शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
2
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
3
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
4
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
5
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
6
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
7
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
8
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
9
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
10
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
11
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
12
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
13
सामान्य माणसाला न्याय हे बळकट लोकशाहीचे प्रतिक - सरन्यायाधीश भूषण गवई
14
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
15
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
16
२०३० पर्यंत मुंबई रेबिजमुक्त करणार; पालिकेचा संकल्प, जनजागृती करणार
17
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
18
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
19
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
20
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर

आगीत जनावरंचा गोठा भस्मसात

By admin | Updated: April 22, 2017 01:05 IST

कोरपना तालुक्यातील कढोली(खु) येथे एका शेतातील गोठा गुरूवारी अचानक लागलेल्या आगीत जळून खाक झाला.

दोन लाखांचे नुकसान : सिंचनाचे साहित्यही जळाले आवारपूर : कोरपना तालुक्यातील कढोली(खु) येथे एका शेतातील गोठा गुरूवारी अचानक लागलेल्या आगीत जळून खाक झाला. त्यामुळे शेतकऱ्याचे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. कढोली येथील सधन शेतकरी नामदेव ढेंगळे यांच्या शेतात माल साठविण्यासाठी व जनावरांसाठी त्यांनी गोठा तयार केला होता. परंतु गुरूवारी अचानक या गोठ्याला आग आगली. त्यात संपूर्ण गोठा हा भस्मसात झाला. या घटनेत जनावरांच्या चाऱ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यांनी प्रसंगावधान राखत गोठ्यातील जनावरांची सुटका केली. मात्र त्यात असलेले शेतीची अवजारे व सिंचनाचे साहित्य, ओलिताची पाईप लाईन पूर्णत: जळून खाक झाली. आगीमुळे दोन लाखांचे नुकसान झाले आहे. जनावराच्या चाऱ्याचे आणि ओलीताच्या शेतीचे प्रचंड नुकसान झाल्याने ढेंगळे यांच्यावर संकट कोसळले आहे. शासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पंचनामा केला. आगीचे कारण कळू शकले नाही. या आगीमुळे भोवतालचे शेतकरीसुद्धा भयभीत झाले होते. काही दिवसातच शेतीचा हंगाम चालू होत आहे. परंत त्यांना शेतीचे अवजारे व ओलिताची साहित्य घ्यावे लागणार आहे. त्यामुळे शासनाने त्वरीत नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नामदेव ढेंगळे व गावकऱ्यांनी केली आहे. ढोरपा येथे तणसाच्या ढिगांना आग नागभीड : तालुक्यातील ढोरपा येथे शुक्रवारी दुपारी अचानक आग लागल्याने ४ शेतकऱ्यांचे तणसाचे ढीग जळून खाक झाले हे ढीग गावाशेजारीच असल्याने गावकऱ्यांची पळता भूई थोडी झाली होती.आग लागल्याचे दिसून येताच येथील तहसील कार्यालयाला माहिती देण्यात आली. नायब तहसीलदार वक्ते यांनी लागलीच घटनास्थळ गाठले. ब्रह्मपुरी येथील अग्नीशमन दलालाही माहिती देण्यात आली. अग्नीशमन येईपर्यंत गावकरीच आग आटोक्यात आणत होत अग्नीशमन दलाने उर्वरीत आग विझवली.या आगीत फाल्गुन राऊत, सुखदेव राऊत, मारोती बागडे, रामचंद्र राऊत यांची तणसीची ढिग जळून खाक झाले. घटनास्थळी नागभीड पं.स.चे उपसभापती प्रफुल्ल खापर्डे यांनी भेट दिली.