शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

तणसाच्या ढिगांना आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 00:16 IST

ब्रम्हपुरी न.प .अंतर्गत येत असलेल्या कुर्झा प्रभागात ब्रम्हपुरी-अºहेर मार्गावरील सुभाष चौकातलगत असलेल्या तणसाच्या ढिगांना अचानक आग लागली. या आगीत काही वेळातच तीन तणसाचे मोठे ढिग जळून खाक झाले. यात ढिगांना लागूनच असलेल्या घरांना आग लागण्यापूर्वीच नपच्या अग्निशामक पथकाने, वार्डातील नितीन आंबोरकर यांच्या खासगी टँकरने व नागरिकांच्या सतर्कतेने आग आटोक्यात आणली.

ठळक मुद्देमोठा अनर्थ टळला : जवळच होती घरे

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : ब्रम्हपुरी न.प .अंतर्गत येत असलेल्या कुर्झा प्रभागात ब्रम्हपुरी-अºहेर मार्गावरील सुभाष चौकातलगत असलेल्या तणसाच्या ढिगांना अचानक आग लागली. या आगीत काही वेळातच तीन तणसाचे मोठे ढिग जळून खाक झाले. यात ढिगांना लागूनच असलेल्या घरांना आग लागण्यापूर्वीच नपच्या अग्निशामक पथकाने, वार्डातील नितीन आंबोरकर यांच्या खासगी टँकरने व नागरिकांच्या सतर्कतेने आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. सदर घटना बुधवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली.दुपारच्या सुमारास कुर्झा वार्डातील नागरिक आपल्या दैनंदिन कामात व्यस्त असताना सुभाष चौकातील महादेव बावनकुळे यांच्या घराच्या बाजूला ठेवण्यात आलेल्या प्रकाश उराडे व ईश्वर फटींग यांच्या तणसाच्या ढिगांना अचानक आग लागली. पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केले. आग लागल्याचे दिसून येताच वार्डातील नागरिकांनी तसेच ब्रम्हपुरी-अºहेर मार्गाने ये-जा करणाऱ्या नागरिकांनी वार्डातील नितीन आंबोरकर यांच्या खाजगी टँकरने, विहिरीच्या पाण्याने, घराघरातील पाण्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यात यश मिळाले नाही. त्यातही ब्रम्हपुरी शहरातील तापमानसुद्धा अधिक असल्याने आग आटोक्यात आणण्यासाठी नागरिकांना अडचण येत होती. सदर आगीची सूचना तात्काळ ब्रम्हपुरी न.प.ला देण्यात आली. काही वेळातच ब्रम्हपुरी न.प.चे अग्निशामक पथक व टँकरने घटनास्थळी धाव घेतली आणि वेळीच आगीवर नियंत्रण मिळविले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. कारण आगीच्या विळख्यात सापडलेल्या तीन तणसाच्या ढिगांना लागूनच मानवी वस्ती आहे. त्यातच महादेव बावनकुळे यांचे घर अगदी लागून आहे. त्यांच्या घराला आग लागली असती तर मानवी वस्ती आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली असती आणि मोठी दुर्घटना घडली असती. परंतु नागरिकांनी सतर्कता दाखवत घटनास्थळी जवळपास दोनशे नागरिकांनी त्वरित धाव घेत मिळेल त्या साधनांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. या आगीची सूचना तात्काळ नपच्या अग्निशामक पथकाला देण्यात आली. खासगी टँकरचीसुद्धा मदत घेण्यात आली. त्यामुळे मानवी वस्तीला आग लागण्यापूर्वीच आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.मात्र अचानक लागलेल्या सदर आगीत प्रकाश उराडे व ईश्वर फटींग यांचे तणसीचे ढीग पूर्णता जळून खाक झाले. त्यामुळे त्यांच्या जनावरांच्या चाºयाचा मोठा बिकट प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :fireआग