शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
2
'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
3
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
4
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
5
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
6
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
7
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
8
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
9
Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
10
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
11
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
12
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
13
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
14
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
15
Barvi Dam: ठाणेकरांची चिंता मिटली! बारवी धरण १०० टक्के भरले; सात दरवाजे उघडले
16
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
17
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
18
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
19
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
20
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या

शेतमालाच्या दरवाढीसाठी अग्निपरीक्षा

By admin | Updated: December 6, 2015 00:54 IST

शेतमालाला आज ना उद्या भाव मिळेल या आशेवर शेतकरी होते.

शेतकरी हवालदिल : हिवाळी अधिवेशनाकडे साऱ्यांचेच लक्षप्रकाश काळे गोवरी शेतमालाला आज ना उद्या भाव मिळेल या आशेवर शेतकरी होते. अनेक शेतकऱ्यांनी कवडीमोल भावात शेतमाल विकून आपली अडचण भागविली. शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर वाढला असताना पुन्हा शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. मात्र प्रशासनाला शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नावर अजूनही कायमस्वरुपी उपाय शोधता आला नाही. त्यामुळे शेतकरी पार होरपळून गेला असून हिवाळी अधिवेशनात कोणते लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या समस्या किती पोटतिडकीने मांडतो, हेच पाहणे आता मनोरंजक ठरणार आहे.संसदेचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून नागपुरात सुरू होत आहे. या अधिवेशनात शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लागतील असा तमाम शेतकऱ्यांनी बांधलेला अंदाज आजवर झालेल्या हिवाळी अधिवेशनांनी खोटा ठरविला आहे. नागपूरचे हिवाळी अधिवेशन म्हणजे शेतमालाच्या दरवाढीचा शेवटचा टप्पा असतो, असा शेतकऱ्यांचा समज आहे. त्यामुळे शेतकरी नागपुरातील हिवाळी अधिवेशनावर लक्ष ठेवून असतात. देशातला शेतकरी आज आर्थिक संकटात सापडला आहे. कृषी व्यवस्थेच्या कणाच पार कोलमडून गेला आहे. शेतकऱ्यांचे दिवस आज वाईट आहेत. दिवसरात्र शेतात काबाडकट करुनही शेतकऱ्यांच्या हातात शेवटी काहीच शिल्लक राहत नाही. हाडाची काडं अन् रक्ताचं पाणी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या नशिबी आजवर हालअपेष्टांचे जिणे आले आहे. मात्र त्यांच्या या ज्वलंत प्रश्नावर प्रशासकीय यंत्रणेला आजपर्यंत कायमस्वरुपी उपाय शोधता आला नाही. हे आज विविध शिखर पादाक्रांत करणाऱ्या आपल्या देशाचे सर्वात मोठे दुदैव असल्याच्या प्रतिक्रीय व्यक्त होत आहे.दुष्काळ शेतकऱ्यांच्या पाचविलाच पुजला आहे. यावर्षी निसर्गानेही दगा दिला. मायबाप सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय न घेता शेतमालाच्या दरवाढीकडे पाठ फिरविल्याने उत्पादन खर्च अधिक आणि उत्पादन कमी, अशी स्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांचा जगण्यासाठी संघर्ष सुरू झाला आहे. शेतकऱ्यांनी जुळवाजुळव करुन शेतीवर केलेला खर्च निघणार किंवा नाही याची कोणतीही हमी शेतकऱ्यांजवळ नाही. दिवसरात्रं कष्ट उपसून निसर्गाने साथ दिली तर ठिक नाही तर शेतकऱ्यांना मदतीचा हात देणारेही कोणी पुढे येत नाही. मुलाबाळांच्या शिक्षणाचा खर्च, बँकेचे कर्ज फेडून कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, असा प्रश्न शेतकऱ्यांना दिवसरात्रं छळतो आहे.विदर्भाची सुपीक माती आणि त्या मातीत पिकणारे मोती शेतकऱ्यांना त्याची बाजू भक्कम करणारे ठरतात. मात्र निसर्गाचा लहरीपणा आणि सरकारचे शेतकऱ्यांविरोधी धोरण यामुळे शेतीला अवकळा आली आहे. परिणामी नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. शेतमालाला दर कमी आणि उत्पादन खर्च अधिक होत असल्याने शंभराचे साठ अन् गळ्याला फास अशी शेतकऱ्यांची बिकट अवस्था झाली आहे.