शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनंतर भारतीय सैन्य अॅक्टीव्ह, जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तराला सुरुवात
4
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
6
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
7
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
8
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
9
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
10
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
11
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
12
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
13
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
14
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
15
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
16
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
17
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
18
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
19
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
20
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात आगीचे तांडव

By admin | Updated: March 28, 2015 00:59 IST

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कक्ष क्र. १५५ मध्ये गुरुवारी रात्री आग लागली. रात्रीच आग

कक्ष क्रमांक १५५ मध्ये आग : मोठी हानी टळलीदुर्गापूर: ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कक्ष क्र. १५५ मध्ये गुरुवारी रात्री आग लागली. रात्रीच आग विझविण्याचे सर्वोतपरी प्रयत्न करण्यात आल्याने मोठी हानी टळली. मात्र अद्यापही काही भागात आग धगधगत आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात आग लागू नये याकरिता विशेष उपाय योजना केल्या जातात. मात्र उन्हाळ्याच्या अगदी सुरुवातीलाच कक्ष क्र. १५५ मध्ये आग लागली. सुखलेल्या पाला पाचोळा, खाली पडलेली फळे खाक झाले. यामुळे तृणभक्षी वन्यजीवाना याचा फटका बसणार आहे. उन्हाळ्याला सुरुवात झाली असून दिवसागणीक तापमाणात वाढ होत आहे. यामुळे वन्यजीवाच्या अंगाची लाही लाही होत आहे. उन्हापासून स्वत:चे संरक्षण करण्याकरिता हिरव्या झाडांचा वन्यप्राणी आश्रय घेत आहे. अशातच जंगलाला आग लागल्याने वन्यजीवांची पळापळ सुरु झाली. या आगीमध्ये वन्यजीवांचा चारा जळून खाक झाला आहे.झाडावरील पक्षांची घरटे व त्यात असलेले त्यांचे पिलांचेही नुकसान झाले आहे. झाडावरील खाली पडलेल्या बियाही नष्ट झाल्या एकंदरीत जंगलाचे मोठे नुकसान झाले आहे.ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोर झोनमध्ये आग लागने एक गंभीर बाब आहे. व्याघ्र प्रशासन याकरिता एक ना अनेक उपाययोजना करते मात्र या उपाययोजना कमी पडत आहे. या वनामध्ये आजही काही भागात आग धगधगत आहे. त्यामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (वार्ताहर) पर्यटनावर पडणार परिणामताडाबो अंधारी प्रकल्पातील कक्ष क्रमांक १५५ मध्ये आग लागली. यामुळे तेथील वन्यप्राणी भटकले आहे. तृणभक्षी प्राण्यांचे खाद्यही नष्ट झाले आहे. परिणामी एकमेवांवर अवलंबून असलेली येथील साखळी तुटण्याची शक्यता आहे. ताडोबा प्रशासनाने वेळीच उपाययोजना करून आगीच्या अशा घटनांवर वेळीच नियंत्रण मिळविणे गरजेचे आहे. अन्यथा पर्यटनावरही याचा परिणाम पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.जंगलातील पानवठे कोरडेताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पांव्यतिरिक्त चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जंगल आहे. मात्र काही ठिकाणी पाणवठे नसल्याने जंगली प्राणी गावाकडे धाव घेतात, अशावेळी माणव वन्यप्राण्यांमध्ये संघर्ष होण्याची भिती असते. त्यामुळे ताडोबासह अन्य जंगलातही पानवठे तयार केल्यास वन्यप्राण्यांना सोयीचे होईल.