शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
4
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
5
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
6
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
7
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
8
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
9
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
11
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
12
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
13
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
14
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
15
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
16
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
17
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
18
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
19
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
20
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न

१९५९-६० ला गुंफास्थळी झाला पहिला महोत्सव

By admin | Updated: December 30, 2014 23:30 IST

बाल माणिक यांचे गोंदेडा (गुंफा) ता. चिमूर येथे वयाच्या १५ व्या वर्षी म्हणजेच १ आॅक्टोबर १९२४ मध्ये आगमन झाले. ते आॅक्टोंबर १९२६ पर्यंत येथे वास्तव्यास होते. दरम्यान, सन १९२४-२५ व २६ या काळात

रमेश नान्ने - पेंढरी(कोके)बाल माणिक यांचे गोंदेडा (गुंफा) ता. चिमूर येथे वयाच्या १५ व्या वर्षी म्हणजेच १ आॅक्टोबर १९२४ मध्ये आगमन झाले. ते आॅक्टोंबर १९२६ पर्यंत येथे वास्तव्यास होते. दरम्यान, सन १९२४-२५ व २६ या काळात तुकडोजी महाराज यांनी गुंफास्थळी साधना केली. १९ मार्च १९२७ रोजी त्यांनी आनंदामृत नावाचा आध्यात्मिक पहिला ग्रंथ लिहिण्यास प्रारंभ केला. त्यानंतर तुकडोजी महाराज यांनी सन १९५९-६० मध्ये पहिल्यांदा यात्रा महोत्सव गुंफास्थळी सुरु केला.९ जानेवारी १९६० ला पहिला घुगरी गोपालकाला केला आणि तोही पौष पोर्णिमेला पूर्ण चंद्राकृतीला साक्षी ठेवून. यामागे त्यांचा उद्देश असा होता की, चंद्रप्रकाशात भाविकांना रात्रीचा कार्यक्रम व उपक्रमाचा आस्वाद घेता यावा. जनजागृती, अंधश्रद्धा निर्मूलन, समाज सुधारणा, संघटन, शिक्षण, सर्वधर्म समभाव आदींचा प्रसार हा देखील यामागील उद्देश आहे. या यात्रेचे सुरुवातीचे स्वरूप लोकात जावून भजन- कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृती समाज प्रबोधन करणे, भौतिक तसेच आध्यात्मिक स्वरूपात सामाजिक सुधारणा इत्यादी बाबी अंतर्भुत होत्या. त्यानंतर ६ ते ९ जानेवारी १९६३ या दरम्यान राष्ट्रसंतांच्या उपस्थितीत यात्रा महोत्सव संपन्न झाला. यामध्ये गीताचार्य तुकाराम दादा, राजे विश्वेश्वरराव आत्राम, राष्ट्रसंतांचे सहकारी गुरुकुंजचे शामराव दादा मुकदम आदी विभुती हजर होती.सन १९६३ ला एकाच वर्षी दोन पौष पोर्णिमा आल्यामुळे १९६४ ची यात्रा महोत्सव हा २८ डिसेंबर ते ३० डिसेंबर १९६३ या दरम्यान झाला. यावेळीही महाराज तीन दिवस तपोभूमीत मुक्कामी होते. या महोत्सवात मुंबईचे अभिनेते शाहू मुळक, तत्कालिन विधानसभा सभापती आध्यात्मिक विचारवंत बाळासाहेब भारदे, शिक्षण उपमंत्री डॉ. कैलास यांचे मार्गदर्शन, हभप खंडारे व सावजी महाराज यांचे कीर्तन तथा हभप मोझरकर महाराज यांचे प्रवचन झाले होते. १५ जानेवारी ते १७ जानेवारी १९६५ च्या यात्रा महोत्सवातही राष्ट्रसंत तीन दिवस मुक्कामी होते.२४ ते २६ जानेवारी १९६७ च्या यात्रा महोत्सवादरम्यान विधानसभेच्या सार्वजनिक निवडणूका आल्या. त्यावेळेस राष्ट्रसंतांनी सर्वपक्षीय उमेदवारांना यात्रेच्या एकाच व्यासपीठावर आणले. हा संदर्भ ३ फेब्रुवारी १९६७ अनेक वृत्तपत्रांनीही दिला होता. १३ ते १५ जानेवारी १९६८ च्या यात्रा महोत्सवादरम्यानचा महाराजांचा मुक्काम अखेरचा ठरला.