते सुब्बई या पाच किमी लांबीच्या रस्त्यावर महाकाय खड्डे पडले होते. विद्यार्थी व नागरिकांना दररोज ये-जा करताना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.

ठळक मुद्देप्रशासन मूग गिळून : श्रमदानासाठी सरसावले नागरिक

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : विरूर (रोड) ते सुब्बई या पाच किमी लांबीच्या रस्त्यावर महाकाय खड्डे पडले होते. विद्यार्थी व नागरिकांना दररोज ये-जा करताना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. संबंधित प्रशासनाला याकडे लक्ष द्यायला सवड नव्हती. शेवटी सुब्बई येथील शिवाजी आश्रमशाळेतील महाविद्यालयीन विद्यार्थी व ग्रामस्थांनीच श्रमदानातून पाच किमी लांबीच्या रस्त्यावरील खड्डे बुजवून प्रशासनाला चांगलीच चपराक दिली आहे.राजुरापासून ३४ कि.मी. अंतरावर सुब्बई हे गाव आहे. माजी आमदार प्रभाकर मामूलकर यांचे मूळ गाव आहे. परिसरातील विद्यार्थी शिक्षणासाठी राजुरा येथे येतात. राजुरा-विरूर-सुब्बई मार्गाची अत्यंत दूरवस्था झालेली आहे. त्यामुळे परिसरातील ये-जा करणाºया नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. खड्डे मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे वाहनधारकांना आपला जीव मुठीत घेऊन चालावे लागते. रुग्णवाहिकांना खड्डे पार करताना प्रचंड कसरत करावी लागते. दररोज शेकडो विद्यार्थी या मार्गावरून ये-जा करतात. मात्र वारंवार निवेदने देऊनही सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले. त्यामुळे काल मंगळवारी माजी जि.प. सदस्य अविनाश जाधव यांच्या नेतृत्वात गावकरी व विद्यार्थी यांनी स्वयंस्फूर्तीने श्रमदान केले. रखरखत्या उन्हातही गावकरी व विद्यार्थ्यांनी हातात फावडे, टोपल्या घेऊन पाच कि.मी. लांबीच्या रस्त्यावरील खड्डे बुजविले. स्वत: उपस्थित राहून श्रमदान करताना प्रोत्साहित केले.या श्रमदान अभियानात गावकरी, ग्रामपंचायत पदाधिकारी शिवाजी आश्रमशाळेचे शिक्षक, मुख्याध्यापक, विद्यार्थी, आॅटोचालक युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले. मुख्याध्यापक डी.एस. झाडे, अंगलवार, सरपंच गजानन आत्राम, बळीराम चव्हाण, बालेश पुप्पलवार, वानखेडे, नागोसे, राठोड, मोरे, प्रशांत पवार, चंदू चापले, भाऊजी जाभोर, बाबाजी डोहने, कोरवते, सोनी व शिक्षकेत्तर कर्मचाºयांनी श्रमदान करून सामाजिक आदर्श निर्माण केला.दुर्गम भागातील रस्ते तातडीने दुरुस्त करावे. ग्रामीण भागातील रस्त्याची प्रचंड दूरवस्था झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. शासनाने दखल घ्यावी.- प्रभाकर मामूलकरमाजी आमदार, राजुरा