शहरं
Join us  
Trending Stories
1
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
2
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
3
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
4
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
5
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
6
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
7
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
8
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
9
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
10
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
11
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
12
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
13
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
14
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
15
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
16
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
17
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
18
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
19
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
20
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप

बल्लारपूर हागणदारी मुक्तीत विदर्भात प्रथम

By admin | Updated: April 3, 2016 03:50 IST

बल्लारपूर पंचायत समितीची स्थापना १४ मार्च २००२ रोजी करण्यात आली. यात एकूण १७ ग्रामपंचायतींचा समावेश करण्यात आला.

१०० टक्के उदीष्ट पुर्ण : १७ ग्राम पंचायतींचा समावेशबल्लारपूर : बल्लारपूर पंचायत समितीची स्थापना १४ मार्च २००२ रोजी करण्यात आली. यात एकूण १७ ग्रामपंचायतींचा समावेश करण्यात आला. तालुक्यातील कुटुंब संख्या ९८६४ असून स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत शौचालयाचे बांधकाम पूर्ण करून वापरात आणले आहेत. पहिल्या टप्प्यातील उदिष्ट पूर्ती झाल्याने संपूर्ण तालुका हागणदारी मुक्त झाला आहे. बल्लारपूर तालुका हागणदारी मुक्तीत विदर्भात पहिला असल्याची माहिती शनिवारी संवर्ग विकास अधिकारी बी.बी. गजभे यांनी येथे पत्रपरिषदेत दिली.स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत बल्लारपूर तालुका हागणदारी मुक्त करण्याचा संकल्प ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद यांच्या समन्वयातून करण्यात आले यासाठी पदाधिकारी अधिकारी संपर्क अधिकारी व जिल्हा परिषद यांच्या समन्वयातून करण्यात आला. यासाठी पदाधिकारी अधिकारी व गावकरी यांच्याशी सलग सात महिन्यापासून संवाद साधला जात होता. लोकसहभाग घेण्यात आला लोकांना शौचालय बांधकाम करण्यास प्रवृत्त करण्यात आले. शौचालयाचा नियमित वापर करावा, उघड्यावर शौचास जाऊ नये, यासाठी भल्या पहाटे गुड मार्निंग पथकाच्या माध्यमातून गावागावांत जागृती अभियान राबविण्यात आले यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर यांचे सहकार्य वेळोवेळी घेण्यात आले.स्वच्छ भारत मिशन ग्रामीणचे ध्येय गाठण्यासाठी स्वच्छतेकडून समृद्धीकडे जाण्यासाठी लोकसहभागातून स्वच्छतेची चळवळ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. गावातील सरपंच, उपसरपंच, सदस्य, पंचायत समितीचे व जिल्हा परिषदेचे पदाधिकारी यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने हागणदारी मुक्त तालुक्याचे पहिल्या टप्प्यातील यश मिळाले. तालुक्यातील एकूण १७ ग्रामपंचायतीने हागणदारी मुक्तीचे ग्रामसभेचे प्रस्ताव जानेवारी महिन्यात सादर केले. फेब्रुवारीमध्ये एकूण ९८६४ कुटुंबाची शौचालय बांधकाम व नियमित वापरासंदर्भातील प्रक्रिया आॅनलाईन करुन शासनाला सादर करण्यात आल्याची माहिती संवर्ग विकास अधिकारी बी.बी. गजभे यांनी दिली.बल्लारपूर तालुका हागणदारीमुक्त झाला आहे. मात्र जबाबदारी वाढली आहे. दुसऱ्या टप्प्यातील तालुक्यातील ग्रामपंचायतीची घोषणा करण्याचे धोरण आहे. विविध योजनांची माहिती देण्यासह उघड्यावर शौचास जाणाऱ्यावर प्रतिबंधात्मक कारवाईचा आधार घ्यावा लागणार आहे. गुडमार्निंगपथकाच्या माध्यमातून गावपातळीवर निरंतर प्रक्रिया सुरू ठेवावी लागणार आहे. (शहर प्रतिनिधी)