शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

आगग्रस्तांची रात्र साई मंदिरात

By admin | Updated: February 18, 2015 00:43 IST

शहरातील मालवयीन वॉर्डात सोमवारी दुपारी आग लागल्याने पाच घरे साहित्यासह जळून खाक झाले. या आगग्रस्त कुटुंबीयांना शासनाची मदत अद्यापही पोहचली नसून ...

वरोरा : शहरातील मालवयीन वॉर्डात सोमवारी दुपारी आग लागल्याने पाच घरे साहित्यासह जळून खाक झाले. या आगग्रस्त कुटुंबीयांना शासनाची मदत अद्यापही पोहचली नसून शहरातील व वॉर्डातील नागरीक त्यांच्या मदतीकरिता सरसावले आहेत. आगग्रस्त कुटुंबीयांनी पहिली रात्र नजीकच्या साई मंदिरात काढली. या मंदिरात ‘त्या’ कुटुंबीयांकरिता झोपण्याची व्यवस्था वॉर्डवासीयांनी केली.वरोरा शहरातील मालवीय वॉर्डातील उद्धव ताकसांडे, तुकाराम देवकर, संजय कुमरे, प्रविण सिडाम, विशाल सिडाम यांच्या घराला आग लागल्याने घरातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले. छतावरील टिनही वितळल्याने त्यांना छतही उरले नाही. या पाचही कुटुंबीयासमोर जगण्यासाठी काहीही पर्याय शिल्लक नसल्याचे दिसत असताना, शहर व वॉर्डातील नागरिक त्यांच्या मदतीकरिता धावून आले आहे. नगराध्यक्ष जनाबाई पिंपळशेंडे यांनी यातील काही कुटुंबीयांना राहण्याकरिता स्वत:च्या घरी ठेवून घेतले तर पाचही कुटुंबीयांची दोन्ही वेळच्या जेवन, चहाची व्यवस्था केली. ‘त्या’ कुटुंबीयांचा संसार रुळावर येईपर्यंत त्यांची व्यवस्था करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. आमदार बाळू धानोरकर व भाजपा तालुका अध्यक्ष डॉ. भगवान गायकवाड यांनी आपदग्रस्तांना तत्काळ आर्थिक मदत केली. या कुटुंबियांना संसाराचे साहित्य व घराचे छत उभारण्यासाठी साहित्य लोकसहभागातून उभारण्याचा मानस मंगल पिंपळशेंडे यांनी व्यक्त केला. महसूल विभागाच्या वतीने जळालेल्या घर व वस्तुंचा पंचनामा केला आहे. परंतु अद्यापही शासकीय मदत मात्र त्या कुटुंबीयांपर्यंत पोहचली नसल्याची माहिती वॉर्डातील नागरिकांनी दिली. आगीची चौकशी केली जात असून आगीचे कारण मात्र अद्यापही समोर आलेले नाही. (तालुका प्रतिनिधी)