शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

१९५९-६० ला गुंफास्थळी झाला पहिला महोत्सव

By admin | Updated: December 30, 2014 23:30 IST

बाल माणिक यांचे गोंदेडा (गुंफा) ता. चिमूर येथे वयाच्या १५ व्या वर्षी म्हणजेच १ आॅक्टोबर १९२४ मध्ये आगमन झाले. ते आॅक्टोंबर १९२६ पर्यंत येथे वास्तव्यास होते. दरम्यान, सन १९२४-२५ व २६ या काळात

रमेश नान्ने - पेंढरी(कोके)बाल माणिक यांचे गोंदेडा (गुंफा) ता. चिमूर येथे वयाच्या १५ व्या वर्षी म्हणजेच १ आॅक्टोबर १९२४ मध्ये आगमन झाले. ते आॅक्टोंबर १९२६ पर्यंत येथे वास्तव्यास होते. दरम्यान, सन १९२४-२५ व २६ या काळात तुकडोजी महाराज यांनी गुंफास्थळी साधना केली. १९ मार्च १९२७ रोजी त्यांनी आनंदामृत नावाचा आध्यात्मिक पहिला ग्रंथ लिहिण्यास प्रारंभ केला. त्यानंतर तुकडोजी महाराज यांनी सन १९५९-६० मध्ये पहिल्यांदा यात्रा महोत्सव गुंफास्थळी सुरु केला.९ जानेवारी १९६० ला पहिला घुगरी गोपालकाला केला आणि तोही पौष पोर्णिमेला पूर्ण चंद्राकृतीला साक्षी ठेवून. यामागे त्यांचा उद्देश असा होता की, चंद्रप्रकाशात भाविकांना रात्रीचा कार्यक्रम व उपक्रमाचा आस्वाद घेता यावा. जनजागृती, अंधश्रद्धा निर्मूलन, समाज सुधारणा, संघटन, शिक्षण, सर्वधर्म समभाव आदींचा प्रसार हा देखील यामागील उद्देश आहे. या यात्रेचे सुरुवातीचे स्वरूप लोकात जावून भजन- कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृती समाज प्रबोधन करणे, भौतिक तसेच आध्यात्मिक स्वरूपात सामाजिक सुधारणा इत्यादी बाबी अंतर्भुत होत्या. त्यानंतर ६ ते ९ जानेवारी १९६३ या दरम्यान राष्ट्रसंतांच्या उपस्थितीत यात्रा महोत्सव संपन्न झाला. यामध्ये गीताचार्य तुकाराम दादा, राजे विश्वेश्वरराव आत्राम, राष्ट्रसंतांचे सहकारी गुरुकुंजचे शामराव दादा मुकदम आदी विभुती हजर होती.सन १९६३ ला एकाच वर्षी दोन पौष पोर्णिमा आल्यामुळे १९६४ ची यात्रा महोत्सव हा २८ डिसेंबर ते ३० डिसेंबर १९६३ या दरम्यान झाला. यावेळीही महाराज तीन दिवस तपोभूमीत मुक्कामी होते. या महोत्सवात मुंबईचे अभिनेते शाहू मुळक, तत्कालिन विधानसभा सभापती आध्यात्मिक विचारवंत बाळासाहेब भारदे, शिक्षण उपमंत्री डॉ. कैलास यांचे मार्गदर्शन, हभप खंडारे व सावजी महाराज यांचे कीर्तन तथा हभप मोझरकर महाराज यांचे प्रवचन झाले होते. १५ जानेवारी ते १७ जानेवारी १९६५ च्या यात्रा महोत्सवातही राष्ट्रसंत तीन दिवस मुक्कामी होते.२४ ते २६ जानेवारी १९६७ च्या यात्रा महोत्सवादरम्यान विधानसभेच्या सार्वजनिक निवडणूका आल्या. त्यावेळेस राष्ट्रसंतांनी सर्वपक्षीय उमेदवारांना यात्रेच्या एकाच व्यासपीठावर आणले. हा संदर्भ ३ फेब्रुवारी १९६७ अनेक वृत्तपत्रांनीही दिला होता. १३ ते १५ जानेवारी १९६८ च्या यात्रा महोत्सवादरम्यानचा महाराजांचा मुक्काम अखेरचा ठरला.