शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

तणसाच्या ढिगांना आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 00:16 IST

ब्रम्हपुरी न.प .अंतर्गत येत असलेल्या कुर्झा प्रभागात ब्रम्हपुरी-अºहेर मार्गावरील सुभाष चौकातलगत असलेल्या तणसाच्या ढिगांना अचानक आग लागली. या आगीत काही वेळातच तीन तणसाचे मोठे ढिग जळून खाक झाले. यात ढिगांना लागूनच असलेल्या घरांना आग लागण्यापूर्वीच नपच्या अग्निशामक पथकाने, वार्डातील नितीन आंबोरकर यांच्या खासगी टँकरने व नागरिकांच्या सतर्कतेने आग आटोक्यात आणली.

ठळक मुद्देमोठा अनर्थ टळला : जवळच होती घरे

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : ब्रम्हपुरी न.प .अंतर्गत येत असलेल्या कुर्झा प्रभागात ब्रम्हपुरी-अºहेर मार्गावरील सुभाष चौकातलगत असलेल्या तणसाच्या ढिगांना अचानक आग लागली. या आगीत काही वेळातच तीन तणसाचे मोठे ढिग जळून खाक झाले. यात ढिगांना लागूनच असलेल्या घरांना आग लागण्यापूर्वीच नपच्या अग्निशामक पथकाने, वार्डातील नितीन आंबोरकर यांच्या खासगी टँकरने व नागरिकांच्या सतर्कतेने आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. सदर घटना बुधवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली.दुपारच्या सुमारास कुर्झा वार्डातील नागरिक आपल्या दैनंदिन कामात व्यस्त असताना सुभाष चौकातील महादेव बावनकुळे यांच्या घराच्या बाजूला ठेवण्यात आलेल्या प्रकाश उराडे व ईश्वर फटींग यांच्या तणसाच्या ढिगांना अचानक आग लागली. पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केले. आग लागल्याचे दिसून येताच वार्डातील नागरिकांनी तसेच ब्रम्हपुरी-अºहेर मार्गाने ये-जा करणाऱ्या नागरिकांनी वार्डातील नितीन आंबोरकर यांच्या खाजगी टँकरने, विहिरीच्या पाण्याने, घराघरातील पाण्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यात यश मिळाले नाही. त्यातही ब्रम्हपुरी शहरातील तापमानसुद्धा अधिक असल्याने आग आटोक्यात आणण्यासाठी नागरिकांना अडचण येत होती. सदर आगीची सूचना तात्काळ ब्रम्हपुरी न.प.ला देण्यात आली. काही वेळातच ब्रम्हपुरी न.प.चे अग्निशामक पथक व टँकरने घटनास्थळी धाव घेतली आणि वेळीच आगीवर नियंत्रण मिळविले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. कारण आगीच्या विळख्यात सापडलेल्या तीन तणसाच्या ढिगांना लागूनच मानवी वस्ती आहे. त्यातच महादेव बावनकुळे यांचे घर अगदी लागून आहे. त्यांच्या घराला आग लागली असती तर मानवी वस्ती आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली असती आणि मोठी दुर्घटना घडली असती. परंतु नागरिकांनी सतर्कता दाखवत घटनास्थळी जवळपास दोनशे नागरिकांनी त्वरित धाव घेत मिळेल त्या साधनांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. या आगीची सूचना तात्काळ नपच्या अग्निशामक पथकाला देण्यात आली. खासगी टँकरचीसुद्धा मदत घेण्यात आली. त्यामुळे मानवी वस्तीला आग लागण्यापूर्वीच आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.मात्र अचानक लागलेल्या सदर आगीत प्रकाश उराडे व ईश्वर फटींग यांचे तणसीचे ढीग पूर्णता जळून खाक झाले. त्यामुळे त्यांच्या जनावरांच्या चाºयाचा मोठा बिकट प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :fireआग