शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
3
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
4
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
5
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
6
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
7
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
8
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
9
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
10
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
11
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
12
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
13
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
14
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
15
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
16
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
17
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
18
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
19
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
20
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 

आगीत जनावरंचा गोठा भस्मसात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2017 01:07 IST

कोरपना तालुक्यातील कढोली(खु) येथे एका शेतातील गोठा गुरूवारी अचानक लागलेल्या आगीत जळून खाक झाला.

दोन लाखांचे नुकसान : सिंचनाचे साहित्यही जळाले आवारपूर : कोरपना तालुक्यातील कढोली(खु) येथे एका शेतातील गोठा गुरूवारी अचानक लागलेल्या आगीत जळून खाक झाला. त्यामुळे शेतकऱ्याचे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. कढोली येथील सधन शेतकरी नामदेव ढेंगळे यांच्या शेतात माल साठविण्यासाठी व जनावरांसाठी त्यांनी गोठा तयार केला होता. परंतु गुरूवारी अचानक या गोठ्याला आग आगली. त्यात संपूर्ण गोठा हा भस्मसात झाला. या घटनेत जनावरांच्या चाऱ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यांनी प्रसंगावधान राखत गोठ्यातील जनावरांची सुटका केली. मात्र त्यात असलेले शेतीची अवजारे व सिंचनाचे साहित्य, ओलिताची पाईप लाईन पूर्णत: जळून खाक झाली. आगीमुळे दोन लाखांचे नुकसान झाले आहे. जनावराच्या चाऱ्याचे आणि ओलीताच्या शेतीचे प्रचंड नुकसान झाल्याने ढेंगळे यांच्यावर संकट कोसळले आहे. शासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पंचनामा केला. आगीचे कारण कळू शकले नाही. या आगीमुळे भोवतालचे शेतकरीसुद्धा भयभीत झाले होते. काही दिवसातच शेतीचा हंगाम चालू होत आहे. परंत त्यांना शेतीचे अवजारे व ओलिताची साहित्य घ्यावे लागणार आहे. त्यामुळे शासनाने त्वरीत नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नामदेव ढेंगळे व गावकऱ्यांनी केली आहे.