शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

अप्रशिक्षित कर्मचाऱ्यांची ‘फायर फायटिंग’

By admin | Updated: September 26, 2015 00:56 IST

राज्यशासनाने २००६ मध्ये जीव सुरक्षा कायदा अंमलात आणला. तब्बल नऊ वर्षानंतर मनपा प्रशासन या कायद्याची शहरात अंमलबजावणी करीत आहे.

कर्मचाऱ्यांची कमतरता : चतुर्थ कर्मचाऱ्यांवर अग्निशमन विभागाचा भारचंद्रपूर : राज्यशासनाने २००६ मध्ये जीव सुरक्षा कायदा अंमलात आणला. तब्बल नऊ वर्षानंतर मनपा प्रशासन या कायद्याची शहरात अंमलबजावणी करीत आहे. मनपा अग्निशमन विभागाचा डोलारा चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या भरवशावर सुरु आहे. त्यामुळे हे अप्रशिक्षित कर्मचारी फायर फायटिंगसाठी दोन हात कसे करणार, असा प्रश्न मनपाच्याच नगरसेवकांनी उपस्थित केला आहे. मात्र, या प्रश्नावर महापौरांसह आयुक्त अनुत्तरीत झाल्याने फायर फायटिंगच्या यशस्वी अंमलबजावणीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.शहरात अनेक ठिकाणी अवैध इमारती बांधण्यात आल्या आहेत. गल्लीबोळात डॉक्टरांनी दवाखाने थाटून व्यवसाय सुरु केला आहे. आजही अनेक डॉक्टरांनी पालिकेकडे साधी नोंदणीही केलेली नाही. त्यामुळे अवैध इमारतींवर बुलडोझर चालवून नंतर फायर आॅडीटची अंमलबजावणी केल्यास ती यशस्वी होईल, असे नगरसेविका सुनिता लोढिया यांनी म्हटले आहे. तर आता जे चतुर्थश्रेणी कर्मचारी अग्निशमन विभागात कार्यरत आहेत. त्यांना कोणतेही प्रशिक्षण नाही, सुरक्षा साधने नाहीत. त्यामुळे या अप्रशिक्षित कर्मचाऱ्यांना आधी सोयी सुविधा पुरवाव्या. सोबतच प्रशिक्षित कर्मचारी नियुक्त करुन नंतरच फायर फायटिंग राबवावी, अशी मागणी बलराम डोडाणी यांनी केली. फायर फायटिंगचे काम एका एजन्सीमार्फत केले जात आहे. इमारत बांधकामाचे प्रमाणपत्र, मालकी हक्क आणि अन्य कागदपत्रे सादर केलेल्यांना फायर फायटिंग प्रमाणपत्र दिले जाते. आतापर्यंत शहरातील ७६ नागरिकांनी अर्ज केले आहेत. त्यातील ३५ लोकांनी कागदपत्रांची पूर्तता केल्याने त्यांना प्रमाणपत्र बहाल करण्यात आले आहे. केवळ अंतर्गत व्यवस्था म्हणून चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांकडून कामे करवून घेतली जात आहेत. येथे कुणीही प्रशिक्षीत कर्मचारी नाही. मात्र, त्यांना सुरक्षा साधने पुरविली जात असल्याचे अग्निशमन विभागाचे अधिकारी बेग यांनी सांगितले आहे. (शहर प्रतिनिधी)