शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

पोंभूर्ण्यात साकारतेय राज्यातील नगर पंचायतीची पहिली सुसज्ज इमारत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 22:57 IST

जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील नगर पालिकांना लाजवेल अशी देखणी इमारत पोंभूर्णा नगर पंचायतीसाठी तयार होत आहे. काही दिवसातच ती पूर्ण होणार आहे. मुुख्य बसस्थानक चौकामध्ये असलेल्या आणि सर्व सोयीनिशी अद्ययावत असलेली ही इमारत नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.

ठळक मुद्देअत्याधुनिक सुविधांनी युक्त : परिसराचा बदलला चेहरामोहरा

निलकंठ नैताम ।लोकमत न्यूज नेटवर्कपोंभूर्णा : जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील नगर पालिकांना लाजवेल अशी देखणी इमारत पोंभूर्णा नगर पंचायतीसाठी तयार होत आहे. काही दिवसातच ती पूर्ण होणार आहे. मुुख्य बसस्थानक चौकामध्ये असलेल्या आणि सर्व सोयीनिशी अद्ययावत असलेली ही इमारत नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.चार कोटी ५० लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या या इमारतीमुळे व विविध विकास कामांमुळे पोंभूर्णा शहराचे तूर्तास चित्र बदलले आहे. बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार, राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पोंभूर्णा शहरामध्ये विकासकामाचा सपाटा सुरु केला आहे. काही वर्षापूर्वी मागास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोंभूर्ण्याचा चेहरा-मोहरा बदलला आहे. तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्यासाठी ग्रामीण रुग्णालय पोंभूर्णा शहरामध्ये उभे होत आहे. त्याचेही काम जलद गतीने सुरू आहे. तहसील कार्यालय व पंचायत समितीच्या इमारतीही अतिशय देखण्या आहेत. त्यातच पाच कोटी २५ लाख रुपये खर्च करून दीड एकर जागेत अत्याधुनिक बसस्थानक पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून परिवहन विभाग साकारत आहे. नगर पंचायत कार्यालयामागे उमरी-पोतदार-बल्लारपूर रस्त्यालगत प्रशस्त जागेत हे बसस्थानक विकसित होत आहे.स्थानिक परिसरातील नागरिकांना योग्य सेवा मिळावी यासाठी परिवहन विभागाने स्मार्ट बसस्थानकाची निर्मिती करण्याची व प्रवाशांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महामंडळाचा प्रयत्न सुरू आहे. पाटबंधारे विभागामार्फत तलावाच्या सौंदर्यीकरणाचे काम तसेच शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी एटीएम मशीन बसविण्यात आली आहे.दोन कोटी ७५ लाख रुपये किंमतीचे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी इको-पार्क वनविभागाअंतर्गत तयार करण्यात आले आहे. शहर व परिसरातील बसुसंख्य नागरिक याचा आश्वाद घेत आहेत.तालुक्यातील घाटकुळ येथील वैनगंगा नदीवर मोठ्या पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे. त्याचे नुकतेच लोकार्पण सुद्धा करण्यात आल्याने गडचिरोली-चंद्रपूर या दोन्ही जिल्ह्याचा मार्ग सुकर झाला आहे. स्थानिक परिसरातील नागरिकांना कमी अंतराने प्रवास करताना दिलासा मिळाला आहे. शहरातून जाणाºया मुख्य रस्ताही कोट्यावधी रुपये खर्च करून तयार करण्यात आला आहे.मागास अशी ओळख असलेल्या पोंभूर्णा तालुक्याचा या विकासकामामुळे मोठ्या प्रमाणात विकास झाला असून संपूर्ण कायापालट झाला आहे. त्यामुळे जुनी मागास अशी ओळख आता पुसली जावून जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात पोंभूर्णाचे नाव घेतल्या जाईल, असेही बोलल्या जात आहे.