शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

अप्रशिक्षित कर्मचाऱ्यांची ‘फायर फायटिंग’

By admin | Updated: September 26, 2015 00:56 IST

राज्यशासनाने २००६ मध्ये जीव सुरक्षा कायदा अंमलात आणला. तब्बल नऊ वर्षानंतर मनपा प्रशासन या कायद्याची शहरात अंमलबजावणी करीत आहे.

कर्मचाऱ्यांची कमतरता : चतुर्थ कर्मचाऱ्यांवर अग्निशमन विभागाचा भारचंद्रपूर : राज्यशासनाने २००६ मध्ये जीव सुरक्षा कायदा अंमलात आणला. तब्बल नऊ वर्षानंतर मनपा प्रशासन या कायद्याची शहरात अंमलबजावणी करीत आहे. मनपा अग्निशमन विभागाचा डोलारा चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या भरवशावर सुरु आहे. त्यामुळे हे अप्रशिक्षित कर्मचारी फायर फायटिंगसाठी दोन हात कसे करणार, असा प्रश्न मनपाच्याच नगरसेवकांनी उपस्थित केला आहे. मात्र, या प्रश्नावर महापौरांसह आयुक्त अनुत्तरीत झाल्याने फायर फायटिंगच्या यशस्वी अंमलबजावणीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.शहरात अनेक ठिकाणी अवैध इमारती बांधण्यात आल्या आहेत. गल्लीबोळात डॉक्टरांनी दवाखाने थाटून व्यवसाय सुरु केला आहे. आजही अनेक डॉक्टरांनी पालिकेकडे साधी नोंदणीही केलेली नाही. त्यामुळे अवैध इमारतींवर बुलडोझर चालवून नंतर फायर आॅडीटची अंमलबजावणी केल्यास ती यशस्वी होईल, असे नगरसेविका सुनिता लोढिया यांनी म्हटले आहे. तर आता जे चतुर्थश्रेणी कर्मचारी अग्निशमन विभागात कार्यरत आहेत. त्यांना कोणतेही प्रशिक्षण नाही, सुरक्षा साधने नाहीत. त्यामुळे या अप्रशिक्षित कर्मचाऱ्यांना आधी सोयी सुविधा पुरवाव्या. सोबतच प्रशिक्षित कर्मचारी नियुक्त करुन नंतरच फायर फायटिंग राबवावी, अशी मागणी बलराम डोडाणी यांनी केली. फायर फायटिंगचे काम एका एजन्सीमार्फत केले जात आहे. इमारत बांधकामाचे प्रमाणपत्र, मालकी हक्क आणि अन्य कागदपत्रे सादर केलेल्यांना फायर फायटिंग प्रमाणपत्र दिले जाते. आतापर्यंत शहरातील ७६ नागरिकांनी अर्ज केले आहेत. त्यातील ३५ लोकांनी कागदपत्रांची पूर्तता केल्याने त्यांना प्रमाणपत्र बहाल करण्यात आले आहे. केवळ अंतर्गत व्यवस्था म्हणून चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांकडून कामे करवून घेतली जात आहेत. येथे कुणीही प्रशिक्षीत कर्मचारी नाही. मात्र, त्यांना सुरक्षा साधने पुरविली जात असल्याचे अग्निशमन विभागाचे अधिकारी बेग यांनी सांगितले आहे. (शहर प्रतिनिधी)