शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
2
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
3
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
5
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
6
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
7
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
8
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
10
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
11
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
12
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
13
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
14
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
15
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
16
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
17
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
18
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
19
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
20
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ

जिल्ह्यातील मासेमारी संकटात

By admin | Updated: August 23, 2014 01:41 IST

यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे अत्यल्प पर्जन्यमान व कडक उन्हामुळे पाण्याने दुभिक्ष्य निर्माण झाले आहे.

भेजगाव : यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे अत्यल्प पर्जन्यमान व कडक उन्हामुळे पाण्याने दुभिक्ष्य निर्माण झाले आहे. याचा विपरीत परिणाम मासेमारी व्यवसायावर होत आहे. अनेक ठिकाणच्या तलाव, बोडी, नदी नाल्यामधील जलसाठा अत्यंत कमी असल्याने मासेमारांचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे मत्स्य व्यवसाय संकटात असून मासेमारांवर उपासमारीची वेळ आली आहे. यावर्षी अत्यंत कमी प्रमाणात पाऊस पडल्याने नदी, नाले, तलाव, बोड्या व इतर जलसाठ्यात पाणी नाही. परिसरात मासेमारी व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जात असून मासेमारी संस्था कार्यरत आहेत. मात्र सध्यास्थितीत निर्माण झालेली परिस्थिती संस्थाना चिंतेत टाकणारी आहे. गेल्या दोन ते चार वर्षातील कमी पर्जन्यमान व उन्हाळ्यातील प्रचंड तापमाने तलावातील पाण्याचा साठा आवश्यकतेपेक्षा कमी झाला आहे. तीव्र उष्णतेमुळे कमी पाण्यातील मत्स्यबीज नष्ट झाल्याने तीन वर्षापासून भेजगाव येथील मासेमारी संस्था शासनाकडून कोणतेही आर्थिक सहाय्य दिले जात असताना त्यांना मिळणाऱ्या थोड्याफार आर्थिक लाभावर मस्यबीज खरेदी करावे लागले. त्यातला त्यात बीज कंपन्याकडून सुद्धा संस्थेची फसवणूक होत असल्याने अर्धेअधिक मस्यबीज सुरुवातीलाच नष्ट होतात. उरलेल्याची योग्य वाढ होत नाही. त्यातही बीजच्या वाढीसाठी अपेक्षेप्रमाणे पाणीसाठा उपलब्ध नसतो. त्यामुळे मुदतीपूर्वी मासेमारी करुन नाईलाजाने बाजारात विक्री करावी लागते. अनेक मासेमारी सहकारी संस्था तोट्यात आहेत. भेजगाव मासेमारी संस्थेकडे सध्या रानतलाव,सितला तलाव, पीपरी दीक्षित तलाव, भंजाठी तलाव, रंगारी तलाव लिलाव तत्वावर असून त्यात पाणीसाठा अत्यल्प असल्याने खर्चापेक्षा उत्पन्न कमी होत आहे. या संस्था आर्थिक संकटात असून सरकारने आर्थिक मदत करावी, अशी मागणी होत आहे.(वार्ताहर)