शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
3
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
4
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
7
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
8
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
9
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
10
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
11
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
12
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
13
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
14
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
15
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
16
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
17
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
18
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
19
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
20
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?

तणसाच्या ढिगांना आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 00:16 IST

ब्रम्हपुरी न.प .अंतर्गत येत असलेल्या कुर्झा प्रभागात ब्रम्हपुरी-अºहेर मार्गावरील सुभाष चौकातलगत असलेल्या तणसाच्या ढिगांना अचानक आग लागली. या आगीत काही वेळातच तीन तणसाचे मोठे ढिग जळून खाक झाले. यात ढिगांना लागूनच असलेल्या घरांना आग लागण्यापूर्वीच नपच्या अग्निशामक पथकाने, वार्डातील नितीन आंबोरकर यांच्या खासगी टँकरने व नागरिकांच्या सतर्कतेने आग आटोक्यात आणली.

ठळक मुद्देमोठा अनर्थ टळला : जवळच होती घरे

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : ब्रम्हपुरी न.प .अंतर्गत येत असलेल्या कुर्झा प्रभागात ब्रम्हपुरी-अºहेर मार्गावरील सुभाष चौकातलगत असलेल्या तणसाच्या ढिगांना अचानक आग लागली. या आगीत काही वेळातच तीन तणसाचे मोठे ढिग जळून खाक झाले. यात ढिगांना लागूनच असलेल्या घरांना आग लागण्यापूर्वीच नपच्या अग्निशामक पथकाने, वार्डातील नितीन आंबोरकर यांच्या खासगी टँकरने व नागरिकांच्या सतर्कतेने आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. सदर घटना बुधवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली.दुपारच्या सुमारास कुर्झा वार्डातील नागरिक आपल्या दैनंदिन कामात व्यस्त असताना सुभाष चौकातील महादेव बावनकुळे यांच्या घराच्या बाजूला ठेवण्यात आलेल्या प्रकाश उराडे व ईश्वर फटींग यांच्या तणसाच्या ढिगांना अचानक आग लागली. पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केले. आग लागल्याचे दिसून येताच वार्डातील नागरिकांनी तसेच ब्रम्हपुरी-अºहेर मार्गाने ये-जा करणाऱ्या नागरिकांनी वार्डातील नितीन आंबोरकर यांच्या खाजगी टँकरने, विहिरीच्या पाण्याने, घराघरातील पाण्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यात यश मिळाले नाही. त्यातही ब्रम्हपुरी शहरातील तापमानसुद्धा अधिक असल्याने आग आटोक्यात आणण्यासाठी नागरिकांना अडचण येत होती. सदर आगीची सूचना तात्काळ ब्रम्हपुरी न.प.ला देण्यात आली. काही वेळातच ब्रम्हपुरी न.प.चे अग्निशामक पथक व टँकरने घटनास्थळी धाव घेतली आणि वेळीच आगीवर नियंत्रण मिळविले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. कारण आगीच्या विळख्यात सापडलेल्या तीन तणसाच्या ढिगांना लागूनच मानवी वस्ती आहे. त्यातच महादेव बावनकुळे यांचे घर अगदी लागून आहे. त्यांच्या घराला आग लागली असती तर मानवी वस्ती आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली असती आणि मोठी दुर्घटना घडली असती. परंतु नागरिकांनी सतर्कता दाखवत घटनास्थळी जवळपास दोनशे नागरिकांनी त्वरित धाव घेत मिळेल त्या साधनांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. या आगीची सूचना तात्काळ नपच्या अग्निशामक पथकाला देण्यात आली. खासगी टँकरचीसुद्धा मदत घेण्यात आली. त्यामुळे मानवी वस्तीला आग लागण्यापूर्वीच आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.मात्र अचानक लागलेल्या सदर आगीत प्रकाश उराडे व ईश्वर फटींग यांचे तणसीचे ढीग पूर्णता जळून खाक झाले. त्यामुळे त्यांच्या जनावरांच्या चाºयाचा मोठा बिकट प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :fireआग