शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
7
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
8
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
9
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
10
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
11
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
12
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
13
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
14
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
15
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
16
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
17
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
18
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
19
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
20
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल

पोंभूर्ण्यात साकारतेय राज्यातील नगर पंचायतीची पहिली सुसज्ज इमारत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 22:57 IST

जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील नगर पालिकांना लाजवेल अशी देखणी इमारत पोंभूर्णा नगर पंचायतीसाठी तयार होत आहे. काही दिवसातच ती पूर्ण होणार आहे. मुुख्य बसस्थानक चौकामध्ये असलेल्या आणि सर्व सोयीनिशी अद्ययावत असलेली ही इमारत नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.

ठळक मुद्देअत्याधुनिक सुविधांनी युक्त : परिसराचा बदलला चेहरामोहरा

निलकंठ नैताम ।लोकमत न्यूज नेटवर्कपोंभूर्णा : जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील नगर पालिकांना लाजवेल अशी देखणी इमारत पोंभूर्णा नगर पंचायतीसाठी तयार होत आहे. काही दिवसातच ती पूर्ण होणार आहे. मुुख्य बसस्थानक चौकामध्ये असलेल्या आणि सर्व सोयीनिशी अद्ययावत असलेली ही इमारत नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.चार कोटी ५० लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या या इमारतीमुळे व विविध विकास कामांमुळे पोंभूर्णा शहराचे तूर्तास चित्र बदलले आहे. बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार, राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पोंभूर्णा शहरामध्ये विकासकामाचा सपाटा सुरु केला आहे. काही वर्षापूर्वी मागास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोंभूर्ण्याचा चेहरा-मोहरा बदलला आहे. तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्यासाठी ग्रामीण रुग्णालय पोंभूर्णा शहरामध्ये उभे होत आहे. त्याचेही काम जलद गतीने सुरू आहे. तहसील कार्यालय व पंचायत समितीच्या इमारतीही अतिशय देखण्या आहेत. त्यातच पाच कोटी २५ लाख रुपये खर्च करून दीड एकर जागेत अत्याधुनिक बसस्थानक पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून परिवहन विभाग साकारत आहे. नगर पंचायत कार्यालयामागे उमरी-पोतदार-बल्लारपूर रस्त्यालगत प्रशस्त जागेत हे बसस्थानक विकसित होत आहे.स्थानिक परिसरातील नागरिकांना योग्य सेवा मिळावी यासाठी परिवहन विभागाने स्मार्ट बसस्थानकाची निर्मिती करण्याची व प्रवाशांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महामंडळाचा प्रयत्न सुरू आहे. पाटबंधारे विभागामार्फत तलावाच्या सौंदर्यीकरणाचे काम तसेच शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी एटीएम मशीन बसविण्यात आली आहे.दोन कोटी ७५ लाख रुपये किंमतीचे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी इको-पार्क वनविभागाअंतर्गत तयार करण्यात आले आहे. शहर व परिसरातील बसुसंख्य नागरिक याचा आश्वाद घेत आहेत.तालुक्यातील घाटकुळ येथील वैनगंगा नदीवर मोठ्या पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे. त्याचे नुकतेच लोकार्पण सुद्धा करण्यात आल्याने गडचिरोली-चंद्रपूर या दोन्ही जिल्ह्याचा मार्ग सुकर झाला आहे. स्थानिक परिसरातील नागरिकांना कमी अंतराने प्रवास करताना दिलासा मिळाला आहे. शहरातून जाणाºया मुख्य रस्ताही कोट्यावधी रुपये खर्च करून तयार करण्यात आला आहे.मागास अशी ओळख असलेल्या पोंभूर्णा तालुक्याचा या विकासकामामुळे मोठ्या प्रमाणात विकास झाला असून संपूर्ण कायापालट झाला आहे. त्यामुळे जुनी मागास अशी ओळख आता पुसली जावून जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात पोंभूर्णाचे नाव घेतल्या जाईल, असेही बोलल्या जात आहे.