शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
4
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
5
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
6
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
7
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
8
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
9
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
10
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
11
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
12
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
13
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
14
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
15
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
16
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
17
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
18
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
19
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
20
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?

पहिल्यांदाच ३० हेक्टरवरून ७५० हेक्टरपर्यंत पोहोचला करडीचा पेरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:33 IST

चंद्रपूर : धान व कपाशीचे कोठार म्हणून ओळखणाऱ्या १५ तालुक्यांतील शेतकरी आता काळाच्या बदलत्या मागणीनुसार गळीत धान्यांकडेही लक्ष देऊ ...

चंद्रपूर : धान व कपाशीचे कोठार म्हणून ओळखणाऱ्या १५ तालुक्यांतील शेतकरी आता काळाच्या बदलत्या मागणीनुसार गळीत धान्यांकडेही लक्ष देऊ लागले आहेत. त्यामुळे २०१८-१९ च्या रब्बी हंगामात केवळ ३० हेक्टरमध्ये मर्यादित राहिलेला करडीचा पेरा २०२०-२१ च्या हंगामात प्रथमच तब्बल ७५० हेक्टरपर्यंत पोहाेचला. जवस लागवड क्षेत्रातही गतवर्षीच्या तुलनेत १०० हेक्टर, तर सोयाबीन ८ हजार हेक्टर क्षेत्रात वाढली आहे. जिल्ह्यात धान व कापूस उत्पादकांचीच संख्या सर्वाधिक आहे. यातही काही शेतकरी पारंपरिक शेती टाळून नवनवीन बदलांचा स्वीकार करीत आहेत. अल्पभूधारकांची स्थिती मात्र वाईट आहे. राजुरा, भद्रावती, वरोरा, गोंडपिपरी, कोरपना तालुक्यांत कपाशीवर, तर नागभीड, सिंदेवाही, ब्रह्मपुरी, मूल, सावली तालुक्यांत भात शेतीवर नवीन प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढू लागली. या शेतकऱ्यांना केंद्र शासनाकडून मिळणारा हमीभाव हाच मोठा आधार ठरत आला; पण शेतीसमोरील संकटे दिसत असल्याने कापूस व भात शेतीसोबतच गळीत तेल पिकांचाही पर्याय स्वीकारत आहेत. मागील दहा वर्षांच्या इतिहासात रब्बी हंगामात करडीचे क्षेत्र कधीच ५० हेक्टर क्षेत्राच्या पलीकडे जाऊ शकले नाही. परंतु, यंदा करडीचे क्षेत्र ७५० हेक्टरवर पाेहोचले. मागील रब्बी हंगामात इतर गळीत म्हणून ३०० हेक्टर क्षेत्राची नोंद झाली आहे. यंदादेखील या क्षेत्रात वाढ झाली. गतवर्षी ६५० हेक्टर क्षेत्रात जवस लागवड झाली. यामध्ये वाढ होऊन ७५० हेक्टर झाले आहे. शेतकऱ्यांपर्यंत शासनाच्या योजना पोहोचल्या आणि योग्य मार्गदर्शन मिळाले तर शेतकरी आपल्या शेतीत आमूलाग्र बदल करण्याची संधी वाया जाऊ देत नाही, हेच यंदाच्या करडी पिकावरून दिसून येते.

सूर्यफूल लागवड हद्दपारीच्या मार्गावर

यंदाच्या रब्बी हंगामात गळीत धान्य गटातील सोयाबीन क्षेत्र कमालीचे वाढले. विशेषत: राजुरा, भद्रावती, वरोरा, गोंडपिपरी व चंद्रपूर तालुक्यांत सोयाबीन लागवडीत मोठी वाढ झाली. तुलनेने मोहरी व सूर्यफूल लागवडीचा प्राधान्यक्रम बदलविल्याचे दिसून येते. त्यामुळे कृषी विभागाने यासंदर्भातील कारणांचा अभ्यास करून पुढील हंगामात अधिकाऱ्यांना शेतीच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन् करावे लागणार आहे. कारण, हंगाम व ऋतुमानानुसार पीक पद्धती बदलली नाही तर उत्पादन घटून एकूणच जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेवर अनिष्ट परिणाम होऊ शकतो.

कोट

जमिनीचा पोत लक्षात घेऊनच विविध पिकांचा विचार करावा लागतो. सिंचनाची सुविधा, दर्जेदार बियाणे, पेरणीपूर्व हंगाम, आदी बाबी तेलबियांच्या उत्पादनासाठी उपयुक्त ठरतात. त्यामुळे शासनाने हंगाम सुरू होण्यापूर्वीच याबाबतचे नियोजन करावे. शेतकऱ्यांपर्यंत कृषी योजना पोहोचविल्या तरच शेती फायदेशीर होईल.

- सीताराम चौधरी, शेतकरी राजुरा

खरीप हंगाम झाल्यानंतर शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती रुळावर येईलच याची खात्री नाही. शेतकरी उत्पादन करतो; मात्र शेतमालाचे भाव ठरवू शकत नाही, ही त्याची खरी अडचण आहे. शेतीसाठी लागणाऱ्या सुविधा योजनांतून मिळवून दिल्यास मोठा आधार होईल. कारण शेतकरी स्वत:सोबतच इतरांसाठीही धान्य पिकवितो, हे लक्षात ठेवले पाहिजे.

- श्रीधर लोणकर, शेतकरी भद्रावती