शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

तब्बल १२ तास चालले आगीचे तांडव

By admin | Updated: November 1, 2016 00:49 IST

चंद्रपुरातील अंत्यत वर्दळीचे ठिकाण असलेल्या जटपुरा गेटजवळील समाधान पूर्ती बाजारला रविवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास आग लागली.

चंद्रपूर शहरातील घटना : मनपाचे अग्नीशमन दल आग विझविण्यास अपयशी चंद्रपूर : चंद्रपुरातील अंत्यत वर्दळीचे ठिकाण असलेल्या जटपुरा गेटजवळील समाधान पूर्ती बाजारला रविवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास आग लागली. या आगीने क्षणार्धात रुद्ररुप धारण केल्याने पूर्ती बाजारातील सर्वच साहित्य जळून खाक झाले. घटनास्थळी मनपाचे अग्नीशमन दल दाखल झाले. मात्र आगीवर नियंत्रण मिळविता न आल्याने ही आग सोमवारी दुपारपर्यंत धगधगत होती. त्यामुळे मनपाच्या अग्नीशमन दलाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पूर्ती बाजाराला लागलेल्या आगीत सर्वच साहित्य जळून खाक झाल्याने यात सुमारे चार कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. रविवारी सर्वत्र दिवाळीच्या फटाक्यांची आतिषबाजी सुरू होती. दरम्यान, रात्री १२ वाजताच्या सुमारास समाधान पूर्ती बाजारातील वरच्या मजल्यावर आग लागल्याचे चौकीदाराच्या निदर्शनात आले. चौकीदाराने पूर्ती बाजारचे संचालक गिरीश चांडक यांना माहिती दिली. चांडक यांनी अग्निशमन दल व पोलिसांना याची माहिती दिली. दरम्यान वरच्या मजल्यावर कपड्यांची शोरुम असल्याने आगीचा भडका उडून आगीचा तांडव सुरू झाला. अग्निशमन दल घटनास्थळी पोहचण्यापर्यंत वरच्या मजल्यावरील संपूर्ण साहित्य जळाले होते. तर मुख्य गेट बंद असल्याने अग्निशमन दलातील जवानांना बाहेरुनच आग विझवावी लागली. त्यामुळे आग खालच्या मजल्यावर पोहचून गोदामाकडे वळली. खालच्या मजल्यावरील लाकडी आलमाऱ्या व विक्रीसाठी असलेल्या तेलाच्या पिंपामुळे आग आणखी भडकली. बाजुच्या कृषी केंद्र व गुपचुप सेंटरलाही आगीने कवेत घेतले. (स्थानिक प्रतिनिधी)मनपाचे कर्मचारीअप्रशिक्षीतमहानगर पालिकेच्या अग्निशमन पथकातील कर्मचारी स्वत:च प्रशिक्षित नसल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात ते असमर्थ ठरत होते. त्यानंतर धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी, एमईएल, बल्लारपूर पेपर मील, आयुधनिर्माणी येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. सर्वांनीच आगीवर नियंत्रण मिळविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र सोमवारी दुपारी २ वाजेपर्यंत आग धगधगत होती. पोलीस ठाण्यात तक्रार दाखल समाधान पूर्ती बाजारचे संचालक गिरीश चांडक यांनी घटनेबाबत शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. शहर पोलीस घटनेचा अधिक तपास करीत असून गिरीश चांडक यांची विचारणा केली असता, त्यांनीही आग कशामुळे लागली हे अद्याप समजले नाही, असे सांगितले. या घटनेत चार कोटींचे नुकसान झाल्याची शक्यता त्यांनी वर्तविली. आग विझवणारे कर्मचारीच असुरक्षीतघटनेनंतर मनपाचे अग्नीशमन दल घटनास्थळी दाखल झाले मात्र आग विझवताना कर्मचारीच असुरक्षीत दिसून आले. कर्मचाऱ्यांकडे सुरक्षा साहित्य नव्हते, तर काही कर्मचारी चप्पल घालूनच आग विझवताना दिसले.आगीचे कारण अस्पष्ठआग कशामुळे लागली, याबाबत मात्र नेमके कारण कळू शकले नाही. मात्र समाधान पूर्ती बाजार बंद झाल्यानंतर रात्री १२ वाजताच्या सुमारास वरच्या माळ्यावरून आग लागल्याचा अंदाज असून फटाक्यामुळे आग लागली असावी, अशी चर्चा परिसरात सुरू होती. अरूंद रस्त्याची अडचणरविवारी रात्री घटना घडल्यानंतर अग्नीशमन दल घटनास्थळी दाखल झाले मात्र अरूंद रस्त्यामुळे त्यांनाही आग विझवण्यास अडचण येत होती. आग विझवण्याचे यंत्र आगीपर्यंत पोहोचत नव्हते. तर वाहनही दूरवरच ठेवावे लागले. त्यामुळे पाण्याची धार आगीपर्यंत पोहोचत नव्हती.