शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

आगीत ४०० बंड्या तणस जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2017 00:54 IST

शॉर्ट सर्कीटने अचानक लागलेल्या आगीत तब्बल २१ शेतकऱ्यांची ४०० बड्या तणस, व २५ ते ३० बंड्या जळाऊ लाकडे जळून खाक झाले.

२१ शेतकऱ्यांचे नुकसान : व्याहाड बुज. येथील घटनासावली : शॉर्ट सर्कीटने अचानक लागलेल्या आगीत तब्बल २१ शेतकऱ्यांची ४०० बड्या तणस, व २५ ते ३० बंड्या जळाऊ लाकडे जळून खाक झाले. ही घटना तालुक्यातील व्याहाड बुज. येथील शेतशिवारात रविवारी दुपारच्या सुमारास घडली. अचानक लागलेल्या आगीमुळे शेतकऱ्यांचे लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे.व्याहाड बुज. येथील डोंगरी परिसरात नवभारत शाळेच्या मागील भागात दिवाकर भुरसे यांच्या मालकीची राईस मिल असून, त्यालगतच मोकळ्या जागेवर शेतकऱ्यांनी कुंपन करून गुरांचा चारा (तणस) ठेवला होता. रविवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास अचानक शॉर्टसर्कीटमुळे या परिसरात आग लागली. २० ते २५ शेतकऱ्यांचे तणसीचे ढीग या भागात असल्याने एका ढिगाला आग लागताच पाहता-पाहता आगीने संपूर्ण परिसर वेढला गेला. आणि तब्बल ४०० बंड्या तणस जळून खाक झाली. आगीची घटना लक्षात येताच गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. मूल आणि ब्रह्मपुरी येथून अग्नीशामक गाड्या बोलाविण्यात आल्या. पाच ते सहा तासानंतर ही आग आटोक्यात आणण्यात अग्नीशामक दलाला यश आले. मात्र तोपर्यंत तणस, जळाऊ लाकडे जळून खाक झाले. या घटनेत नंदाजी भोयर, प्रभाकर भोयर, गोपाळा भोयर, नेमाजी पुण्यप्रेड्डीवार, राकेश पिंपळशेट्टीवार, नामदेव पेंदोरकर, सुरेश कागदलवार, जयंत संगीडवार, मुकरू निकुरे, पत्रू निकुरे, देवाजी राऊत, मुकरू शेंडे, गुरूदास पेंदोरकर, गंगाधर पेंदोरकर, डंबाजी कांबळे, दादाजी गेडाम, हरिदास चौधरी, आबाजी कांबळे, वनिता कांबळे, मारोती गेडाम, शिवाजी रूद्रपवार, टेमसू पोहनकर आदी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.घटनेची माहिती मिळताच सावलीचे तहसीलदार डी.एस. भोयर, नायब तहसीलदार दिगलवार, पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. (तालुका प्रतिनिधी)