शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

घोडपेठ ठरले राज्यातील पहिले डिजिटल गाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 22:31 IST

भद्रावती तालुक्यातील घोडपेठ येथे सोमवारी डिजिटल गावाचा शुभारंभ करण्यात आला. महाराष्ट्रातील पहिले डिजिटल गाव म्हणून घोडपेठ उदयास आले. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचे एक डिजिटल ग्राम तयार करण्यात येत असल्याची माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी येथे दिली.

ठळक मुद्देहंसराज अहीर : मुंबईच्या डॉक्टरांशी थेट संवाद

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : भद्रावती तालुक्यातील घोडपेठ येथे सोमवारी डिजिटल गावाचा शुभारंभ करण्यात आला. महाराष्ट्रातील पहिले डिजिटल गाव म्हणून घोडपेठ उदयास आले. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचे एक डिजिटल ग्राम तयार करण्यात येत असल्याची माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी येथे दिली.घोडपेठ गावातील नागरिकांना टेलिमेडिसीन सेवा, विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षणाची सुरुवात, महिलांना सॅनिटरी नॅपकीन तयार करणे व विकण्याची सुविधा आणि उर्जा वाचविणा?्या एलईडी बल्बच्या निर्माण केंद्राची सुरुवात करण्यात आली. याशिवाय वेगवेगळ्या पद्धतीच्या डिजिटल दाखल्यांची सुविधादेखील उपलब्ध करण्यात आली. यासोबतच या गावांमध्ये आता आर्थिक व्यवहारासंदर्भातील प्रशिक्षणाला सुरुवात झाली आहे. गावात सोलार स्ट्रीट लाईट लावले जाणार आहेत. यावेळी जि.प. अध्यक्ष देवराव भोंगळे, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी सचिन कलंत्री, सीएससीचे प्रमुख वैभव देशपांडे, जि. प. सभापती अर्चना जिवतोडे व ब्रिजभूषण पाझारे, भद्रावती पं. स. सभापती विद्या कांबळे, तहसीलदार महेश शितोटे, सरपंच वैशाली उरकुडे, राहुल सराफ, नरेंद्र जिवतोडे, रवी नागापुरे, विजय वानखेडे, गिरीश बन्नोरे उपस्थित होते.ना. अहीर म्हणाले, प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना सुरू करून जनतेला आरोग्यासाठी मोठी उपलब्धी मिळाली आहे. घोडपेठ येथून मुंबईच्या अपोलो हॉस्पिटलच्या डॉक्टरांची एका रुग्णाची थेट बोलणी झाली. त्यांच्यासाठी आॅनलाईन सूचवण्यात आलेल्या औषधोपचाराची ‘डिजिटल प्रिस्क्रिप्शन’ गावकऱ्यांना दाखविले. यापुढे सर्वांनी आरोग्याची तज्ज्ञ डॉक्टरांकडून टेलिमेडिसीनद्वारे तपासणी करावी, असेही ना. अहीर म्हणाले. सरपंच वैशाली उरकुडे यांनी गावातील मुलींना सॅनिटरी नॅपकिनचे वाटप केले. प्रास्ताविक सीएससीचे वैभव देशपांडे, संचालन उद्धव पुरी यांनी केले. आभार सरपंच वैशाली उरकुडे यांनी मानले.