शहरं
Join us  
Trending Stories
1
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
2
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
3
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
4
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
5
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
6
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
7
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
8
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
9
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
10
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
11
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
12
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
14
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
15
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
16
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
17
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
18
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
19
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
20
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा

पोंभूर्ण्यात साकारतेय राज्यातील नगर पंचायतीची पहिली सुसज्ज इमारत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 22:57 IST

जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील नगर पालिकांना लाजवेल अशी देखणी इमारत पोंभूर्णा नगर पंचायतीसाठी तयार होत आहे. काही दिवसातच ती पूर्ण होणार आहे. मुुख्य बसस्थानक चौकामध्ये असलेल्या आणि सर्व सोयीनिशी अद्ययावत असलेली ही इमारत नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.

ठळक मुद्देअत्याधुनिक सुविधांनी युक्त : परिसराचा बदलला चेहरामोहरा

निलकंठ नैताम ।लोकमत न्यूज नेटवर्कपोंभूर्णा : जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील नगर पालिकांना लाजवेल अशी देखणी इमारत पोंभूर्णा नगर पंचायतीसाठी तयार होत आहे. काही दिवसातच ती पूर्ण होणार आहे. मुुख्य बसस्थानक चौकामध्ये असलेल्या आणि सर्व सोयीनिशी अद्ययावत असलेली ही इमारत नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.चार कोटी ५० लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या या इमारतीमुळे व विविध विकास कामांमुळे पोंभूर्णा शहराचे तूर्तास चित्र बदलले आहे. बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार, राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पोंभूर्णा शहरामध्ये विकासकामाचा सपाटा सुरु केला आहे. काही वर्षापूर्वी मागास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोंभूर्ण्याचा चेहरा-मोहरा बदलला आहे. तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्यासाठी ग्रामीण रुग्णालय पोंभूर्णा शहरामध्ये उभे होत आहे. त्याचेही काम जलद गतीने सुरू आहे. तहसील कार्यालय व पंचायत समितीच्या इमारतीही अतिशय देखण्या आहेत. त्यातच पाच कोटी २५ लाख रुपये खर्च करून दीड एकर जागेत अत्याधुनिक बसस्थानक पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून परिवहन विभाग साकारत आहे. नगर पंचायत कार्यालयामागे उमरी-पोतदार-बल्लारपूर रस्त्यालगत प्रशस्त जागेत हे बसस्थानक विकसित होत आहे.स्थानिक परिसरातील नागरिकांना योग्य सेवा मिळावी यासाठी परिवहन विभागाने स्मार्ट बसस्थानकाची निर्मिती करण्याची व प्रवाशांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महामंडळाचा प्रयत्न सुरू आहे. पाटबंधारे विभागामार्फत तलावाच्या सौंदर्यीकरणाचे काम तसेच शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी एटीएम मशीन बसविण्यात आली आहे.दोन कोटी ७५ लाख रुपये किंमतीचे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी इको-पार्क वनविभागाअंतर्गत तयार करण्यात आले आहे. शहर व परिसरातील बसुसंख्य नागरिक याचा आश्वाद घेत आहेत.तालुक्यातील घाटकुळ येथील वैनगंगा नदीवर मोठ्या पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे. त्याचे नुकतेच लोकार्पण सुद्धा करण्यात आल्याने गडचिरोली-चंद्रपूर या दोन्ही जिल्ह्याचा मार्ग सुकर झाला आहे. स्थानिक परिसरातील नागरिकांना कमी अंतराने प्रवास करताना दिलासा मिळाला आहे. शहरातून जाणाºया मुख्य रस्ताही कोट्यावधी रुपये खर्च करून तयार करण्यात आला आहे.मागास अशी ओळख असलेल्या पोंभूर्णा तालुक्याचा या विकासकामामुळे मोठ्या प्रमाणात विकास झाला असून संपूर्ण कायापालट झाला आहे. त्यामुळे जुनी मागास अशी ओळख आता पुसली जावून जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात पोंभूर्णाचे नाव घेतल्या जाईल, असेही बोलल्या जात आहे.