शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

शेतमालाच्या दरवाढीसाठी अग्निपरीक्षा

By admin | Updated: December 6, 2015 00:54 IST

शेतमालाला आज ना उद्या भाव मिळेल या आशेवर शेतकरी होते.

शेतकरी हवालदिल : हिवाळी अधिवेशनाकडे साऱ्यांचेच लक्षप्रकाश काळे गोवरी शेतमालाला आज ना उद्या भाव मिळेल या आशेवर शेतकरी होते. अनेक शेतकऱ्यांनी कवडीमोल भावात शेतमाल विकून आपली अडचण भागविली. शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर वाढला असताना पुन्हा शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. मात्र प्रशासनाला शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नावर अजूनही कायमस्वरुपी उपाय शोधता आला नाही. त्यामुळे शेतकरी पार होरपळून गेला असून हिवाळी अधिवेशनात कोणते लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या समस्या किती पोटतिडकीने मांडतो, हेच पाहणे आता मनोरंजक ठरणार आहे.संसदेचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून नागपुरात सुरू होत आहे. या अधिवेशनात शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लागतील असा तमाम शेतकऱ्यांनी बांधलेला अंदाज आजवर झालेल्या हिवाळी अधिवेशनांनी खोटा ठरविला आहे. नागपूरचे हिवाळी अधिवेशन म्हणजे शेतमालाच्या दरवाढीचा शेवटचा टप्पा असतो, असा शेतकऱ्यांचा समज आहे. त्यामुळे शेतकरी नागपुरातील हिवाळी अधिवेशनावर लक्ष ठेवून असतात. देशातला शेतकरी आज आर्थिक संकटात सापडला आहे. कृषी व्यवस्थेच्या कणाच पार कोलमडून गेला आहे. शेतकऱ्यांचे दिवस आज वाईट आहेत. दिवसरात्र शेतात काबाडकट करुनही शेतकऱ्यांच्या हातात शेवटी काहीच शिल्लक राहत नाही. हाडाची काडं अन् रक्ताचं पाणी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या नशिबी आजवर हालअपेष्टांचे जिणे आले आहे. मात्र त्यांच्या या ज्वलंत प्रश्नावर प्रशासकीय यंत्रणेला आजपर्यंत कायमस्वरुपी उपाय शोधता आला नाही. हे आज विविध शिखर पादाक्रांत करणाऱ्या आपल्या देशाचे सर्वात मोठे दुदैव असल्याच्या प्रतिक्रीय व्यक्त होत आहे.दुष्काळ शेतकऱ्यांच्या पाचविलाच पुजला आहे. यावर्षी निसर्गानेही दगा दिला. मायबाप सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय न घेता शेतमालाच्या दरवाढीकडे पाठ फिरविल्याने उत्पादन खर्च अधिक आणि उत्पादन कमी, अशी स्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांचा जगण्यासाठी संघर्ष सुरू झाला आहे. शेतकऱ्यांनी जुळवाजुळव करुन शेतीवर केलेला खर्च निघणार किंवा नाही याची कोणतीही हमी शेतकऱ्यांजवळ नाही. दिवसरात्रं कष्ट उपसून निसर्गाने साथ दिली तर ठिक नाही तर शेतकऱ्यांना मदतीचा हात देणारेही कोणी पुढे येत नाही. मुलाबाळांच्या शिक्षणाचा खर्च, बँकेचे कर्ज फेडून कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, असा प्रश्न शेतकऱ्यांना दिवसरात्रं छळतो आहे.विदर्भाची सुपीक माती आणि त्या मातीत पिकणारे मोती शेतकऱ्यांना त्याची बाजू भक्कम करणारे ठरतात. मात्र निसर्गाचा लहरीपणा आणि सरकारचे शेतकऱ्यांविरोधी धोरण यामुळे शेतीला अवकळा आली आहे. परिणामी नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. शेतमालाला दर कमी आणि उत्पादन खर्च अधिक होत असल्याने शंभराचे साठ अन् गळ्याला फास अशी शेतकऱ्यांची बिकट अवस्था झाली आहे.