शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

शेतमालाच्या दरवाढीसाठी अग्निपरीक्षा

By admin | Updated: December 6, 2015 00:54 IST

शेतमालाला आज ना उद्या भाव मिळेल या आशेवर शेतकरी होते.

शेतकरी हवालदिल : हिवाळी अधिवेशनाकडे साऱ्यांचेच लक्षप्रकाश काळे गोवरी शेतमालाला आज ना उद्या भाव मिळेल या आशेवर शेतकरी होते. अनेक शेतकऱ्यांनी कवडीमोल भावात शेतमाल विकून आपली अडचण भागविली. शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर वाढला असताना पुन्हा शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. मात्र प्रशासनाला शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नावर अजूनही कायमस्वरुपी उपाय शोधता आला नाही. त्यामुळे शेतकरी पार होरपळून गेला असून हिवाळी अधिवेशनात कोणते लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या समस्या किती पोटतिडकीने मांडतो, हेच पाहणे आता मनोरंजक ठरणार आहे.संसदेचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून नागपुरात सुरू होत आहे. या अधिवेशनात शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लागतील असा तमाम शेतकऱ्यांनी बांधलेला अंदाज आजवर झालेल्या हिवाळी अधिवेशनांनी खोटा ठरविला आहे. नागपूरचे हिवाळी अधिवेशन म्हणजे शेतमालाच्या दरवाढीचा शेवटचा टप्पा असतो, असा शेतकऱ्यांचा समज आहे. त्यामुळे शेतकरी नागपुरातील हिवाळी अधिवेशनावर लक्ष ठेवून असतात. देशातला शेतकरी आज आर्थिक संकटात सापडला आहे. कृषी व्यवस्थेच्या कणाच पार कोलमडून गेला आहे. शेतकऱ्यांचे दिवस आज वाईट आहेत. दिवसरात्र शेतात काबाडकट करुनही शेतकऱ्यांच्या हातात शेवटी काहीच शिल्लक राहत नाही. हाडाची काडं अन् रक्ताचं पाणी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या नशिबी आजवर हालअपेष्टांचे जिणे आले आहे. मात्र त्यांच्या या ज्वलंत प्रश्नावर प्रशासकीय यंत्रणेला आजपर्यंत कायमस्वरुपी उपाय शोधता आला नाही. हे आज विविध शिखर पादाक्रांत करणाऱ्या आपल्या देशाचे सर्वात मोठे दुदैव असल्याच्या प्रतिक्रीय व्यक्त होत आहे.दुष्काळ शेतकऱ्यांच्या पाचविलाच पुजला आहे. यावर्षी निसर्गानेही दगा दिला. मायबाप सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय न घेता शेतमालाच्या दरवाढीकडे पाठ फिरविल्याने उत्पादन खर्च अधिक आणि उत्पादन कमी, अशी स्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांचा जगण्यासाठी संघर्ष सुरू झाला आहे. शेतकऱ्यांनी जुळवाजुळव करुन शेतीवर केलेला खर्च निघणार किंवा नाही याची कोणतीही हमी शेतकऱ्यांजवळ नाही. दिवसरात्रं कष्ट उपसून निसर्गाने साथ दिली तर ठिक नाही तर शेतकऱ्यांना मदतीचा हात देणारेही कोणी पुढे येत नाही. मुलाबाळांच्या शिक्षणाचा खर्च, बँकेचे कर्ज फेडून कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, असा प्रश्न शेतकऱ्यांना दिवसरात्रं छळतो आहे.विदर्भाची सुपीक माती आणि त्या मातीत पिकणारे मोती शेतकऱ्यांना त्याची बाजू भक्कम करणारे ठरतात. मात्र निसर्गाचा लहरीपणा आणि सरकारचे शेतकऱ्यांविरोधी धोरण यामुळे शेतीला अवकळा आली आहे. परिणामी नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. शेतमालाला दर कमी आणि उत्पादन खर्च अधिक होत असल्याने शंभराचे साठ अन् गळ्याला फास अशी शेतकऱ्यांची बिकट अवस्था झाली आहे.