शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
2
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
3
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
4
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
5
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
6
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
7
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
8
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
9
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
10
जातगणना : मॅजिक की मंडल?
11
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
12
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
13
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
14
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
15
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
16
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
17
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
18
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
19
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
20
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक

बल्लारपूर हागणदारी मुक्तीत विदर्भात प्रथम

By admin | Updated: April 3, 2016 03:50 IST

बल्लारपूर पंचायत समितीची स्थापना १४ मार्च २००२ रोजी करण्यात आली. यात एकूण १७ ग्रामपंचायतींचा समावेश करण्यात आला.

१०० टक्के उदीष्ट पुर्ण : १७ ग्राम पंचायतींचा समावेशबल्लारपूर : बल्लारपूर पंचायत समितीची स्थापना १४ मार्च २००२ रोजी करण्यात आली. यात एकूण १७ ग्रामपंचायतींचा समावेश करण्यात आला. तालुक्यातील कुटुंब संख्या ९८६४ असून स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत शौचालयाचे बांधकाम पूर्ण करून वापरात आणले आहेत. पहिल्या टप्प्यातील उदिष्ट पूर्ती झाल्याने संपूर्ण तालुका हागणदारी मुक्त झाला आहे. बल्लारपूर तालुका हागणदारी मुक्तीत विदर्भात पहिला असल्याची माहिती शनिवारी संवर्ग विकास अधिकारी बी.बी. गजभे यांनी येथे पत्रपरिषदेत दिली.स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत बल्लारपूर तालुका हागणदारी मुक्त करण्याचा संकल्प ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद यांच्या समन्वयातून करण्यात आले यासाठी पदाधिकारी अधिकारी संपर्क अधिकारी व जिल्हा परिषद यांच्या समन्वयातून करण्यात आला. यासाठी पदाधिकारी अधिकारी व गावकरी यांच्याशी सलग सात महिन्यापासून संवाद साधला जात होता. लोकसहभाग घेण्यात आला लोकांना शौचालय बांधकाम करण्यास प्रवृत्त करण्यात आले. शौचालयाचा नियमित वापर करावा, उघड्यावर शौचास जाऊ नये, यासाठी भल्या पहाटे गुड मार्निंग पथकाच्या माध्यमातून गावागावांत जागृती अभियान राबविण्यात आले यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर यांचे सहकार्य वेळोवेळी घेण्यात आले.स्वच्छ भारत मिशन ग्रामीणचे ध्येय गाठण्यासाठी स्वच्छतेकडून समृद्धीकडे जाण्यासाठी लोकसहभागातून स्वच्छतेची चळवळ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. गावातील सरपंच, उपसरपंच, सदस्य, पंचायत समितीचे व जिल्हा परिषदेचे पदाधिकारी यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने हागणदारी मुक्त तालुक्याचे पहिल्या टप्प्यातील यश मिळाले. तालुक्यातील एकूण १७ ग्रामपंचायतीने हागणदारी मुक्तीचे ग्रामसभेचे प्रस्ताव जानेवारी महिन्यात सादर केले. फेब्रुवारीमध्ये एकूण ९८६४ कुटुंबाची शौचालय बांधकाम व नियमित वापरासंदर्भातील प्रक्रिया आॅनलाईन करुन शासनाला सादर करण्यात आल्याची माहिती संवर्ग विकास अधिकारी बी.बी. गजभे यांनी दिली.बल्लारपूर तालुका हागणदारीमुक्त झाला आहे. मात्र जबाबदारी वाढली आहे. दुसऱ्या टप्प्यातील तालुक्यातील ग्रामपंचायतीची घोषणा करण्याचे धोरण आहे. विविध योजनांची माहिती देण्यासह उघड्यावर शौचास जाणाऱ्यावर प्रतिबंधात्मक कारवाईचा आधार घ्यावा लागणार आहे. गुडमार्निंगपथकाच्या माध्यमातून गावपातळीवर निरंतर प्रक्रिया सुरू ठेवावी लागणार आहे. (शहर प्रतिनिधी)