शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
2
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
3
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
4
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
5
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
6
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
7
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
8
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
9
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
10
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
11
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
12
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
13
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
14
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
15
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
16
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
17
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
18
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
19
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
20
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  

तब्बल १२ तास चालले आगीचे तांडव

By admin | Updated: November 1, 2016 00:49 IST

चंद्रपुरातील अंत्यत वर्दळीचे ठिकाण असलेल्या जटपुरा गेटजवळील समाधान पूर्ती बाजारला रविवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास आग लागली.

चंद्रपूर शहरातील घटना : मनपाचे अग्नीशमन दल आग विझविण्यास अपयशी चंद्रपूर : चंद्रपुरातील अंत्यत वर्दळीचे ठिकाण असलेल्या जटपुरा गेटजवळील समाधान पूर्ती बाजारला रविवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास आग लागली. या आगीने क्षणार्धात रुद्ररुप धारण केल्याने पूर्ती बाजारातील सर्वच साहित्य जळून खाक झाले. घटनास्थळी मनपाचे अग्नीशमन दल दाखल झाले. मात्र आगीवर नियंत्रण मिळविता न आल्याने ही आग सोमवारी दुपारपर्यंत धगधगत होती. त्यामुळे मनपाच्या अग्नीशमन दलाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पूर्ती बाजाराला लागलेल्या आगीत सर्वच साहित्य जळून खाक झाल्याने यात सुमारे चार कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. रविवारी सर्वत्र दिवाळीच्या फटाक्यांची आतिषबाजी सुरू होती. दरम्यान, रात्री १२ वाजताच्या सुमारास समाधान पूर्ती बाजारातील वरच्या मजल्यावर आग लागल्याचे चौकीदाराच्या निदर्शनात आले. चौकीदाराने पूर्ती बाजारचे संचालक गिरीश चांडक यांना माहिती दिली. चांडक यांनी अग्निशमन दल व पोलिसांना याची माहिती दिली. दरम्यान वरच्या मजल्यावर कपड्यांची शोरुम असल्याने आगीचा भडका उडून आगीचा तांडव सुरू झाला. अग्निशमन दल घटनास्थळी पोहचण्यापर्यंत वरच्या मजल्यावरील संपूर्ण साहित्य जळाले होते. तर मुख्य गेट बंद असल्याने अग्निशमन दलातील जवानांना बाहेरुनच आग विझवावी लागली. त्यामुळे आग खालच्या मजल्यावर पोहचून गोदामाकडे वळली. खालच्या मजल्यावरील लाकडी आलमाऱ्या व विक्रीसाठी असलेल्या तेलाच्या पिंपामुळे आग आणखी भडकली. बाजुच्या कृषी केंद्र व गुपचुप सेंटरलाही आगीने कवेत घेतले. (स्थानिक प्रतिनिधी)मनपाचे कर्मचारीअप्रशिक्षीतमहानगर पालिकेच्या अग्निशमन पथकातील कर्मचारी स्वत:च प्रशिक्षित नसल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात ते असमर्थ ठरत होते. त्यानंतर धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी, एमईएल, बल्लारपूर पेपर मील, आयुधनिर्माणी येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. सर्वांनीच आगीवर नियंत्रण मिळविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र सोमवारी दुपारी २ वाजेपर्यंत आग धगधगत होती. पोलीस ठाण्यात तक्रार दाखल समाधान पूर्ती बाजारचे संचालक गिरीश चांडक यांनी घटनेबाबत शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. शहर पोलीस घटनेचा अधिक तपास करीत असून गिरीश चांडक यांची विचारणा केली असता, त्यांनीही आग कशामुळे लागली हे अद्याप समजले नाही, असे सांगितले. या घटनेत चार कोटींचे नुकसान झाल्याची शक्यता त्यांनी वर्तविली. आग विझवणारे कर्मचारीच असुरक्षीतघटनेनंतर मनपाचे अग्नीशमन दल घटनास्थळी दाखल झाले मात्र आग विझवताना कर्मचारीच असुरक्षीत दिसून आले. कर्मचाऱ्यांकडे सुरक्षा साहित्य नव्हते, तर काही कर्मचारी चप्पल घालूनच आग विझवताना दिसले.आगीचे कारण अस्पष्ठआग कशामुळे लागली, याबाबत मात्र नेमके कारण कळू शकले नाही. मात्र समाधान पूर्ती बाजार बंद झाल्यानंतर रात्री १२ वाजताच्या सुमारास वरच्या माळ्यावरून आग लागल्याचा अंदाज असून फटाक्यामुळे आग लागली असावी, अशी चर्चा परिसरात सुरू होती. अरूंद रस्त्याची अडचणरविवारी रात्री घटना घडल्यानंतर अग्नीशमन दल घटनास्थळी दाखल झाले मात्र अरूंद रस्त्यामुळे त्यांनाही आग विझवण्यास अडचण येत होती. आग विझवण्याचे यंत्र आगीपर्यंत पोहोचत नव्हते. तर वाहनही दूरवरच ठेवावे लागले. त्यामुळे पाण्याची धार आगीपर्यंत पोहोचत नव्हती.