शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
2
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
3
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
4
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती
5
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
6
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
7
Video: चालत्या ट्रेनमध्ये मारहाण अन् चोरीचा प्रयत्न; अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना
8
इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
9
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
10
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
11
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
12
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
13
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
14
केंद्र सरकार सीमा व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करणार; महाराष्ट्रातील खासदाराने केली होती मागणी
15
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
16
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
17
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
18
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
19
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा

विरुरात आग : पाच घरे भस्मसात

By admin | Updated: May 29, 2014 02:05 IST

आज बुधवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास शॉकसर्किटने आग लागून चार घरे जळून खाक झाली.

विरुर(स्टे.): आज बुधवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास शॉकसर्किटने आग लागून चार घरे जळून खाक झाली. यात एकूण २0 लाखांचे नुकसान झाल्याचे समजते.

वारलु देवाजी नारनवरे, विनोद देवाजी नारनवरे, आनंदराव नारनवरे, राहुल भगवान झाडे, बंडू खंडू झाडे अशी घरे जळाल्यांची नागरिकांची नावे आहेत. त्यांना एकही उपयोगी वस्तू बाहेर काढता आलीे नाही. येथील आठवडी बाजार असल्याने आज दुपारच्या सुमारास घरातील मंडळी बाजार करण्यासाठी गेली होती. अचानक शॉटसर्किटमुळे प्रथम वारलु देवाजी नारनवरे यांच्या घराला आग लागली. उन्हाळ्याचे दिवस असल्याने बाजुला असलेले विनोद नारनवरे, आनंदराव नारनवरे, राहुल झाडे, बंडू झाडे यांच्या घरालाही आगीने कवेत घेतले.

बहुतांश गावकरीही आठवडी बाजारात असल्याने वेळीच आगीवर नियंत्रण मिळविता आले नाही. या आगीत पाचही घरातील सामान जळून खाक झाले. जनावरांचे वैरणसुद्धा जळून खाक झाल्याने पाचही जणांचे फारच नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच राजुर्‍यातून अग्निशमन वाहनाला पाचारण करण्यात आले. या घटनेमुळे वारलु देवाजी नारनवरे, विनोद देवाजी नारनवरे, आनंदराव नारनवरे, राहुल भगवान झाडे, बंडू खंडू झाडे यांचा संसार उघड्यावर आला आहे. (वार्ताहर)